Thursday, November 15, 2018

असा उद्योगपती होणे नाही.


अमळनेर शहरातील इतिहास हा खुप मोठा भारताच्या नकाशात अमळनेर हे अभिमान व उच्च असलेले शहर या शहरातील शोकांतिक प्रत्येक वेळी आले की बघवत नाही कारण या शहराला ओळख दिली उद्योगपती श्रीमंत प्रताप शेठजी व हशमजी प्रेमजी तसेच स्वातंत्र भारताच्या पाऊल खुणा परम पुज्य साने गुरुजीनी नागरिकांच्या प्रश्नासाठी जन चळवळ सुरु करुन न्याय मिळून दिला. पण आज हे सर्व विसरले जात आहे एवढेच मात्र खरे कारण शहरातील विकासाची दुरदृष्टी नसलेला एक ही व्यक्ती शहरात नाही.
आज अमळनेर शहरात असलेले प्रताप महाविद्यालया मध्ये प्रथमच भेट दिली कामा निमित्त महाविद्यालयातील प्रिन्सिपल यांच्या सोबत र्चचा झाली. त्यानंतर सरळ पाय प्रताप रुग्णालय कडे वळाले ही वास्तु जी गोर गरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेत असे खान्देश परिसरातील सर्वात मोठे रुगणालय जिथे विविध शहरातून रुग्ण तपासणी साठी येत असे पण आज या हाॅस्पिटल धुळ खात पडलेले आहे. या शहराला लाभलेली त्रिमुर्तीची दुरदृष्टी श्रीमंत प्रताप शेठजी, हशमजी प्रेमजी व परम पुज्य साने गुरुजी अमळनेर शहराला शहरातील जनतेला वैभव प्राप्त करुन दिले शहरातील नागरिकांना भारत स्वातंत्र होण्या आधी उद्योग व्यवसाय रोजगार देण्याची दुरदृष्टी होती म्हणून अमळनेर शहरात श्रीमंत प्रतापशेठजी यांनी कापड गिरणी सुरु केली त्यानंतर कामगारच्या मुलांच्या शिक्षणा साठी खान्देश शिक्षण संस्था सुरु केली आणि कामगारांच्या आरोग्याची काळजी साठी प्रताप हाॅस्पिटल सुरु झाले तसेच शिक्षणाची गंगा सर्व जनतेच्या दारी पोहचण्यासाठी शिक्षण माफक दरात दिले जात यांच शिक्षण संस्थेच्या परिसरात तत्वज्ञान केंद्र आहे भारतात फक्त दोन ठिकाणी १. कलकत्ता २. अमळनेर या तत्वज्ञान केंद्रात स्वातंत्र पुर्व काळात शिक्षण घेण्यासाठी परम पुज्य साने गुरुजी आपले गाव दापोली (कोकण) सोडून अमळनेर शहरात आले व शहरातील तत्वज्ञान केंद्रात तत्वज्ञानाचे धडे घेतले त्यानंतर शिक्षण घेत असतांना जवळच कापड गिरणी असल्यामुळे कामगारांचे प्रश्न भेडसावत होते त्यासाठी चळवळ उभी केली आणि कामगारांना न्याय मिळून दिला मग सुरुवात झाली ती स्वातंत्राचे रणसंग्राम तरुणांना घेऊन राष्ट सेवा दल सुरु करुन देशाला आजादी मिळून देण्यासाठी स्वताची काळजी न करता देशा साठी बलिदान गेले तरी चालेल पण देश स्वातंत्र झाला पाहिजे ही इच्छा होती. गुरुजीचे शिक्षण झाल्या नंतर काही काळ शिक्षक म्हणून प्रताप हायस्कुल येथे नोकरी केली. आज तत्वज्ञान केंद्रात गुरुजीचे काही आठवण देखील शिल्लक नाही मी परिसरातील नागरिकांना विचारपुस केली तेव्हा म्हटले की लवकरच संस्कार केंद्र सुरु होणार आहे म्हणजे तत्वज्ञानाचे संस्कार केंद्र होणार एक काळ ज्या काळाने देश, शहर, परिसर, नागरिक यांच्या साठी स्वता पेक्षा जास्ती काळजी घेतली म्हणून आज ताठ मानेने जगतो आहे. शहरातील दुसरे उद्योगपती जे आज जगात खुप मोठे आहे "विप्रो" कंपनीचे मालक ज्यांनी विप्रो कंपनीचा कळस भरला असे आदरणीय हशमजी प्रेमजी यांना साथ ती प्रताप शेठजीची या दोघांनी उद्योग व्यवसायाची गंगा आणली आणि शहरातील लोकांना रोजगार दिला आज विप्रो कंपनीची सुरुवात अमळनेर शहरा पासुन सुरु झाली आणि जागतिक बाजारात पोहचली असे हे शहर पण आज विप्रो कंपनीत फक्त ३०० कामगार काम करत आहे. कधी तरी कंपनीचे मालक आदरणीय आजीम प्रेमजी भेट देण्यासाठी येत असतात पण राजकीय पुढारीच्या गलिच्छ पणा मुळे पुढील येणारे उद्योग सर्व इतर शहरात व राज्यात गेले. तसेच या शहारत सुजलाम सुफलाम करणारे धरण "पाडळसे" यांचे देखील काम निषकाळजी पणा मुळे होत नाही जर हे धरण पुर्ण झाले तर शहरातील सर्व चित्र बदलेल व शहर सुजलाम सुफलाम होईल. पण भ्रष्टाचार रक्ता रक्ताता मुरलेला असल्यामुळे निवडून येणारे फक्त आश्वासन देऊन धरण पुर्ण करणार म्हणणार आणि नंतर विसरुन जाणार या वर्षीच्या अर्थ संकल्पात बजेट मंजुर झाला नाही त्यामुळे काम अपुर्ण आणि निकृष्ठ दर्जाचे होते की काय ही शंका आहे.
आज अमळनेर येथील प्रताप मिलच्या जागेवर गृह सदनिका तयार होत आहे. मिल मधील मशिनी भंगार मध्ये विकून कामगारांना देशोधडीला लावले, ह्या मध्ये कामगारांची चूक नाही असे माझे मुळीच म्हणणे नाही परंतु औद्योगिक कार्यांची दृष्टी नसल्याने प्रताप मिल मधील मशिनी विकून पैसे मिळाले असतील पण शहरातील जनतेचे जन जीवन विस्कळीत झालेले आज बघण्यास मिळते. प्रतापशेटजी हे महान कल्पकता विचारांचे होते म्हणूनच त्यांनी उद्योग नगरी अमळनेर हे स्थळ निवडले पण मिल विकत घेऊन त्या जागी पुन्हा नव्याने मिल उभी राहू शकली असती पण ती दृष्टी नव्हती पैसे कमवणे हा हेतू असल्याने जमीन बाळगून साध्य काय झाले पैसे भरमसाठ मिळाले असतील. जनतेचे कष्टकरी कामगारांचे आशीर्वाद ह्या पैश्या पेक्षा लाख पटीचे राहिले असते. आज शहरात मिल परिसरात ज्यावेळी फिरतो तेव्हा प्रवेश दरातील प्रतापशेटजी व त्यांच्या पत्नीच्या मूर्तीकडे लक्ष जाते आणि सहज त्यांच्या डोळ्यात नजर दिल्यावर असे वाटत होते की खरच ते किती महान होते कि त्यांचे पुतळे उभे केले ते देखील त्यांच्या पुतळ्याच्या वरून संरक्षण छत होते ज्याने करून पुतळे खराब होणार नाही. आज विचार येतो की आपण ह्या महान पुरुषांकडून नेमका कोणता आदर्श घेतला. आपण लक्षात ठेवले पाहिजे आपल्या पुढच्या पिढी समोर आपण कुठला आदर्श निर्माण करत आहोत आणि हे जर होत नसेल तर ह्या पिढीचे वाटोळे लावण्याचे काम करणारी मंडळी शहरात वास्तव्यास आहे.  
अमळनेर शहरात या नंतर एक ही व्यक्ती लाभला नाही ज्यांने शहरातील सौदर्य, विकास, रोजगार या दृष्टीकोनातून प्रमाणिक राहून काम केले असेल त्यामुळेच शहरातील बरेच लोक मोठ्या शहरात वास्तव्याला गेले रोजगार नाही त्यामुळे बाजार नाही जे काही आहे ते फक्त शेती व सरकारी कर्मचारी आणि थोडे फार दैनंदिन कामगार एवढेच काही शिल्लक आहे. शहरात खरच खुप करण्यासारखे आहे पण योग्य नेता नाही आणि जो कोणी येतो तो शहरातील लोकांना खरेदी करुन मत विकत घेतो हा इतिहास कोरला गेला. शहरातील लोक स्वता म्हणतात तालुका विकणे आहे. तसेच सरकारी कामगार यांच्यात असलेली उदासिनता तसेच दबाव यामुळे काम विकासात्मक काम पुर्ण होत नाही सगळ्यात महत्वाचे टेबला खालून घेण्याची सवय लागली असल्यामुळे सर्व ढकलत जाते. पण खरंच हे शहर भकास होत चाललेले आहे यात शंका नाही आज जर राजकीय नेत्यांनी विचार केला नाही तर पुढील पिढी जसे मी ज्या तीन मुर्तीचे नाव घेतो किंवा इतर लोक नाव काढतात तसेच आजचा युवक भविष्यात तीन त्रिमुर्तीच्या शोधात आहे. हे जर नाही झाले तर स्वताची बदनामी व शिव्या खालल्या शिवाय राहणार नाही कारण आज प्रत्येकाला समृध्दी, बदल व विकास अपेक्षित आहे.

मयुर बागुल, अमळनेर

No comments:

Post a Comment