महाराष्ट्र हे राज्य विविध क्षेत्रात
प्रगतीवर आहे. सध्याच्या महाराष्ट्राचा विचार करता जे घडत चालले आहे ते बघता
ब्रिटीश काळ लक्षात येतो. तेव्हा जे अन्याय होत तेच आज देखील होत आहे. फरक मात्र
दोघांन मध्ये वेगळा दिसतो सरकार बदलून आज अडीच वर्ष होऊन गेले पण सर्व सामान्य
जेनतेला दाखवलेले स्वप्न हे फक्त गाजरा सारखे आहे. या राज्यात सरकार कोण चालवतो
आहे हेच सत्ताधारी प्रतिनिधी यांना कळत असून खोटेपणाचे पांघरून घेतांना दिसतात.
राज्यात उन्हाळा तापू लागला शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले परंतु
आपले लोक प्रतिनिधी व विरोधक यावर ठोस विचार करण्यास अपयशी पडत आहे. मागील सरकारने
देखील कर्ज माफी केली होती त्यानंतर परिस्थिती सुधरेल अशी अपेक्षा होती पण पुन्हा
तीच मागणी जोर धरू लागली आहे. कर्ज माफीचा फायदा खरच शेतकऱ्यांना झाला का? जर असेल तर पुन्हा कर्ज माफी का करावी
हा प्रश्न पडणे साहजिक आहे.
मुळात शेतकरी बांधवाचे कर्ज माफ करून परिस्थिती मध्ये सुधारणा होणार आहे का? हे सत्ताधारी व विरोधक यांना कळले
पाहिजे. शेतकऱ्यांच नावाने खोटे सातबारे घेऊन पैसे लुटणारे कमी नाही हे मागील
सरकारने कर्ज माफी केल्या नंतर दिसून आले. शेतकरी बांधवान साठी शासनाच्या विविध
योजना आहे. ज्यामुळे या राज्यात आदर्श शेतकरी म्हणून देखील काही शेतकरी यांनी
पुरस्कार घेतला आहे त्यांना कधी कर्जमाफीची गरज नाही पडली मग ही गरज राजकीय पुढारी यांना कशी पडते. स्वताचे घर
भरण्यासाठी कर्जमाफी चा आसुर बाहेर काढायाचे आणि शेतात राबणारा खरा शेतकरी याला
मात्र बळी पाडायचे ही कुरनीती राजकीय नेत्यांना मध्ये दिसून येते. मुळात शेतकरी
यांना जर चांगले दिवस आण्याचे असतील तर त्यांच्या मालाल चांगला बाजार भाव देणे
गरजेचे आहे. शेतकरी ते ग्राहक ह्या योजनेचे नवे नवे कौतुक झाले आणि नंतर परत
दलालाच्या भिती पोटी माल बाजार समिती मध्ये जाऊ लागला. कृषी उत्त्पन्न बाजार समिती
मध्ये देखील राजकारण करणारे पांढरे चोर शेतकरी बंधूना लुबाडत असतात मग यावर अंकुश
कोणाचे असेल. खालून ते वर पर्यत सगळी कडे सर्व एकमेकात अडकले आहे. प्रत्यक्ष
ज्यांना फायदा होणे अपेक्षित आहे त्यांना होतांना दिसत नाही. सत्ताधारी देखील
कर्जमाफी साठी आंदोलन करत आहे.
शेतकरी कष्ट करतो त्याच्या घामाचा मोबदला त्याला जर शेत मालाला योग्य हमी
भाव दिला तर कर्जमाफीची वेळ येणार नाही. कर्जमाफी साठी रान पेटणारे हे स्वताचा
स्वार्थसाठी शेतकऱ्यांच्या वापर करून घेतांना आपल्याला प्रत्येक वेळी दिसते. आज
शेती करत असतांना वातावरणाचा अंदाज घेऊन नवनवीन तंत्रज्ञानचा वापर तसेच आधुनिक
शेती बद्दल माहिती घेण्यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत कार्यलयाच्या बाजूला शेती
प्रयोगशाळा सुरु केल्या पाहिजे तिथेच जमिनीचे परिक्षण देखील केले पाहिजे आणि
जमीनचा अंदाज घेऊन शेतीत पीक घेतले पाहिजे. पण आपण मौसमचा अंदाजाचा विचार देखील
केला जात नाही आणि शेतीमालाला ज्या मौसम मध्ये भाव दिला पाहिजे त्या मौसम मध्ये
भाव दिला जात नाही आणि शेवटी ज्या दलालांना माल विकला जातो त्यांना मात्र मौसम
नसतांना देखील भाव वाढवून त्यांचा फायदा केला जातो हे चित्र प्रत्येक वर्षी दिसते.
प्रश्न मिटवायचा असेल तर शेतकरीला योग्य मौसम मध्ये पिकला योग्य हमीभाव दिला
पाहिजे. शेतकरी हवादिल होतो पण या देशातील उद्योगपती मात्र मज्जा करतो. देशातील
७५% लोकसंख्या शेती करते पण आता हे प्रमाण कमी झाले आणि शेती करणारा शेतकरी मात्र
शहरात आपला संसार करू लागला हे चित्र बदलणे आपल्या हातात आहे. सर्वात महत्वाचे
म्हणजे शेती विरोधी कायदे संपवले पाहिजे. समाज हा परिवर्तनशील असतो पण जर या
समाजातील नागरिक जर हे परिवर्तन करण्यासाठी सक्षम नसेल तर समाजातील परीस्थित ही
बिघडतांना दिसते. हे चित्र बदलण्यासाठी कर्जमाफी ह पर्याय होऊ शकत नाही तर यावर
सामान्य नागरिक म्हणून सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. सरकार प्रत्येक वेळी कर्ज
माफ करले तर मग ही सवय सतत लागेल. जो प्रमाणिक पणे कर्ज परतफेड करत आहे तो देखील
परतफेड करणार नाही. या सर्व परीस्थिती मध्ये शेतकरी यांच्या साठी जे शासनाच्या
योजना त्या सर्व शेतकरी यांच्या आधार कार्ड वर लिंक केल्या पाहिजे. प्रत्यक्ष
योजनेचा फायदा कशा लाभ्रर्थीला मिळेल यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे.
मयूर बाळकृष्ण बागुल, पुणे
९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment