जीवनात दिवस कसे
धावपळीचे होत जाते यांचा मात्र हिशोबच लागत नाही बरे सकाळ झाली कि लगेच दिवसाचे
काटे कसे भराभर फिरू लागतात कळतच नाही. रात्र कधी पडली हे कळतच नाही असे आजकाल
जीवनाचे झाले आहे पण याच धावपळीच्या जीवनात स्वताचे आरोग्य, कुटुंब याकडे किती लक्ष
देण्यास वेळ मिळतो हे मात्र विचार करायला प्रत्येकाला भाग पाडते. असेच मुंबई व
पुणे शहर जिथे जगणे खूप धावपळीचे झाले सकाळी ७ वाजले कि पहिले चहा मग काय तर ऑफिस
ला जाण्याची घाई गडबड शेवटी नाश्ता काय करायाचा तर ७ रुपायचा वडापाव मग गंमतच
दुपार पर्यत भूकच लागत नाही. वडापाव आणि आम्ही हे एक जीवनातील नाते झाल आहे म्हणजे
कसे भूक लागली कि लगेच कुठे वडापाव ची गाडी दिसते का शोधत सुटतो.
वडापाव
आणि आम्ही हे एक प्रसंग आहे जीवनातील सध्या वाढते शहरीकरण आणि जीवनमान यामध्ये खूप
धावपळ होते आहे. बघाना मुंबई देशाची आर्थिक राजधानी सगळ्या राज्यातील लोक मुंबईच्या
काण्या कोपऱ्यात सापडतील एक वेगळेच जग म्हणावे कि काय सकाळी ते रात्र फक्त काना वर
लोकल चा आवाज आली के बसले आणि सुटली त्यात स्टेशन वर वडापाव फेमस सोबतीला झन झणीत
मिरची आस्वाद काय तरीच वेगळा असतो. साधा वडापाव पण आज मात्र बऱ्याच लोकांचे
उधर्निर्वाचे साधन झाले. सगळी कडे बघा नाश्ता करायचा तर बरेच लोक भूक भाग्वण्यासाठी
वडापाव पसंद करतात. रेल्वे म्हणा किंवा एसटी स्टेशन वडापाव दिसला की तोडातून आवाज
निघालाच बघा वो वडापाव वाले...! मग खाऊन मन समाधान होते पण चव मात्र काही थोडे
वडापाव तयार करणारे वडापाव ची राहते हे मात्र खरे म्हणूनच व्यवसाय हा फक्त पैसे
कमवण्यासाठी नाही तर लोकांचे समाधान आपल्या दर्जेदार वस्तूतून कसे होईल हे देखील
मह्त्त्वाचे आहे. आज जवळ जवळ मोठ्या शहरात शाळा व कॉलेज मध्ये कॅन्टीन मध्ये मुले
वडापाव घेताना दिसतील.
वडापाव ची कहाणी ही माझ्या स्वताच्या अनुभवा वरून
सांगतो मी देखील पुण्या सारख्या विद्येचे माहेर घर येथे शिक्षणा साठी महाविद्यालयात
प्रवेश घेतला नवीन नवीन मित्र तास संपला की कॅन्टीन ठरलेले असायचे नाश्ता काय
करणार सगळे एकच म्हण्याचे आणांना वडापाव ओर च्याह देना म्हणजे काय फक्त वडापाव हे
एकच पोट भरण्यासाठी कुठे फिरायला गेलो तरी वडापाव आणि चहा कटिंग घेणारच गंमत आशी की
मला रसोई मध्ये खूप आवड आहे नवीन नवीन प्रयोग करून नेहमी घरी गेलो की किचन साभाळणारच
आई ओरड्याची काय बाई सारखे काम करतो पण मी कधी असे वाटून घेतले नाही की रसोई फक्त
महिलांना केले पाहिजे म्हणून आज जरी घरी गेलो तरी नवीन काही तरी करून सगळ्यांना
खाऊ घालणार. जवळ जवळ सगळाच संवयपाक करून घेतो मज्जा अशी की वडापाव करायचे ठरवले सगळी
तयारी झाली फक्त अंदाज मात्र घेता येत नव्हता त्यामुळे कधी कच्चा तर कधी पक्का पण
केल्या शिवाय मागे सरकत नाही. वडापाव तयार झाला पण चव मात्र बाहेरच्या वडापाव
सारखी वाटत नव्हती असा काय फरक घरी तयार केल्या पदार्थ मध्ये आणि बाहेरच्या पदार्थ
मध्ये असतो थोडा विचार मनात घुमू लागले.
आज ही
कधी बाहेर मित्रांन बरोबर किंवा बाहेरील दौरे म्हणा वडापाव आणि चहा कधी पाठलाग
सोडत नाही इतर काही घेऊ म्हटले तर मन मात्र खाऊ देत नाही अशी परिस्थिती त्यामुळे
वडापाव हा पोटाची भूक भागवण्यासाठी साधन झाले. वडापाव अशा आहे की यावर देखील
राजकारण झाले आहे म्हणजे सगळ्यात कमी पैश्यात पोटाला आधार देण्यासठी कोणी हा
उद्योग सुरु करावा हे सुद्धा ठरवण्याची वेळ वडापाव मुळे आली होती आज मोठ्या
प्रमाणत वडापाव मुळे लोकांचे पोट भरले जात आहे पण राजकारण करणारे मात्र वडापाव काय
सोडत नाही. म्हणूनच म्हटलो कि वडापाव आणि आम्ही हे नाते थोडे वेगळे आहे...!
मयूर बागुल, अमळनेर
No comments:
Post a Comment