Thursday, November 15, 2018

वेढला विळखा समाज कंटकांनी.


भारत २१ व्या आधुनिक जगात जगत असतांना हे जगणे कुठल्या आधुनिक जगात घेऊन जाणार हा प्रश्न पडतो. कधी काळी देशाच्या इतिहासात परमार्थने लढणारे स्वतंत्र मिळवून दिल्या नतंर आपण खरचं स्वातंत्र झालो आहोत का ? हा प्रश्न पुन्हा पडल्या शिवाय राहत नाही. पाऊले चालती पंढरीच्या वाटे पण ही वाट आपल्याला आषाढी व कार्तिके एकादशीलाच आठवते खरे आहे. संत गाडगे बाबा नेहमी म्हणत बाबानो देव दगडात नाही तो माणसात आहे. पण आपल कसे आपण देव दगडात शोधतो आणि मग सुरु होतो तो विचारांचा उन्मेष हे केवळ आज होत असे नाही गेली कित्येक वर्ष या देशात हे होत आहे ज्यांना कळते किंवा त्रास होतो ते सरळ पळवाट शोधता. आज आपण सर्व पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतो आहे पण कधी त्या घटने बद्दल गांभीर्याने बघणे जमत नाही कारण वेळ आहे कुठे आणि मग या वेळ नसलेल्याचा उपयोग समाजात समाज कंटक घेतात. या समाज कंटकांनी साप सारखे सर्व समाजाला विळखा दिला आहे. आणि या विळख्यात विविध माध्यमातून समाजाची प्रगती कशी विष देऊन संपवण्यात येईल हा विचार चाललेला दिसतो. सध्या खूप वेगळ्या पद्धतीने समाजात विष पसरवण्याचे काम सुरु आहे पण हे विष प्राशन करावे की नाही हे समाजातील प्रत्येक नागरिकाला कळलेलं पाहिजे. आग लावणारे आग लावून देतात तुम्ही आम्ही रॉकेल टाकून आग आजून वाढवण्याचे प्रमाण करतो त्यामुळे समाजातील शांतता नांदत नाही.  

     समाज कंटक कोणाला म्हणायचे हा प्रश्न नेहमी पडत असतो समाजात शांतात नांदत असतांना काही तरी विचित्र प्रकार घडवयाचे आणि प्रसिद्धी मिळवून द्याची साध उदाहारण “भारत माता की जय” हे आपले कर्तव्य व जबाबदारी आहे पण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न त्याला त्यांची जाणीव ही करून दिली पाहिजे पण कडक शासन करायला नको. कसे झाले मी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल की मी मराठा, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जय म्हटल की मी बहुजन, मी अल्ला हो अकबर म्हटल की मी मुसलमान, असे किती महान पुरुषांना एकमेकांन मध्ये वाटून घेतले ज्यांनी वाटून घेतले तेच खरे समाज कंटक आहे. हा देश सर्व धर्म समभाव “धर्मनिरपेक्ष” राष्ट्र म्हणून ओळख असलेल आणि देशाच्या हितासाठी प्राणाची आहुती देणाऱ्याची थोडी तर शरम आपल्याला ठेवली पाहिजे पण तसे होत नाही कारण प्रत्येकाला चटक लागलेली दिसते नाश चढल्या नंतर देखील उतरण्यासाठी वेळ लागतो तशी सर्व परिस्थिती आहे. कमी मेहनती मध्ये जास्त पैसे कमवणारे समाज कंटक समाजात असल्यामुळे या देशाचे नुकसान या विविध गुणांनी संपन्न असणारे राज्य ज्या मध्ये खूप काही दडलेले आहे पण त्या सर्वाची किंमत आपल्यालाच नाही तर मग इतरांनी तरी का करावी. देशातील लोकशाही मध्ये ताकद आहे ती परिवर्तनाची चांगल्या लोकांना संपवणारे आपल्यातील वाईट विचारांचे समाज कंटक ज्यांना जगणे कठीण होऊन जाते असे लोक समाजात विघातक कृत्य करतात आणि समाज त्याचा बळी पडतो. मी भारतीय नागरिक माझी ओळख भारतीय पण आपण हे सर्व विसरून तू कुठल्या जातीचा व मी कुठल्या जातीचा हेच शाळेत प्रवेश घेतांना दाखल्यावर दिले जाते. मुळात देश ही भावना आपण शाळेत असतांना त्या विद्यार्थाला कोणी रुजवली पाहिजे असे का घडत नाही काय बरोबर आणि काय चूक तुम्ही आम्ही ठरवणारे कोण असतो. एखाद्या घटने वर लगेच अतिरेक केला जातो हा अतिरेक घटना समजून न घेता स्वताच्या व बोलणाऱ्याच्या प्रसिद्धी साठी हे समाजातील समाज कंटक करत असतात. आज प्रत्येक ठिकाणी असे समाज कंटक तयार झालेले आहे चांगले जर होत असेल तिथे मुद्दम विरोध करून बदनामी करणार आणि मग घाबरवणे, मारणे व खून करणे असे प्रकार घडवून आणतात कारण ह्या लोकांना बुद्धी नावाची गोष्टच माहित नसते आपण काय करतो आहे हे केल्याने परिणाम काय होणार आहे. हे सर्व करत असतांना करणारे अटकत जातात आणि करून घेणारे ऑफिस मध्ये थंडी हवा खातात खरे तर ह्या लोकांना शासन झाले पाहिजे समाज बिघडवण्याचे काम हीच लोक करत असतात.

      समाज कंटक ही समाजाला लागलेली कीड आहे ही कीड घालवण्यासाठी मुख्य सूत्रधार यालाच कडक शासन होणे गरजेचे पण तसे होताना दिसत नाही कायदे आहे पण त्यातून पण पळवाट शोधून स्वताला वाचवून घेतील पण केलेल्या कृत्याची थोडी देखील शरम वाटणार नाही. जो पर्यत प्रत्येक समाजतील जागृत नागरिक सेवार्थाने देशा साठी समाजासाठी थोडा वेळ देणार नाही तो पर्यत फक्त आपण अपेक्षा करतच जगू आणि वाईट कृत्य करणारे समाजात विष पसरवण्याचे काम करत जातील फक्त हे विष प्रशान करायचे का नाही हे मात्र ठरवले पाहिजे आणि हा विळखा सोडवण्यासाठी प्रयत्न सर्वांनी मिळून करणे गरजेचे आहे.

मयूर बागुल, अमळनेर

९०९६२१०६६९ 

No comments:

Post a Comment