Thursday, November 15, 2018

जगाचा पेशिंदाचा वाली कोण.




            भारत हा देश सुजलाम व सुफलाम म्हणून ओळखला जातो विविधतेने नटलेल्या देशात आज स्वतंत्र मिळाल्या नतंर देखील परिस्थिती मध्ये सुधारणा झालेली दिसत नाही. त्याकाळी ब्रिटिशानी राज्य केले आणि आज देखील स्वार्थी राजकीय पुढारी यांच्या गुलामीत जनतेला उदरनिर्वाह करावा लागतो आहे. खरे बघता भारत हा कृषीप्रदान देश  आणि भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी आधरित उद्योग व व्यवसाय यांच्या वर आधरित आहे. पूर्वी ७५% लोकसंख्या शेती व्यवसाय करत असे तर आता हे प्रमाण दिवसेन दिवस कमी होतांना दिसते आहे. या देशावर राज्य करणारे कॉंग्रेस व भाजप हे दोन मुख्य पक्ष आहे.  कॉंग्रेसच्या काळात देखील तीच परीस्थीती आणि आज भाजप सत्तेवर येऊन देखील परीस्थीतीत बदल झालेला दिसत नाही.
केंद्र व राज्य सरकार यांनी एकमेकांत मेळ घालून कामे करणे आपेक्षित पण केंद्र सरकार राज्याच्या हातातील ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याला स्वायत्ता पाहिजे प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगवेगळे असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रावर जर राज्य आवलंबून राहत असतील तर मग राज्य सरकारने कामे कसे करावे. आज देशात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांन पर्यत पोहचवण्यास अपयक्ष दिसते. केंद्र सरकार शेती विषयक धोरण ठरवतांना जर त्यात नियोजन नसेल तर ते धोरण राबवित असतांन त्यात अडथळे निर्माण होत असतात. शेतीची नाळ ही ग्रामीण भागात रुजलेली असतांना तसेच प्रत्येक गावाला ७३ वी घटना दुरस्ती मुळे मोठ्या प्रमाणात अधिकार प्राप्त झाले पण त्यांची अंमलबजावणी करतांना ताळमेळ दिसत नाही. आज प्रत्येक ग्रामीण भागात विविध कार्यकारी सोसायटी, शेतकी संघ व बँक त्याच्या मध्यातून शेतकरी बांधवान मदत मिळते त्याचं बरोबरीने खासदार व आमदार निधी एवढा आर्थिक स्तोत्र असतांना आज पर्यत असे दिसले नाही की शेतीला पूरक सुविधा ग्रामीण भागात निर्माण केल्या गेल्या आहे.
राज्याच्या ग्रामीण भागात आमदार खासदार निधीतून ग्रामीण भागात काय कामची मागणी झाली तर मंदीराच्या पुढे सभामंडप, वेशीवरील कमानी व लोकवर्गणीतून देवांची मोठी मंदिरे हे सर्व झाले, पण सार्वजनिक उपक्रम म्हणून कृषी माल साठविण्यासाठी एखादे गोडावून का उभे राहिले नाही ? आधुनिक जगात वाटचाल करत असतांना शेतीतल आधुनिक तंत्रज्ञानाची व्यवस्था आम्ही देऊ नाही शकलो ? शेतीची पत व जमीनचा कस बघण्यासाठी आम्ही आज हि तालुका किंवा शहरात धाव घेतो पण आमच्या ग्रामीण भागात आम्ही शेतीची प्रयोगशाळा उभी नाही करू शकलो ? आपल्या मानवी जीवनात प्रत्यक्ष मूलभूत गरजा कोणत्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांची कर्तव्ये आणि आपला लोकसहभाग याचा ताळमेळ घातला गेला पाहिजे. करण्यासारख्या व करून घेण्यासारख्या अनेक गोष्टी असतात पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मी नास्तिक नाही, आणि मला शेतीतील काही फारसे कळत नाही. नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे भाव पडणे , शेतमाल ठेवण्यासाठी योग्य जागा नसणे यासाठी सामुदायिक योग्य गोदामांची गरज वाटत आहे . जिल्हा परिषदांना व पंचायत समित्या व ग्रामपंचायतीना अशी गोदामे बांधता येतात . शेतकऱ्यांचा माल शेतातून मार्केट पर्यंत गोदामांची गरज आवश्यक असेल तर सभामंडप, वेशीवरच्या कमानींपेक्षा आपल्या मूलभूत गोष्टींवर सरकारला खर्च करणे भाग पाडणे गरजेचे वाटते.
महाराष्टातील ग्रामीण भागात शेती करता करता प्रगतशील शेतकरी व साहित्यिक झाले. त्यांना देखील अडचणी जाणवल्या, गरज निर्माण झाली पण त्यांनी कधी स्वताचे भांडवल होऊ दिले नाही. आज मात्र कवियत्री बहिणाबाई चौधरी यांची कविता आठवते.

बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनू नही
हरीनामाईना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वार्‍यानं हाललं त्याले पान म्हनू नही
नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही

पाटा-येहरीवाचून त्याले मया म्हनू नही
नही देवाचं दर्सन त्याले डोया म्हनू नही

निजवते भुक्यापोटी तिले रात म्हनू नही
आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही

नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही
जीले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही

-          बहिणाबाई चौधरी

आज प्रत्येकाला वाटते सर्व काम सरकार करेल पण सरकार असो व विरोधक यांनी शेतकरी बांधवानाचा राजकरणातील भांडवल म्हणून वापर केला व करत आहे. या सर्वान मध्ये भरडला जातो तो सर्व सामान्य माणूस परंतु याला देखील अपवाद आहे. आज बऱ्याच सामाजिक संस्था ह्या शेतकरी साठी काम करत आहे. जर प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांनी ठरवले तर त्यांचे प्रश्न ते स्वता सोडवू शकतात एवढे सक्षम मात्र नक्की दिसतात. शेती साठी लागणारे पाणी, वीज, खत व बी-बियाणे यापैकी पाणी हे श्रमदान करून मिळवू शकते, वीज सौरउर्जा सारखे प्रकल्प हाती घेऊन उर्जा निर्माण केली जाऊ शकते. या राज्यात सत्ता गेल्यामुळे विरोधक “संघर्ष यात्रा” ए. सी. बस व हॉटेल मध्ये राहून काढतात व दुसरीकडे अपक्ष आमदार मा. बच्चू कडू हे “आसूड यात्रा” मिळेल त्या वाहनाने व भेटल त्या ठिकाणी राहणे अशा स्वरुपात आंदोलन करत आहे आणि ही तफावत सर्वसामन्य नागरिकाला दिसत आहे. आधीच्या सरकारने शेतकऱ्यांन लुटले आणि आता आंदोलन करून डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहे. सत्ता हातून गेल्यामुळे हे सर्व प्रकार घडतांना दिसते. शेतकऱ्यांची काळजी असेल तर सह्भागृहात सत्ताधारी यांना सहकार्य करा व समस्यातून मार्ग काढण्यासाठी गोंधळ घालून व कर्जमाफी मागून प्रश्न सुटणारे नाही. मुळात शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वर वर उपाय करून उपयोग नाही तर शाश्वत दुर्ष्टीकोन ठेऊन त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. आज देशात शेतकरी विरोधी कायदे प्रथम बदले पाहिजे शेतजमीन कमाल धारणा कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा व अन्य शेतकरी विरोधी कायदे संपुष्टात यावे यासाठी विरोधक व सत्ताधारी विचार करण्यास तयार नाही. शेतकरी विरोधात जाचक कायदे करून शेतकरीला संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. शेती व्यवसायाला पूरक सुविधा ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्या पाहिजे. शहरात उद्योग व व्यवसाय निमित्त गेलेल्या लोकांनी गावात वर्षातून एकदा श्रमदान करून जलसंधारण व वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम करणे गरजेचे आहे. या सर्वान मध्ये महत्वाचे एवढेच की देश आधुनिक युगात वावरत असतांना त्यामानाने ग्रामीण भागात देखील आधुनिक सुविधांची उणीव दिसते यासाठी सर्व सामान्य नागरिकांनी स्मार्ट होणे गरजेचे आणि जेव्हा आपण सरकारी काम व योजना यांच्या अंमलबजावणी वर स्मार्ट पणे नजर ठेऊन असू तेव्हा मात्र सुधारणा होतांना दिसेल.
या देशात शेतकरी बांधवान साठी व शेती साठी बऱ्याच योजना परंतु त्यांची जाणीव जागृती करण्यास यंत्रणा कार्यक्षम नाही त्यामुळे या योजनेचा फायदा प्रत्यक्ष लाभार्थीला मिळण्यास अडचण निर्माण होते. काहीतर शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात दंग असतात त्यांना फक्त स्वतचा फायदा कसा होईल एवढा विचार असतो. या देशातील प्रत्येकाला वाटते कि शेती व शेतकरी टिकला पाहिजे तरच देश टिकेल हे जरी खरे असले तरी या देशातील नागरिक देखील तेवढाच जबाबदार या समस्या निर्माण करण्यास शेतकरी साठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यास दिरंगाई होते किंवा ती इच्छाशक्ती सरकार मध्ये दिसत नाही मात्र उद्योग व व्यवसाच्या दृष्टीने मात्र त्वरित पाउले उचली जातात. आणि शेतकरी व शेतीला हवालदिल केले जाते त्यामुळेच म्हणावे लागते कि जगाचा पेशिंदाचा वाली कोण हा प्रश्न पडला शिवाय राहत नाही.

मयूर बाळकृष्ण बागुल
संपर्क - ९०९६२१०६९
अमळनेर – ४२५४०१


1 comment:

  1. #dimeapp A wonderful caring gesture from the company which cares for its employees as a family...
    Thank you #dimeappWe at the dimeapp stadium care for all our players. And even in these trying times, we look out for each one of our superstar teammates, where we are needed the most.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.
    At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!
    Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeapp.in11IPL is a testimony of our positivity, and our confidence.
    So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!With this amazing recognition of our great culture, we look forward to the our biggest #dimeapp.in11IPL this year. And we welcome superstars across India to join us in our amazing journey forward.
    Try out with our #dimeapp.inTeam on apply.dimeapp.insports.co.in.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.

    At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!

    Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeappIPL is a testimony of our positivity, and our confidence.

    So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!

    ReplyDelete