Thursday, November 15, 2018

विनोबा भावेचे भुदान ते श्रमदान.


आज सर्वात वादाचा मुद्दा म्हणजे भुदान आधिनियम जो की शेतकर्‍यांच्या मुळावर उठला आहे पण भुदान म्हणजे नेमके काय कोणाला भुदान केले पाहिजे भुदानाची गरज का पडली ह्या सर्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर विनोबा भावेचे नाव लक्षात येते भुदान चळवळ सगळ्यांन माहित असलेली घर व जमीन नसलेल्या बेघर लोकांना जमीन मिळावी यासाठी भुदान चळवळ सुरु झाली हा सर्व इतिहास १८ एप्रिल १९५१ रोजी पहिले भुदान मिळाले मग पुढे १४ वर्ष भारत भ्रमण करुन जनतेने ४७ लाख एकर जमीन भुदानात दिली आणि ती भुमिहीनांना वितरीत केली पण आज सरकारच्या कायद्याद्वारे गरीब शेतकर्‍यांच्या जमीनी ताब्यात घेऊन भांडवलदारांना देण्याचा घाट घातला जातो आहे.
विनोबा भावेनी १९५१ ला भुदान यात्रा सुरु केली तेव्हा नुसताच भारत स्वतंत्र झाला होता सगळी कडे विषमता, जातीय हिंसा या प्रवाहात विस्थापित असलेले आणि स्थानिक यांच्यात संर्घष सुरु या सर्व पार्श्वभुमीवर विनोबांची भुदान चळवळीचा उद्देश जमीनेचे न्याय वितरण व हस्तांतरण आणि माणसा – माणसांची नाते जोडणे १८ एप्रिला जेव्हा विनोबांना पहिले भुदान मिळाले तेव्हा ते म्हणाले होते “जमीनीचा न्याय वितरणाचा प्रश्न कायद्याने नव्हे कत्तलीने नव्हे तर हा गौतम बुध्दाच्या करुणेच्या मार्गानचे सुटू शकतो” विनोबांची भुदान पदयात्रा म्हणजे जमीनदारांसमोर चाललेला प्रदीर्घ सत्याग्रहच होता.
आज मात्र सर्वजण शेतकर्‍यांचा जमीनी सरकारी बाजार भावाने खरेदी करतील आणि भांडवलदारांना किंमत वाढवून विकतील पण आजून भुदान अंर्तगत भारतात २३ लाख एकर व महाराष्ट्रात ४५ हजार एकर भूदान जमीनीचे वितरण शिल्लक आहे ही सगळी जमीन बेघर असणारे अदिवासी व दलित भुमीहिनांना मिळू शकते इंदू मिलच्या जागे साठी जेवढा संर्घष केला जातो तेवढा ताकदीने संर्घष दलित व आदिवासी भुमिहीन लोकांनसाठी होत नाही हे दुरभाग्य आज अनेक अंगाने जमीनीचा प्रश्न उभा राहत आहे जमीनीच्या मालका कडून कंपनीला आणि एका कंपनी कडून दुसर्‍या कंपनी कडे हस्तांतर होत आहे त्यामुळे भविष्यात एखाद्याची इच्छा असूनही त्याला परत जमीन घेता येणार नाही. म्हणूनच आज जनतेने विनोबांच्या भुदान ते ग्रामदान या विचारांन वर लक्ष देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र शासनाने “ग्रामदान आधिनियम १९६४ कायदा” केला आज या अंर्तगत २० गावे ग्रामदान झाली त्यात गडचिरोलीतील लेखामेंढा हे आर्दश गाव ग्रामदान झाले असे असले तरी भु-माफिया गावा गावात जन्मलेले आहे ग्रामदान कायदा बरखास्त करुन यांना जमीनी लुटायच्या आहे हा डाव गावातील सजग नागरिकांनी डावलून पाडला पाहिजे भुमीहिनाला जमीन मिळाणे गरजेचे आहे गावातील जमीनीचे व्यवहार गावातच केले तर गावातील जमीनी बाहेरील कोणी खरेदी करणार नाही हे बघितले तर मोठ्या प्रमाणात गावातील जमीनी ह्या भुमाफिया पासून वाचू शकतील म्हणून विनोबांचे भुदान ते श्रमदान हे प्रत्येकांने समजणे गरजेचे आहे.

मयुर बागुल – अमळनेर

No comments:

Post a Comment