जैसे रचिले अभंग तैसे लाभलेया भक्त बिनभिंतीची संताची पालखी हे चित्र उभा महाराष्ट्र आषाढी एकादशी रोजी बघत असतो. आषाढी वारीनिमित्त पंढरीकडे
निघालेला सकल संतांचा पालखी सोहळा म्हणजे चालती-बोलती शाळा झालेली दिसते संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह संत
ज्ञानेश्वर महाराज, संत
सोपानकाका आणि अन्य संतांचे पालखी सोहळे एका मागोमाग एक असे चालत असतात दरम्यान "वारकरी म्हणजे
बागेतील फुलांचा चौफेर अस्वाद घेणारे फुलपाखरं" अशा या फुलपाखरांना बंद खोलीत
भिंतीच्या आवारात ठेवले तर त्यांच्या काही पचणी पडणार नाही आणि विशेष म्हणजे त्यांच मन ही रमणार
नाही. अशा फुलपाखरांचं मन रमण्यासाठी दरवर्षी विविध ठीकाण्या वरून विठुरायाच्या
दर्शनासाठी संताची पालखी निघते. सर्व वारकरी शिस्तबद्ध जशी शाळेतील मुलांना शिस्त
असते आणि हे दर्शन खरतर सर्वाना खूप काही शिकण्यासारखे असते.
॥कल्पवृक्षाची साउली ।। जैसे वत्सालागी
गाय , जैसे अनाथांची माय, ॥हाकेसरशी घाई घाई , वेगे धांवतची
पायी । आली तापल्या उन्हात , नाही आळस मनात , ॥ खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम
। विष्णुदास आदराने, वाका घाली पदराने॥
वाजवी टाळ, मृदंगांच्या गजरी अश्व दौडले चौखूर माउलीनामाच्या जयघोषाने गेले रिंगण रंगुनी
आसमंत व्यापून टाकणारा टाळ, मृदंगांचा गजर… माउली… माउली… नामाचा अखंड जयघोष करीत उभ्या व गोल रिंगणात अश्वांनी
नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. उडीच्या खेळानंतर हा
सोहळा संताच्या शाळेतील खेळच जणू वाटते. कुठेतरी डोंगराच्या
विस्तीर्ण रांगेत, सुर्यालाही लवकर पोहचता येता येणार नाही इतक्या उंच हिमालयासारख्या पर्वत रांगा आणि खोल असलेल्या
दऱ्या, डोंगरावरूण वाहणाऱ्या
उताराच्या खळखळ नद्या, किलबीलाट करूण कान मंत्रमुग्ध करणारे पक्षी, इकडून तीकडे सारखी
सैरा-वैरा उडणारी फुलपाखरे आणि डोक्यावरूण मायेची हात फिरवून छाया देणारे झाडे
यांच्या सानिध्यात असणारी सुंदर संतांची पालखी बिनभिंतीची शाळा किती गोड असेल ना? या बिना
घंटीच्या शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाचे बंधन नाही. नाही खेळाचे. अभ्यास करावा वाटत
असेल तर तोही
खेळा सारखा फुल
पाखरांच्या सोबत खेळताना. संतांची शाळा म्हणजे विद्यामंदिर या विद्या मंदीरातील देव वारकरी. माझ्या शाळेत
विद्यार्थ्यांना शिक्षकां पेक्षा जास्त महत्व असते. विद्या मंदिराच्या वर्गांची रचना
ही अगदी निसर्गरम्य या वर्गामधील वातावरण हे मंदीरा सारखेच प्रसन्न आणि रमणिय
असेल. दिंड्या हा शाळेचा कणा असतो. वारकरी
हे दिवस रात्र या निसर्गा सोबत बोलत असते, त्यांच्या विचारा मध्ये छान अशी भर पडण्यासाठी अभंगाची
मालिका प्रत्येक वारकरीच्या मुखात एकच जप असतो ती म्हणजे माउली...माउली...माउली एक प्रशस्त प्रयोगशाळा आणि सर्व सोयी सुविधा संतांच्या
विद्यामंदिरात असते. असे हे विद्यामंदिर जगात सर्वात सुंदर मंदिर असेल. या शाळेत
गगनभेदी गजर केल्यानंतर वरुणराजाच्या हलक्या सरींनी पालखी आणि रिंगण सोहळ्यावर
अभिषेक केला असे दिसते. पावसाच्या या हजेरीमुळे वारकर्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
अतीव श्रद्धा आणि
त्या श्रद्धेला काटेकोर नियोजन व कार्यक्षम व्यवस्थापन यांची सक्षम जोड म्हणजे
आषाढीची पायवारी. व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण देणा-या मोठमोठ्या संस्थांमध्ये
प्रवेश घेऊनही व्यवस्थापनाचे जे पाठ शिकता येणार नाहीत त्यांचे मूर्तिमंत दर्शन
घडते पालखी सोहळ्याच्या नियोजनात आणि व्यवस्थापनात. श्री क्षेत्र आळंदीपासून निघून श्रीक्षेत्र पंढरीस पोहोचे पर्यंत
पालखी सोहळ्यात किमान दीड ते दोन लाख समाज सहभागी होतो. त्यामुळे, एक शहरच जणू फिरते आहे, असे वाटते. फिरत्या नगर व्यवस्थापनाचे
धडे वारीत गिरवायला मिळतात. एवढ्या प्रचंड
संख्येने येणार्या आणि चालणार्या समाजाचे नियंत्रण, शिस्तबद्ध चलनवलन, राहणे-खाणे-निजणे या
सगळ्यांची सोय, सार्वजनिक
स्वच्छता व आरोग्य, मलमूत्र विसर्जन
व कचरा व्यवस्थापन, वाहतुकीचे
नियंत्रण आणि पालखीच्या मुक्कामाचे संयोजन यासारख्या प्रत्येक बारीकसारीक
गोष्टीमध्ये व्यवस्थापनशास्त्राची अक्षरश: अगणित सूत्रे दडलेली आहेत.
व्यवस्थापनशास्त्राच्या अध्यापक-अभ्यासक विद्यार्थ्यांनी आवर्जून शिकावे असे
वारीच्या व्यवस्थापनाचे हे ‘मॉडेल’ आहे. अगणित दिंड्यांचा
समावेश असणारा भव्य पालखी सोहळा आणि त्या सोहळ्याचे आज अनेक शतके होत आलेले
स्वयंस्फूर्त, काटेकोर, शिस्तबद्ध नियोजन आणि
व्यवस्थापन हा खरोखरच एक व्यापक अभ्यासाचा विषय आहे. शासनव्यवस्था, संस्थान समिती, सोहळ्याचे मालक, सर्व मानकरी, दिंडी समाज यांच्या
समविचारातून साकारणारे वारीचे संयोजन आणि व्यवस्थापन म्हणजे ‘पब्लिक-प्रायव्हेट
पार्टनरशिप’च्या तत्त्वाचे सम्यक् दर्शनच होय. प्रत्येक दिंडी म्हणजे विशाल अशा पालखी सोहळ्याचे जणू
लघुरूपच! दिंडीतील वारकरी, त्यांचे भोजन, नाष्टा, निवासाची व्यवस्था, पाणीपुरवठा, तंबूंची सोय, दिवाबत्ती, औषधपाणी, स्नान, वाटचाल, सामानाची वाहतूक व देखरेख, दिंडीतील हजेरी, चालताना घ्यावयाची काळजी
या सगळ्याचे १५-१८ दिवस काटेकोर नियोजन करणे ही दिंडीचालक व दिंडी मालकांची खरोखर
एक परीक्षाच असते. दिंडीचे अंतर्गत व्यवस्थापन हाही व्यवस्थापनशास्त्राच्या
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक मोठा अभ्यासाचा विषयच ठरतो.
सलग १५-१८ दिवस वाटचाल
करताना पालखी सोहळा वाटेवरच्या लहान-मोठ्या गावांत मुक्काम करतो त्यावेळी या
सोहोळ्याला सर्व प्रकारच्या पायाभूत सेवासुविधा पुरवताना स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या व्यवस्थापन कौशल्याची खरोखरच कसोटी लागते. पालखी तळ, तळावरील दिवाबत्ती, संरक्षण, कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, पालखी सोहळ्याच्या
निमित्ताने भरणा-या बाजाराचे नियंत्रण, मलमूत्र विसर्जन व सार्वजनिक आरोग्याचे व्यवस्थापन, वाहतुकीचे नियोजन हाही
व्यवस्थापनाचा एक मोठाच प्रांत ठरतो. या सगळ्या
सोहळ्याच्या अशा विविध स्तरांवरील नियोजन व व्यवस्थापनाचा खरे पाहता व्यवस्थित अभ्यास
केला गेला पाहिजे आणि हीच खरी शिकवण महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थीना
दिली पाहिजे.
मयुर बा. बागुल, पुणे – ९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment