Thursday, November 15, 2018

एक पंती वंचितांन साठी उजळो दिवा चोही कडे


जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा अंभग खुप काही सांगून जातो दर वर्षी दिपावलीचा सण येतो मोठ्या प्रमाणात गर्दी खरेदी साठी होते बघावे तिकडे फक्त नजर फिरवावी आणि पाहून थक्क व्हावे अशा प्रमाणात लोक एकदम गर्दी करतात. वर्षीतुन एकदा येणार सण मुला, बाळांना व घरातील मंडळीना नवीन कपडे खरेदी करतात घरातील स्री सर्वान साठी गोड पक्कवान फराळ करते आणि कसे पटकन दिवस निघून जातात बाळ गोपाळांन मध्ये कळत नाही.
हे सर्व जरी आंनदात साजरे करत असतांना भारत देश ६० वर्ष होऊन गेले तरी येथील वंचित्यांचे प्रश्न मात्र सुटत नाही कायदे आसून न्याय नाही योजना असून उपयोग नाही ही परिस्थिती आज शिक्षणामुळे देश प्रगती करत आहे पण पालावर, रस्त्यावर, खाणित काम करणार्‍यांची दिवाळी काय कुठला आंनद, कुठला फराळ, कुठले कपडे कधी दिसत असेल का ? हा प्रश्न मनातील अंत करणा मधून येताना दिसतो खर तर मोठ्या प्रमाणात फटाके खरेदी करुन उडवले जातील पण चिमुकल्यांच्या तोंडात गोड खाऊ मात्र देऊ शकणार का ? रस्त्यावर गाडीचे काच आलगत वाजवणारे चिमुकले हात बघतांना नजर देखील फिरत नसेल का ? आम्ही फक्त म्हणायचे “आम्ही सारे भारतीय” भारत माझा देश आहे सारे भारतीय कधी कधी माझे भाऊ व बहीण आहेत. प्रश्न प्रत्येकाला कळतो पण करणार काय शेवटी स्वताचे ते गोड दुसर्‍याचे ते कडू हा स्वभाव बनलेला असतो. आपण सुट्टी मध्ये फिरायला जातो तसे आपल्या परिवारा सोबत जर या कुंटूबाला फिरायला घेऊन जायचे म्हटल तर शक्य नाही का होणार पण विचार करतो खर्च करण्याचा पण एका वर्षात किती फालतू खर्च करतो हा विचार कधी केला आहे का ? नसेल केला तर नक्की विचार करा.
दिव्याचा प्रकाश हा स्वताच्या घरात जसा उजळून दिसतो तसा दुसर्‍याचा दारात कसा उजळून दिसेल हा थोडा विचार मनात ठेवा. हे आठरा वर्ष दारिद्र्य मिटवणे आपल्या सर्वाच्या हातात आहे त्यासाठी फक्त मनाची इच्छा शक्तीची गरज आहे. नुसती मलम पट्टी करुन जखम बरी होत नाही तर त्यासाठी औषध देखील खरेदी करुन घ्यावे लागतील तसेच आज आपण फक्त वंचित लोकांना सण आला म्हणून फराळ वाटप व कपडे वाटप करुन थोडी दिवाळी नक्की त्यांच्या साठी करा पण ह्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी काय प्रयत्न करता येईल यावर खरे आत्मचिंतन झाले पाहिजे.
आज परिस्थिती बघितली तर सर्व सामान्य जनतेला ही जीवन जगणे कठीण होऊ लागले आहे. जीवनावश्यक वस्तुचे भाव गगनाला भेडले तरी देखील सणा असला तरी आम्ही आंनदात साजरा करु हा खरा प्रामाणिक पणा सण साजरा करण्यासाठी ठेवतो तसा प्रामाणिक पणा प्रत्येक व्यक्तीने जर वंचित लोकांन साठी पुढे केले तर नक्की त्यांच्या चेहर्‍या वरील आंनद तुम्हाला जगण्याची उमेद देईल म्हणतात देव हा देवळात नसून माणसात आहे फक्त तो ज्यांने त्यांने शोधावा मग तो कुठे भेटल हे कधी वेळ सांगून येणार नाही पण खरा परमेश्वर गरीब दिनदुबळ्या लोकांन मध्ये आहे मी श्रीमंत आहे म्हणून मला माझे status सांभाळावे लागते हा Ego बाजूला ठेवला तर परिस्थिती नक्की बदलू शकते पण आपले तसे नाही गरीब तो गरीब आणि श्रीमंत तो आधिक श्रीमंत होत आहे ही दरी भरुन काढली पाहिजे जे मिळते आहे त्यात समाधान राहण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे गरज पुर्ण होत असेल तर गरजूवंताला ती पुढील मदत दिली पाहिजे पण हे सगळ्यांना शक्य होईल असे नाही परंतु जेवढे प्रत्येकाला शक्य होईल तेवढे प्रयत्न नक्की केले पाहिजे.
पाण्याच्या एक थेंबाने देखील प्रवाह सुरु होऊ शकतो तस प्रत्येकांच्या एका सहभागाने देखील प्रश्न सुटी शकतील जे नाही आपुले त्यासे घ्यावे मानूनी सारे जगी नाही सुखी कोणी श्रम करुन भरती पोट ध्यास असा समाजातील योगदानासाठी करुन सारे प्रयत्न बदल समाजातील घडण्यासाठी अशक्य ते शक्य करण्याची जिद्द असावी ठेवला मनी ध्यास नाही कधी हार मानून उजळेल दिवा प्रकाशाचा देईल उजेड चोही कडे प्रश्न असे किती येतील नाही धीर सोडून खंबीर राहिल सामाना करण्यासाठी अडचणीतून देखील मार्ग काढून यशाची ती वाट मिळेल घेतला हा ध्यास वंचितांन साठी प्रकाशाची मळा गुंफण्याचा करतील सारे मदत पाऊल पुढे टाकून.


मयूर  - 9096210669

No comments:

Post a Comment