भारत म्हटले म्हणजे राष्ट्रपिता महात्मा
गांधी आठवल्या शिवाय राहाणार नाही देशाला स्वातंत्र मिळून देण्या मध्ये खुप मोठे
योगदान आहे महात्मा गांधी भारतात आले त्यावेळी खरी कलाटणी सुरु झाली गोपाळ कृष्ण
गोखलेचे शिष्य म्हणून सर्वाना माहित असलेले माहात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतुन
भारतात आले तेव्हा गोखलेनी सांगितले की प्रथम पुर्ण भारत भ्रमंती कर मग काय काम
करायचे ते ठरव त्यावेळी भारतात उपासमारी मोठ्या प्रमाणात दिसून आली आणि बापूनी
प्रत्येकाचा हातात
चरखा दिला मग खर्या अर्थाने चळवळीला सुरुवात झाली संपुर्ण वकिलीच शिक्षण दक्षिण
आफ्रिकेत घेतले आणि सर्वधर्मसमभाव ही भावना समजुन घेतली होती प्रत्येक धर्माचा
पाया नीती हा आहे तरी प्रत्येक धर्मात काही दोष निर्माण झाले आहे तरीही कोणत्याही
धर्माचा त्याग न करता धर्म म्हणजे नितीमत्ता हे स्वीकारुन त्यांनी आपले आचार विचार
घडवायला प्रारंभ केला...!
१९०८ मध्ये पहिल्यांदा जाणीवपुर्वक
तुरुंगात गेले आपण वकील असून कायदा मोडला ही गांधीजीची भुमिका त्यांना झाली
त्यानंतर हिंद स्वराज्य हा मौलिक ग्रंथ लिहून भारताच्या स्वराज्याचा विचार करु
लागले होते आणि मग वकिलीचे वस्र उतरवून सत्याग्रह चळवळीला सुरुवात करुन खादीचा
प्रसार सुरु झाला आणि प्रत्येकाला सर्वेद्याची संकल्पना मांडण्यास सुरुवात केली
सर्वेदय म्हणजे अपरिग्रह, अस्तेय, अहिंसा
यांची सांगड घालून शांततेने सत्याग्रह करणे मिठाचा सत्यग्रह असो कि चंपारण्यचा
सत्यग्रह आंदोलनाचे पावित्र हे शांततेत होते भारतात अनेक मंडळीना गांधीने सहकार्य
केले त्यातले लोकमान्य टिळक होते हरिजनासाठीचे कार्य ते सर्व सामान्याला स्वातंत्र
मिळवून देण्यासाठी स्वराज्या ची संकल्पना आधी गाव सुधारा मग शहरात यावे असे नेहमी
त्यांचे वाचन करतांना जाणवले गांधीने पुर्ण स्वराज्याची मागणी केली आणि सर्व
अर्थाने गणराज्य म्हणून स्वताची घटना असावी असे देखील सांगितले त्यावेळी डाॅ.
बाबासाहेब आंबेडकर कायदेतज्ञ व अभ्यासक हे गांधीने ओळखले होते म्हणूनच आंबेडकरांना
मुंबई प्रांतातुन पुन्हा निवडून आणण्यास सांगितले कारण घटना लिहीणे म्हणजे साधे
काम नव्हते त्यामुळे संसदेचे सदस्य बहाल झाल्या नंतर घटनेच्या मसुदाचे अध्यक्ष
म्हणून आंबेडकरांची निवड झाली आणि खर्या अर्थाने गांधीच्या म्हणण्याने योग्य
व्यक्तीला घटना लिहीण्याचे काम दिले गेले...!
ग्रामस्वराज्य हा ध्यास ठेऊन गावातील
लोकांना खादी उद्योगास प्रोत्साहान देणे देशाच्या स्वातंत्र्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन
उभे राहत होते यांचे नेञूत्व स्वता गांधी करत असत शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून
सतत लोकांना मार्गदर्शन करत गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गावात उद्योग सुरु
करावे आणि गाव विकास करावे आपल्याला स्वातंत्र मिळाले तरी सुध्दा आपण आपल्या गरजा
ओळखून जगले पाहिजे आज गांधीचे अनेक पुस्तक वाचत असतांना फक्त आहिंसा या मार्गाने
देशाचे नेञूत्व करुन देशाला स्वातंत्र मिळून देण्यास खुप मोठे योगदान आहे पण सध्या
प्रत्येक महापुरुषांच्या नावाने फक्त राजकारण केले जाते खर्या अर्थाने त्यांचे
मुल्य, तत्व, निती
यांची जाणिव विसरतांना दिसतात गांधीन मुळे देशात स्वतंत्रा साठी चळवळी व आंदोलन
उभी राहिली मात्र आज आपण खर विचार केला पाहिजे आणि खरे स्वराज्य मिळव्याचे असतील
तर स्मार्ट सिटी एेवजी स्मार्ट खेडे तयार करा.
मयुर बागुल - अमळनेर
No comments:
Post a Comment