आज स्वातंत्र्य दिवस
म्हणजेच ब्रिटीशांच्या गुलामितून सुटका होऊन स्वतंत्र असा भारत देशाची स्थापना आणि
सोनेरी किरणाची उंच हिमालयावर किरणे दिसु लागली. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत
आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व शूरवीर स्वातंत्र्य सैनिक यांना विन्रम
अभिवादन करतो. खर तर देश स्वातंत्र्य झाल्या नंतर देशाला भव्य दिव्यता मिळाली
देशाची नवीन ओळख निर्माण करण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी निर्माण झाली. आज
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण झाली. बऱ्याच काही गोष्टी ह्या ब्रिटीश
राज्यकर्त्याने जो पायदंड टाकला होता त्या पाउलावर पाउल टाकत गेले दिसते. देश
स्वातंत्र्य झाल्या नंतर देश एकसंघ व एकात्मतेत राहिला पाहिजे यासाठी भारत देशाला
नेतृत्व करण्यासाठी कायदेशीर आरखडा पाहिजे जो येथील नागरिकाल त्यांचे स्वातंत्र्य
देईल आणि त्या दृष्टीने २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान हे भारत देशाला
समर्पित करण्यात आले. त्या दिवसा पासून लोकशाही हि आस्तित्वात आली पण हे सर्व झाले
असतांना काही गोष्टी बदलणे गरजेचे होते मात्र ते बदलू नाही शकले त्यामुळेच आज
देखील स्वातंत्र्य असून देखील पारतंत्र्यात व गुलामीत जीवन जगत आहे असे दिसते.
·
न्यायव्यवस्था गतिमान करणे - देशाला संविधान
मिळाल्या नंतर त्या आधारे कायदे करण्यात आले आणि जनतेच्या हक्क व संरक्षणाची
जबाबदारी ही न्यायलय कडे देण्यात आली पण आपल्या न्याय व्यवस्थे मध्ये न्यायलयातील
न्यायधीश यांना संरक्षणाची तरतूद नाही ती आपण प्रथम करून घेतली पाहिजे.
न्यायव्यवस्था गतिमान करण्यासाठी आपण विचार आजून देखील करत नाही. आपल्या
महाराष्ट्र मध्ये जेवढ्या केसेस आहे त्यामानाने न्यायलयांची संख्या कमी आहे
त्यामुळेच तारीख पै तारीख मिळत असते. न्यायव्यवस्थे मध्ये तेथील न्याय निवडा हा
त्या राज्यातील भाषेत होणे गरजेचे आहे. ते जर ब्रिटीशांच्या भाषेत होत असेल तर मग
त्याला स्वतंत्र म्हण्याचे का? न्याय हा सर्वाना साठी सारखा यांची जाणीव
न्यायव्यवस्थेला करणे गरजेचे झाले आहे. न्यायव्यवस्था ही स्वतंत्रपणे व निपक्ष पणे
काम करणे गरजेचे त्यासाठी जनतेचा पाठिंबा घ्यावा कारण ह्या देशात जनता ही उच्च
स्तरावर आहे.
·
शेती – आज देशात सर्वात जास्त समस्याग्रस्त कोण
असेल तर शेतकरी कारण ह्या देशातील व्यवस्थेने व कायद्यांनी त्याला संपवले आहे.
शेतकऱ्याला न्याय मागण्याचा अधिकार राहिलाच नाही. देशाला स्वतंत्र मिळण्याच्या आधी
पासून असलेल कायदे आज देखील तसेच आहे. हमीभाव व कर्जमाफी पेक्षा शेतकरी विरोधी
कायदे संपवणे गरजेचे हे संपवले ही शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. आज
शेतकऱ्याला हमीभाव मिळवा म्हणून आंदोलन करावे लागते तर दुसरीकडे शेती परवडत नाही
म्हणून कर्ज काढून ते माफ करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. ह्या सर्वाचे मूळ
कुठे आहे तर ते शेतकरी विरोधी कायदे जर हे कायदे रद्द झाले तर शेतकरी बांधवावर ही
वेळ येणार नाही. त्यासाठी संविधानातील ३१ B हे रद्द केले पाहिजे. आज शेतकऱ्याला
स्वताचा भाव ठरवण्याचे स्वतंत्र नाही, किती एकरात शेती करावी यांचे स्वतंत्र नाही,
शासकीय प्रकल्पासाठी जमिनीची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. मग ह्या त्याला
स्वतंत्र मिळाले असे आपण कसे म्हणू शकतो. आज शेती संबधित २५० कायदे कदाचित
त्यापेक्षा जास्त कायदे हे संविधानातील परिशिष्ट ९ मध्ये टाकण्यात आले आहे.
परिशिष्ट ९ मध्ये टाकण्यात आलेल्या कायद्यांच्या विरोधात न्याय मागण्यासाठी दरवाजे
बंद करून टाकले मग हा शेतकऱ्यांच्या मुलभूत हक्कांचे हनन नाही का करत. त्यामुळे
न्यायव्यस्थेने शेतकरी विरोधातील जाचक कायदे हे रद्द केले पाहिजे.
·
शिक्षण – देश स्वतंत्र झाल्या नंतर शिक्षण पद्धत
ही बदलणे गरजेचे होते पण ब्रिटिशांनी सुरु केलेली कारकून शिक्षण पद्धत आज ही आपण
राबवीत आहे. आज आपल्या देशातील युवक इतर देशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात मग
आपण का नाही तशी शिक्षण पद्धत किंवा शिक्षण व्यवस्था आपल्या देशात निर्माण करू शकत
लोकांचा सहभाग हा शिक्षण व्यवस्था बदल करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. शिक्षण
व्यवस्थेत देश स्वतंत्र झाल्यापासून आमूलाग्र बदल झाले आज देखील होत असतात पण हे
बदल शिक्षण व्यवस्थेतील विषमता दूर नाही करत तर ती भांडवल शाही शिक्षण व्यवस्था
निर्माण करत आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था मुळापासून बदली पाहिजे. शिक्षणात
स्वातंत्रवाद निर्माण झाला पाहिजे.
·
आरोग्य – आज देशात खूप मोठे संकट असेल तर
आरोग्याचे देशातील लोकांचे आयुर्मान प्रमाण हे कमी झाले त्याला अनेक कारणे आहे.
देश स्वतंत्र मिळाल्या पासून आपण आरोग्य क्षेत्रातील संशोधन करण्यासाठी कमी पडतो
आहे असे जाणवते. आयुर्वेद हे उत्तम गुणकारी आरोग्यासाठी आहे पण आपण विदेशी
कंपनीच्या औषधे मोठ्या प्रमाणत विक्री करतो. हे औषधे ज्यावेळी येतात त्यावेळी
त्यांची तपासणी कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. मुळात आपण बदल्यात काळानुसार आरोग्य
क्षेत्रातील संशोधनासाठी प्रत्येक राज्यात संशोधन केंद्र उभारली पाहिजे.
·
वाहतूक व दळणवळण – देश स्वतंत्र झाल्या नंतर
देशात मोठ्या प्रमाणत औद्योगिक क्रांती झाली १९९१ नंतर जागतिकीकरण स्वीकारले ह्या
सर्वाना मध्ये आपण वाहतूक व दळणवळण ह्या क्षेत्रात देखील सुधारणा केली पण हे करत
असतांना आपण भविष्याचा विचार केलेला दिसत नाही वाहतूक संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
त्याला लागणारे इंधन हे महाग होत आहे त्याला पर्यायी व्यवस्था आपण निर्माण करू
शकलो असतो पण ते होऊ नाही शकले. इंधना संबंधित बरेच चांगले प्रयोग झाले पण त्यांना
आपण मान्यता नाही देऊ शकलो. आपल्या कडे रस्ते हे पैसे कमवण्यासाठी करण्यात आले
असतात त्यांचा दर्जा हा निकृष्ठ असतो तरी त्या संबंधित अधिकारी यावर कार्यवाही होत
नाही. रेल्वे व्यवस्था ही केंद्रवर नियंत्रण असले पाहिजे पण ते प्रत्येक राज्याला
ठरवू दे त्यांना रेल्वे वाहतुकीचे जाळे कसे वाढवायचे. प्रत्येक वेळी राज्याला
केंद्राकडे हात पसरावे लागतात हे कुठे थांबले पाहिजे. प्रत्येक राज्याला त्यांची
स्वायत्ता दिली आहे ती त्यांना स्वतंत्र पणे वापरू दिली पाहिजे. वाहतूक व दळणवळण
संबंधित आपण सौर उर्जावर चालणारे वाहने विकसित केली पाहिजे त्याचंप्रमाणे नवीन
काही निर्माण करण्यापेक्षा आधी जे आहे ते उत्तम करण्याचा प्रयत्न केले पाहिजे मग
नवीन निर्माण केले पाहिजे असे वाटते.
·
युवक – हा देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो
कारण सर्वात जास्त ह्या देशात लोकसंख्या असेल तर ती युवकांची त्यामुळे युवा धोरण व
त्यांची अंमलबजावणी ही प्रत्येक राज्याने केली पाहिजे. राज्यसभा व विधानपरिषद या
प्रमाणे वय वर्ष २५ ते ३५ गटातील युवकांसाठी सरकारने युवा विधीमंडळ सुरु करावे जे
विधानपरिषद सारखे कामकाज बघेल. त्यामुळे कुठलाही देश कधी परफेक्ट नसतो पण त्या
देशातील युवक जर परफेक्ट असेल तर तो देश नेहमीच सर्वच क्षेत्रात अग्रेसर असतो.
देशाला आज स्वतंत्र
मिळून ७० वर्ष पूर्ण होत आहे. हा देश भविष्यात युवकांच्या हातात येणार त्यामुळे
आपल्याला विचारांची मर्यादा ओळखता आली पाहिजे आणि त्या पद्धतीने व्यवस्था परिवर्तन
व ब्रिटीश कायदे जे उपयोगी नाही ते रद्द केले पाहिजे. या देशातील नागरिकाला
त्यांचे स्वतंत्र जगण्याचे अधिकार मिळू द्या गुलामगिरी मध्ये जीवन जगण्यापासून
मुक्ती ज्यावेळी मिळेल तो दिवस खऱ्या अर्थाने स्वतंत्र दिवस असेल.
मयुर बा. बागुल, पुणे
भ्रमणध्वनी – ९०९६२१०६६९ .
#dimeapp A wonderful caring gesture from the company which cares for its employees as a family...
ReplyDeleteThank you #dimeappWe at the dimeapp stadium care for all our players. And even in these trying times, we look out for each one of our superstar teammates, where we are needed the most.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.
At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!
Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeapp.in11IPL is a testimony of our positivity, and our confidence.
So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!With this amazing recognition of our great culture, we look forward to the our biggest #dimeapp.in11IPL this year. And we welcome superstars across India to join us in our amazing journey forward.
Try out with our #dimeapp.inTeam on apply.dimeapp.insports.co.in.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.
At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!
Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeappIPL is a testimony of our positivity, and our confidence.
So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!