Thursday, November 15, 2018

आठराविश्व दारिद्र्य जगण्याची सवय झाली.


ह्या जगात कधी विचार नाही केला की जीवन जगत असतांना कसे जगले पाहिजे. जीवनाची व्याख्या काय असते कधी नाही विचार केला सकाळ झाली की सूर्य उगवतो आणि संध्याकाळी मावळतो तशी ही आमची परिस्थिती रोज वाट बघतो नवीन दिवस उगवण्याची जीवनातील एक एक दिवस मावळण्याची का असे दिवस वाटेला आले असतील कधी विचार करायला वेळच मिळत नाही. कारण आमचे जगणे हे चार पत्राच्या चौकोनी डब्यात सगळी कडे सारखी डबे खाली वर सारखी दिसतील. या परिस्थितीत राहत असतांना नाही कधी विचार करायला वातावरण मिळाले ना कधी मोकळे बोलण्यास जागा मिळाली. नेहमी सतत काही तरी विचित्र विचार डोक्यात फिरत असतात या विचारानं मुळेच जीवनात व्यसनाचे प्रमाण, चिडचिड स्वभाव, मारामारी प्रकार तुम्हांला आमच्या परिसरात फिरतांना दिसतील. पण फिरणारे कधी नाही विचार करणार की या झोपडपट्टी मध्ये राहत असतांना काय अडचणी निर्माण होतात आणि कश्या पद्धतीने जगत असतो हा विचार नाही कोणी करत. आज प्रत्येकाला वाटते की चांगल्या जागी राहण्यास मिळावे शांतता असावी पण ज्यावेळी आमचा पुनर्वसनाचा विचार होतो. त्यावेळी मात्र कुठे तरी शहरापासून दूर जागी काही तरी बांधायचे म्हणून बांधून द्याचे. हे बांधकाम करत असतांना कधी आमचा सह्भाग घेतला जात नाही. कारण ती घर आम्हांला सरकार बांधून देणार असते त्यामुळे मिळते आहे फुकट तर जसे मिळेल तसे घ्या यामुळेच आज झोपडपट्टी मधील व्यक्ती घर मिळून सुद्धा झोपडी सोडण्यास तयार होत नसतात कारण जनतेला स्वताला काय पाहिजे, कसे पाहिजे यांचा सरकार कधी विचार करतच नाही. हे सर्व माझ्या अनुभवा वरून मत मांडत आहे कदाचित चूकीचे असू शकते परंतु सगळेच नाही चुकीचे असू शकत. आज मोठ्या प्रमाणात सरकारी योजना केंद्र सरकार कडून राज्य सरकार कडे राबविण्यासाठी येत असतात यामध्ये किती प्रमाणात लोक सहभाग तसेच बालकांचा सहभाग असतो.

      उद्याचे भविष्य जर नियोजन पूर्वक करायचे असेल तर प्रत्येक क्षेत्रात बालकांचा निर्णय घेत असतांना असणे गरजेचे आहे. पण तसा विचार करतो कोण कारण प्रत्येकाला सवय असते लहान मुलांना काय कळत नाही असे म्हणण्याची परंतु त्याचं वयात मुलांना सगळे कळत असतात आणि त्यानुसारच तो घडत असतो. परंतु आपलं प्रत्येक शहरात झोपडपट्टी मध्ये या लहान मुलांना वर काय परिणाम होत असेल. यांना शिक्षण कसे मिळत असेल. परिसरातील वातावरण हे सर्व घटक या मुलांन वर संस्कार करत असतात मग सुधारणा होणार तरी कशी बेरोजगाराचा विळखा तयार झाला, व्यसनाचे भूत घुसले व गुंडागर्दी चे वादळ तयार होत असते. झोपडपट्टी मध्ये राहतो म्हणजे आम्ही मूर्ख असे नाही सगळे कळत असते. या सर्व गोष्टी आमच्या पण मानलं त्रास देत असतात पण करणार काय आमचं विचार नियोजन करत असतांना फक्त कागदो पत्री दाखवला जातो की काय अशी शंका मनात तयार होत असते. आज झोपडपट्टी मध्ये राहतो ठीक आहे पण उद्या आमच्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करून नियोजन करायला पाहिजे. कारण या देशात जे काही गुन्हे घडतात ते जवळपास झोपडपट्टी मध्ये शहरात येऊन जर राहण्यासाठी जागा मिळत नसेल तर “वोट बँक” तयार करण्यासाठी पत्राचे घर तयार करणारे हे यादेशातील लोक असतात आणि उद्या हेच लोक आमचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यांना हे कळत नाही असे जर प्रत्येक वेळी घडत गेले तर मोठ मोठ्या शहराचे दिवाळे निघेल कारण हे सर्व करत असतांना शहर ही वाढत जातील आणि शहर वाढत असतांना जर योग्य नियोजन नाही झाले तर मग परस्परविरोधी भाडणे होतील कारण ज्या कुठल्या ठिकाणी राहत असतो. तेथील समस्या या एक सारख्या नसतील आणि या समस्यांन वर जर वेळीच भविष्याच्या दृष्टीने नियोजन केले नाही तर जे आठराविश्व दारिद्य जीवनात आले आहे ते तसेच राहून जगावे लागेल का ?

      खर तर आज झोपडपट्टी नसावी असे जरी वाटत असले तरी ते शक्य होण्यासाठी नागरिकांचा सह्भाग आपण योजना व नियोजन करत असतांन घेत नाही तो पर्यत किती जरी प्रयत्न केले तरी हे कमी होणार नाही. त्यासाठी जी.पी.आर.एस चा वापर करून प्रत्येक झोपडपट्टी धारकांची नोदणी करून त्यांचे  पुनर्वसन झालेल्या ठिकाणी पुन्हा तो नवीन कुठे झोपडी तयार करणार नाही. यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वापर करून सहज शक्य होऊ शकते. आज शहरातील जे झोपडपट्टीत राहणाऱ्यांना दारिद्र्य म्हणून म्हणतो ते कमी होऊल असे वाटते तसेच उद्याचे भविष्यातील मुले आहे त्यांच्यातील सवयी सुधारतील यासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.

मयूर बागुल, अमळनेर

९०९६२१०६६९ 

No comments:

Post a Comment