सत्यशोधक
समाज म्हटले की आठवण येते महात्मा ज्योतीराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी
सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि विविध भागात ही चळवळ पोहचली फुलेनी चालवलेली ही
चळवळ खर्या अर्थाने त्यावेळी समाजाला नवीन दिशा देणारी होती शिक्षण ही काळाची गरज
आहे त्यामुळे जास्तीत जास्त समाज प्रगत झाला पाहिजे म्हणून प्रथम मुलीन साठी शाळा
सुरु केली.
समाजाने किती जरी दगडे मारली तरी मागे फिरले नाही आणि “शेतकर्यांचे असुड” सारख्या
ग्रंथातुन शेतकर्यांची व्यथा मांडली हा सर्व भाग समजून घेत असतांना चळवळ म्हटले
म्हणजे अन्याया विरुद्ध पेटून उठणे पिडीत शोषित समाजाला प्रगतशील करणे खरी चळवळ
फुले यांनी त्याकाळी चालवली त्यांच्या बरोबर शाहू महाराज ह्यांचे ही खुप मोठे योगदान
आहे. कारण शिक्षणात प्रथम आरक्षण कोणी दिले असेल तर शाहू महाराजांनी आणि नंतर पुढे
आंबेडकरांनी हा वारसा चालू ठेवलेला दिसतो कारण आंबेडकरांचे एक वाक्य आहे “हिंदू
म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही” हे वाक्य आंबेडकरांचे त्यावेळी का
मनात आले असेल तर खुप प्रश्न उपस्थित राहतात. त्यातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे
मनुसृम्ती यामुळे समाजातील कनिष्ठ वर्ग गुलामगिरी करून जगत होता हे विचित्र असे
चित्र दिसत होते त्यालाच विरोध करुन समाजाला नवीन दिशा दिली.
आपल्या
कडे विलक्षण अशी बोलकी आहे ती म्हणजे "फुले-शाहू-आंबेडकर" आणि त्यात आता
दाभोळकर व पानसरे यांचा उल्लेख केला तर चुक नाही परिवर्तना साठी समाजाला नवीन
सत्यशोधक अशी दिशा देण्याचे काम या दोघांनी केले आज मात्र यांचे आरोपी मौकाट आहे. सतत समाजात विषमता दिसते आणि आपल्या
कडे बहुसंख्य राजकीय व सामाजिक स्वरुपाच्या सभेतुन छत्रपती शिवाजी महाराज,
महात्मा फुले, राजर्षी
शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
अण्णाभाऊ साठे व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इ. उल्लेख आर्वजून
होतो पण यांचे मुल्य, निती व तत्वाचा किती वापर होतो हे खरे
समजणे गरजेचे आहे. कामा पुर्ती नाव घेऊन कुठले आर्दश समाजाला दाखवतो हे समजाणारे
आता समाज मुर्ख राहिला नाही मुद्दा एवढाच आहे की सत्यशोधक चळवळ संपली असा समज करुन
घेणार्यांचा संभ्रम दुर व्हावा परिवर्तन होणे हे आज प्रत्येकाला वाटते म्हणून
"फुले-शाहू-आंबेडकर" हा वारसा समाजाला आभिमानाने सांगावासा वाटतो आणि आज
तीव्र गरज आहे नवीन सत्यशोधक चळवळीची समाजाला परिर्वतना साठी अन्याय आत्याचाराची
संख्या दिवसेन दिवस वाढत चाललेली आहे. समजतील विषमता वाढत चाललेली दिसते. दररोज
शेतकरी आत्माहत्या करतो, राजकारण
करणारे फक्त राजकारण करतात आणि आवाज उठवणार्यांचा गळा कापला जातो.
महात्मा
फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करु सार्वजनिक सत्यधर्म सांगितला तो फक्त
कागदावर नाही तर खर समाजात अन्याय अत्याचारा विरोधात पेटून उठण्यासाठी आज विधानसभा
व लोकसभेत ज्याच्या वर देश चालतो त्या संविधानाची शपथ किती लोकप्रतिनिधी घेतात हा
खुप गांभीर्याचा विषय आहे. तसेच संविधानातील प्रत्येक आधुनिक मुल्यांची प्रस्थापना
झाली पाहिजे स्वातंत्र, समता,
बंधुता, लोकशाही, समाजवाद,
धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा
या मुल्यांची पेरणी आद्याप होऊ शकलेली नाही शिक्षणाचा मुळ उद्देश सत्यशोधन असतो
त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकांने सत्यशोधक बनण्याची गरज आहे आज समाजाला ग्रंथ
गीतेचा अभ्यास नाही तर सखोल संविधानाच्या अभ्यासाची गरज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रुपाने नवी स्मृती दिली तिचा अंमल किती
प्रमाणात होतो हे जाणकरांना चांगलेच कळते त्याच बरोबर समाजातील विदारक चित्र दिसत
असतांना कोणाला काही पडले नाही असे वाटते. दोन वेळच्या सोई साठी उद्याचे कोणी
बघितले हा विचार नष्ट होतो की काय आपल्या मनातील संवैधनक्षिलता संपली का काय हे
तपासणे गरजेचे आहे. आज समाजात जाती व धर्मावर आधरित विष पसरवण्याचे काम सरळीत पणे
सुरु आहे. समाजातील लोक कुठल्या दिशे कडे जात आहे हे प्रत्येकाने सखोल मनात
आत्मचिंतन करुन ठरवणे गरजेचे वाटते आणि जर हे नाही झाले तर उद्याचे भविष्य कसे
दिसेल यांचे चित्र बदलत्या काळात दिसल्या शिवाय राहणार नाही. आपण काय केले पाहिजे
समाजासाठी हा विचार प्रत्येकाने केला तर समाजात बदल नक्की दिसतील. हे करत असतांना प्रामाणिक
पणे सत्यासाठी निष्ठेने काम करणारे जागृत नागरी पाहिजे. समाजाला खर्या अर्थाने
नवीन सत्यशोधक चळवळीची गरज जाणवते यात समाजातील प्रत्येक घटकांने आले पाहिजे आणि
संघटितरीत्या नवीन सत्यशोधक चळवळीला बदलत्या समाजाला परिर्वतनाची दिशा दिली
पाहिजे.
मयुर बागुल, अमळनेर
९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment