निसर्ग म्हटलं म्हणजे डोळ्या समोर दृश्य उभे राहते ते मोठ
मोठे हिरवे हिरवे झाडे, पशु – पक्षी आणि झुळू झुळू मंद गतीने वाहणारे पाणी जणू काही
ह्या महाराष्ट्राच्या विविधतेने नटलेल्या हिरवा शालू आपल्याला सह्याद्रीच्या पर्वत
रांगेत गड व किल्ले फिरतांना अनुभवण्यास मिळतो.
महाराष्ट्र मध्ये काय नाही असे विचारू नका इतर राज्याच्या तुलनेते महाराष्ट्रात
निसर्गाने खुप मोठी संपत्ती दिली आहे. हे आपण आपले भाग्य मानले पाहिजे एकी कडे
सह्याद्रीच्या रांगा तर दुसरीकडे सातपुडा पर्वताच्या रांगा हे खूप मोठे वरदान आहे.
सह्याद्रीच्या कुशीतील असेच एक ठिकाण म्हणजे पुणे – मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा
दरम्यान राजमाची किल्ला आपल्याला दिसतो. हा किल्ला सह्यादीच्या लोणावळा खंडाळा
पासून निघणाऱ्या डोंगररांगामुळे निर्माण झालेल्या परिसर “उल्हास नदीचे खोरे”
म्हणून ओळखला जातो. इतिहास काळात बांधलेला
हा किल्ला प्राचीन काळातील मोठी व्यापारी ह्या किल्ल्याचा उपयोग लष्करी दृष्टीने करत
असे किल्ल्याच्या बाजूने बघितले तर मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर
तर एका बाजूस भीमाशंकर, गोरखगड असा सर्व परिसर आपल्याला राजमाची किल्यावर गेल्या
नंतर नजरेत पडतात.
निसर्ग अनुभव हा आपण घेतला पाहिजे
कारण आजच्या धावपळीच्या जीवनात वेळ नाही असे आपण नेहमी म्हणत असतो पण कुठे
जाण्याचे ठरवले तर आपण तिथे गेले पाहिजे कारण आजच्या शहरातील वातावरणात सतत वावरत
असतांना स्वतः साठी आपण वेळ देणे काही वेळेस आपण विसरतो पण आज ते खूप गरजेचे झाले
आहे. आपल्या महाराष्ट्रात खूप फिरण्यासारखी ठिकाणे आहे. मी घेतलेला रात्रीच्या
वेळी निसर्ग अनुभव, राजमाची किल्ला तेथे गेल्यानंतर त्या किल्ल्याचा इतिहास जाणून
घेण्याचा प्रयत्न तेथील गावातील काही जाणकार व्यक्तीन कडून घेतला. राजमाची
किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बुद्ध लेणी आहे त्याला ‘कोंढाणे लेणी’ असे म्हणतात. ख्रिस्तपूर्व
दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहन काळात अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाच्या नमुना बघण्यास
मिळतो हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा असे जाणकारांचे मत आहे. राजमाची
किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणाचा दरवाजा’ संबोधण्यात येत असे छत्रपती शिवाजी महाराज
यांनी १६५७ च्या काळात आपल्या साम्रज्यात करून घेतला राजमाची वर गेल्यानंतर
मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ला आहेत ह्या किल्लाच्या पायथ्याला उधेवाडी ही
२०, २२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे आणि या लोकांनी व्यवसाय म्हणूनच आपल्या
घरात हॉटेल सुरु केल्या येणारे पर्यटक त्या लोकांचा सोबत रहातात. ह्या वाडीलगतच मारुतीचे
मंदीर आणि पुढे जंगल आहे तेथून पायी जावे लागत वर जात असतांना प्रंचड झाडे दिसतात.
गडावर जातांना गावाच्या वेशी जवळ योधाचे स्मारक, अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजे अवशेष
दिसतात. किल्याच्या माची वर वस्ती होती आत ती खाली वसवलेली दिसते तिला “उधेवाडी” असे म्हणतात. मी किल्ल्यावर रात्रीच्या
वेळी चांदण्या प्रकाशात पाऊल टाकत टाकत जात होतो. उधेवाडी ह्या गावातून वर
श्रीवर्धन गडावर प्रवास करण्यास सुरुवात केली रात्रीच्या वेळी घनदाट जंगल त्यात
विविध आवाज ऐकू येत वर पोहचल्या नंतर सोबत असलेल्या मित्रांनी शेकोटी पेटवली रात्र
जशी जशी होत होती तशी थंडी देखील वाढू लागली आणि वर गेल्यानंतर पूर्वी जिथे गडावर
सैन्य राहत असे तिथे रात्री गुहेत मुक्काम केला. या किल्यावर येणारे प्रवाशी यांनी
काळजी घेतली पाहिजे ती किल्ला स्वच्छ ठेवण्याची कारण मी ज्या गुहेत झोपण्यासाठी
जात होतो तेथे प्रचंड घाण होती मी बऱ्यापैकी स्वच्छ करून घेतले आणि रात्री
किल्ल्यावर झोपण्याची मज्जा अनुभवली चोहीकडे लख अंधार आणि ढगात चांदण्याचा प्रकाशांत
मन निजलेलं होते. जशी जशी रात्र ओसरु लागली आणि सकाळच्या सूर्याचे दर्शन
घेण्यासाठी ४ वाजता वर पुन्हा प्रवास सुरु केला. वर गेल्यानंतर हवा मोठ्या प्रमाणत
सुटलेली आणि चोहीकडे नजर फिरवल्या नंतर फक्त डोंगर दिसत होती या डोंगराच्या
पाठीमागून सूर्याची किरणे दिसू लागली हळूहळू सूर्य उदय होण्यास सुरुवात झाली आणि ओठी
माझ्या कवितेचे ओळी दाटून आल्या....!
सूर्यादय
सूर्यादय
झाला पहाटेचा
खगगण अवघे नभाकडे,
दृष्य मधुर ते पाहुनी अवघे
मोह ही दाटे मनी गडे।
खगगण अवघे नभाकडे,
दृष्य मधुर ते पाहुनी अवघे
मोह ही दाटे मनी गडे।
दूर
ऊभा तो गिरीही निश्चल
तांबुस त्याची कडा पहा,
बहुरंगाने अवनी विनटे
खुलवी रंगा छटा पहा।
तांबुस त्याची कडा पहा,
बहुरंगाने अवनी विनटे
खुलवी रंगा छटा पहा।
खुळखुळ
घुंगुर ध्वनी कायसा
श्रवणी माझ्या येत सुटे,
हंबरती त्या धेनु अन मग
वत्सालागी पयस सुटे।
श्रवणी माझ्या येत सुटे,
हंबरती त्या धेनु अन मग
वत्सालागी पयस सुटे।
किलबिल
पक्षी मधुर गुंजती
चिवचिवाट तो छान किती,
परवचाच तो चला म्हणुया,
आनंदा मग नसे क्षती।
चिवचिवाट तो छान किती,
परवचाच तो चला म्हणुया,
आनंदा मग नसे क्षती।
खर तर सूर्यदर्शन होताना आनंद गगनात मावत नव्हता कारण सकाळीच ती पहाट आणि सूर्याचे
दर्शन माझे मी भाग्य समजतो हे दिसणे. या गडावरून समोर नजर टाकल्या नंतर पावसाळ्यात
दरीतून पाणी पडणाऱ्या धबध्ब्यांचे सुंदर दृष्य दिसत असणार हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत कोसळणारा
पाऊस या परिसरात पडत असतो. श्रीवर्धन गडाच्या बाजूलाच मनरंजन गड दिसतो आणि तिकडे
जाणारी वाट सोपी आहे. श्रीवर्धन गडावर तटबंदी आणि बुरुज आजही चांगल्या स्थिती
बघण्यास मिळतात किल्ल्यावर जातांना दरवाजाच्या कमान बर्यापैकी शाबूत दिसते आणि
किल्ल्यावर जात असतांना वाटेत गुहा म्हणजे पूर्वीच्या काळी दारुगोळा कोठर आहे. माथ्यावर
ध्वजस्तंभ आणि समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका बघण्यास मिळतो. राजमाचीला पूर्व
आणि पश्चिम दिशेला खोल दरी दिसते तिला ‘कातळदरा’ नावाने ओळखली जाते. किल्ला तसा
खूप उंचीवर नाही तरी देखील राजमाची वर जाण्यासाठी वाट जवळ जवळ १५ कि. मी ची आहे. वाटेने
किल्ल्यावर जाण्यास ३ ते ४ तास लागतात. ह्या किल्याच्या पाय्थायाला बऱ्यापैकी
सुधारणा होताना दिसतात.
मोठ्या संख्येने पर्यटक किल्ला
बघण्यासाठी येतात पण महाराष्ट्रातील पर्यटन विभाग पाहिजे त्याप्रमाणात सुधारणा करत
नसल्याची खंत उधेवाडी गावातील रहिवाशी लोकांनी मांडली. खरच महाराष्ट्रात पर्यटन
विकासासाठी मोठ्या प्रमाणात संधी असतांना देखील सरकार त्याकडे कानाडोळा करते आणि
आरबी समुद्रात अश्वरूड पुतळा बांधण्याचे भावनिक मुद्दे पुढे करते. आरबी समुद्रात
भूमी पूजन सोहळा पार पाडून एक वर्षी झाली पण आजून एक वीट देखील रचली गेली नाही
त्यापेक्षा या सरकारने या महाराष्ट्रातील गड व किल्ल्याच्या विकासासाठी व तेथील
प्रसाशन सुधारण्यासाठी खर्च करावा इतर राज्यातील पर्यटनाच्या जाहिराती टी. व्ही.
वर येत असतात पण आमचे पर्यटन विभाग कुंभ करण्याच्या अवस्थेत निजलेले दिसते.
उधेवाडी गावातील लोक स्वभावाने खूप
चांगली होती येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सहकार्याने मदत करतात जेणेकरून किल्ला
बघण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक यावे हि अपेक्षा गावातील रहिवाशी बंधूची असते त्यामुळे
आपण एकदा तरी ह्या किल्ल्यावर जाऊन निसर्ग अनुभव घ्यावा.
मयुर बा. बागुल, पुणे
९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment