Thursday, November 15, 2018

आधुनिक व सेंद्रिय शेती काळाची गरज.


शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठया प्रमाणावर करताना दिसून येतात. परंतु काही पिकांची उत्पादनवाढ तात्पुरत्या स्वरुपाची किंवा काही काळासाठीच असते. याचे कारण असे की, आपण उत्पादनवाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा देतो. परिणामी जर रासायनिक खतांना अधिक व सातत्याने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्यास पिकांना पाणीही मोठयाप्रमाणावर द्यावे लागते. त्यामुळे साहजिकच क्षारांचे प्रमाण वाढते; जमिनी खार वाटतात.

कीटक नाशकांप्रमानेच औषधांचा अधिकाधिक वापर करण्याकडे शेतकऱ्यांना ओढा असलेला दिसून येतो. भाजीपाला, फळे, कापूस इत्यादी पिकांना किडींचा उपद्रव होऊ नये म्हणून कीटकनाशके वापरली जातात. ही कीटकनाशके विषारी तर असतात. त्यामुळे उपद्रवकारक कीटक मरतात. त्याचप्रमाणे काही उपक्रम जीवजंतू ही बळी जातात. निसर्गातील काही जीवाणू वा कीटक शेतीसाठी अतिशय उपयुक्त असतात. गांडुळासारख्या जीवाणूस तर शेतकऱ्यांचा मित्रच म्हटले जाते. अशा जिवाणूंना अशा कीटकनाशकामुळे अपाय पोहचतो.  

आज शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके व तृणनाशके इत्यादींचा वापर कमी करून अन्नधान्याचा दर्जा व अन्न सुरक्षा वाढविणे आणि त्याच वेळी उत्पादन खर्चही कमी करणे. अशा दुहेरी दृष्टिकोनातून सेंद्रीय शेतीला उत्तेजन देण्यामध्ये पुढाकार घेतलेला दिसून येतो. ज्या जमिनीमध्ये आपण पिके घेतोत्या जमिनीचा प्रकार कोणता  त्या जमिनीत      कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेतया सगळ्यांची माहिती करून घ्यायची असेल तर किमान  वर्षातून एकदा तरी माती परीक्षणकरणे गरजेचे आहेत्यानुळे आपल्याला जमिनीची सुपीकता  उत्पादकता किती आहे वकोणती अन्नद्रव्य (रासायनिकसेंद्रिय पदार्थकिती प्रमाणात घालावे याची माहिती माती परीक्षणामुळे होतेआपल्या भारताची लोकसंख्या १२५ कोटीच्या आसपास आहे.यावाढत्यालोकासंख्येमुळेअन्नधान्याची समस्या भेडसावत आहेअशा वेळी परंपरागत चालत आलेल्या शेतीकरण्याच्या पद्धतीला आज आळा घालून आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केला पाहिजेत्यामध्ये संकरीत बियाणांचा वापरकीटक औषधांचा वापरसंजीवकांचा वापर संरक्षित पाण्याचा वापरआणि सर्वात महत्वाचे म्हणजे आधुनिक सुधारित अवजारांचा वापर यांचा समावेश होतोत्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली दिसून येतेसध्या आपण बघतो की असलेल्या जमिनीमधून एकाच पिक घेतल्याने त्यामधील अन्नद्रव्यांचा ऱ्हास होत चालला आहेजमिनीची जडणघडण बिघडत चालली आहेहवा  पाणी घेण्याचे प्रमाण कमी झाले आहेजमिनीची पाणी धारण क्षमता कमी झाली आहेत्याचप्रमाणे खतांचा असंतुलित व अमर्याद वापरामुळे जमिनीत जे कार्यक्षम जीव जंतू आहेतत्यांची संख्या  कार्यशक्ती कमी झालेली दिसून येतेएकंदरीत सगळी परिस्थिती लक्षात घेता जमिनीचे स्वास्थ्य बिघडत चालले आहेत्यामुळे जमिनीची सुपीकता  उत्पादकता कमी झाली  आणि         म्हणूनच शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाल्याचे आढळते.

      पिकांच्या वाढीसाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची गरज असतेत्यापैकी कर्बनहायड्रोजनव ऑक्सिजन हे वनस्पतीला हवा  पाणी यांच्या माध्यमातून तर उरलेली १३ मूलद्रव्ये  जसे नत्रस्फुरद  पालाश हे मुख्य मूलद्रव्ये पिकासाठी महत्वाचे ठरताततसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक ही मध्यम प्रमाणात लागताततर उरलेले जस्तबोरॉनमॉलिब्लेडमक्लोरीनलोहमॅगनीज  तांबे ही सात सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतींना फार कमी प्रमाणात लागतात  ही सगळी १३ मूलद्रव्ये  वनस्पतींना जमिनीतून उपलब्ध होतातही अन्नद्रव्या वनस्पतीच्या शोषणामुळे कमी अधिक प्रमाणात होत असतात. यामुळे जमिनीमध्ये रासायनिक  सेंद्रिय खतांचा ( शेणखतकाम्पोस्त खतपेंड खत  हिरवळीचे खत ) वापर करून त्याची कमतरता भरून काढली जाते आणि म्हणूनच पिकांना लागणाऱ्या उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण जमिनीत किती आहे म्हणजेच जमिनीची सुपीकता पाहण्यासाठी किंवा जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे आणि त्यानुसारच पिकांच्या वाढीच्या गरजे नुसार खतांचे नियोजन करण फायद्याचे ठरते. सेंद्रिय शेती ही फायद्याची नाही असा एक भ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सेंद्रिय शेती ही फायद्याची केली जाऊ शकते याची अनेक उदाहरणे ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी घालून दिली आहेत. रासायनिक खताचा अतिरेकी वापर झाल्यामुळे जमिनीतील कर्वाचे प्रमाण कमी झाले आहे. खते कितीही टाकली तरी पीक वाढीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. बियाणे उत्तम दर्जाचे असले तरी ते उगवून त्याची वाढ होण्यासाठी जो जमिनीचा पाया लागतो, मातीचा पोत आवश्यक आहे तो तयार करण्यासाठी सेंद्रिय खताला प्राधान्य दिले जात आहे. आपल्याकडे काळय़ा मातीचे रूपांतर आता चिकण मातीत झाले आहे. पाणी टाकून एखाद्या रस्त्यावर रोलर फिरवावा त्या पद्धतीची शेतीची अवस्था अनेक ठिकाणी झालेली आहे. सिमेंट रोडसारखी शेती झाली असेल तर त्या शेतीतून उत्पादन कसे घेणार हा प्रश्न आहे. जमिनीत पाणी मुरवण्यासाठी जमीन भुसभुशीत हवी, त्यात हवा खेळती हवी आणि त्यासाठी रासायनिक खताचा वापर कमी व्हायला हवा.

दिवसेंदिवस शहरीकरणाच्या रेटय़ामुळे उपजावू जमिनीचे प्रमाण कमी होत आहे. त्या जमिनीत अधिक उत्पादन घेण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.

मयूर बागुल, पुणे
भ्रमणध्वनी – ९०९६२१०६६९


No comments:

Post a Comment