पाणी
हा निर्सगचा स्रोत पण म्हटले जाते तिसरे महायुध्द जे होईल ते पाण्यासाठी खरच विचार
करावा तेवढा कमी प्रश्न हा पडतो मग पाणी हे कोणाच्या मालकीचे?
आज समाजातील परिस्थिचा अभ्यास केला आणि जर बघितले तर पाण्याची स्थिती
खुप गंभीर होते काही भाग दुष्काळा सारखा व वाळवंट होणार असे सरास बोलले जाते पण
यावर नियोजन करणार कोण आणि पाणी सारख्या गहन प्रश्नावर राजकारण करणे सोडून कधी
विचार होणार का..?
ब्रिटिश काळात टाटा कंपनीने धरण माधून
त्याद्दवारे वीज निर्मीती करत असत आणि त्यावेळीची परिस्थिती ही वेगळी होती
स्वातंत्र नव्हते पण आज समाजातील जनतेला स्वताच्या हक्का साथी सांविधान मिळाले
असून लोकशाही मध्ये राहतो पण खरच त्याला त्याचा हक्कांचे पाणी मिळते का पाणी जर
नैर्सगिक स्रोत आहे कारण पाऊस पडल्या नंतर ते वाहत जाऊन नदीला मिळते आणि नदी ज्या
परिसरात आहे त्या परिसरातील नागरिकांचा समान हक्क त्या पाणी वर पाहिजे तसेच
पाऊसाचे पाणी पडत असतांना मी जर तोड हूगडे केले आणी पाऊसाचे पाणी तोडात गेले तर ते
पाणी माझ्या मालकीचे होते मुद्दा असा आहे की आज पाणीचा व्यवसाय सुरु झाला आहे पाणी
पिण्यासाठी देखील पैसे द्यावे लागतात ही परिस्थीती आहे आज किती तरी शुध्द
पाण्याच्या नावाने सरास कारखाने बाटलीत पाणी भरून पाण्याच्या बाटल्या विकल्या
जातात हे कारखाने चालवतो कोण कधी विचार केला का आपण पण आज पाणी जे आपल्या हक्काचे
ते विकत घ्यावे लागते मग विचार भविष्यात काय काय विकत घ्यावे लागेल हे सर्व
असतांना समाजातील आज आर्थीक विषमता दिसते ती आधिक गंभीर होणार.
सरकार पाण्यासाठी पांटबंधारे विभाग
स्थापन करते धरणे, कालवे बांधते, सिचना
सारखे विविध प्रक्लप तसेच Maharashtra water resource
regularity या संस्था अस्तितवात असतांना आज पाणी नियोजन का
होत नाही विविध ग्रामिण व निमशहरी भागात पाणी ५ ते ६ दिवसा नंतर येते प्रत्येक
व्यक्तीला वणवण फिरून पाणी पिण्यासाठी मरतो पण हे सर्व सामान्याला कधीच कळत नाही
की माझ्या शहरातील नदी किंवा पाटबंधार्याचे पाणी जाते कुठे हा प्रश्न पडला तर
वावगे नाही आज बघितले तर पाणी बॅक तयार होतांना दिसतात मला माहित असलेले सरकारने
सुरु केले ठेवतत्वार पाणी म्हणजे भांडवलदाराना मोठ मोठी धरण व बंधारे बांधण्यास
सहकार्य करतात आणि जेव्हा पाण्याची भीषण परिस्थीती उदभवेल तेव्हा ते पाणी विकत
द्यावे आज ठाणे जिल्ह्यात २ धरण आणि रायगड मध्ये १ धरण बांधण्यास परवानगी दिली
जाते आणि Depository Scheme नावाने
मग सुरु करायचे हे किती योग्य हा आज विचार प्रत्येकाने केला पाहिजे
सिंचना सारखे प्रक्लप करुन हे पाणी
कुठल्या उद्योग धंद्याला दिले जाते हे बघितले पाहिजे कारण आज ऐकीकडे शेतीला पाणी
पुरवठा होत नाही शेत कोरडवाहू होऊ लागले मात्र उद्योग धंद्याना पाणी वेळत मिळते मी
साधारण उदा. तापी पाटबंधार्यांचे पडसळ धरण प्रक्लप कित्येक वर्षा पासून यावर फक्त
राजकारण होत गेले अंध मतदारांना डोळ्यात धूळ फेकली जाते यासर्व प्रकारत भ्रष्टाचार
किती होतो हा वेगळा मुद्दा आहे पण प्रक्लपातील सर्वीक्षणाचा अभ्यास केलातर पुर्वी
२५०० TMC पाण्याची क्षमता असलेले धरण आज १८०० TMC
पाण्याची क्षमता आहे हे ठरवले जाते हा एवढा फरक मागील काही वर्षात
कसा पडला हा प्रश्न चिन्ह आहे. शेवटी परिस्थिती बदल आहे जग तंत्रज्ञान वाढत आहे
कोणाला काही कळत नाही असे मुळीच नाही पण ओरडून ओरडून ऐकणार कोण आवाज केला तर
संपवले जाते ही आजची गुलामी सारखी परिस्थीत आहे कारण स्वातंत्र हे मिळालेच नाही
खर्या अर्थाने म्हणून समाजातील विषमता वाढत आहे सर्व सामान्यांचे हक्क हिरवले
जाते आणि जग्याचे तर जगा नाही तर मरा कोणाला काही पडले नाही असे जर म्हण्याचे झाले
तर किती खर ठरेल हा प्रत्येकांने विचार करण्यासारखे आहे फक्त शहर विकसीत झाली
म्हणून बदल झाला असे नसून पंचायत व्यवसथा जो पर्यत खर्या अर्थाने सक्षम होत नाही
सर्व सांविधानिक हक्काने तेव्हा कुठे बदल झाला असे म्हणता येईल.
पाणी हे मुलभूत गरज आहे असे खर जर असेल
तर मग मला प्रश्न पडतो व विचार करतो की पाणी कोणाच्या मालकीचे...?
मयुर बागुल , अमळनेर
९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment