Thursday, November 15, 2018

शेतकरी सुखी तर देश सुखी.


आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भरपूर लोकांचा शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. जर आपल्या या शेतकरी बांधवाने त्याच्या शेतात काही पिकवले नाही तर आपण काय खाणार? आपण कसे जगणार? पण त्याच्या या कष्टाला आणि मेहनतीला म्हणजेच त्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही. त्याला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. जसे की कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ तर कधी वादळ यामुळे शेतीचे बरेच नुकसान होते. सर्वात महत्वाचे कारण म्हणजे शेतकरी विरोधी कायदे हे इतके जाचक आहे की त्यामुळेच तर आपला शेतकरी बांधव हा आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. पण यावर आपण सर्वांनी मिळून काहीतरी केले पाहिजे.

आपला हा शेतकरी बांधव रात्रंदिवस शेतात राबतो. म्हणूनच तर मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश की धरतीयांसारख्या ओळी आपल्या ओठांवर सहज येतात. शेतकरी सुखी तर देश सुखी’, ‘जिथे राबती हात तेथे हरीअशी शेतीच्या महतीची वचने आपण नेहमी ऐकतो, बोलतो व कौतुकाने लिहितो. परंतु शाळेतील परीक्षांमधील गुणवंताच्या तोंडून मी डॉक्टर, मी इंजिनिअर होणार अशा महत्वाकांक्षा बाहेर पडतात. पण यापैकी कोणीच मी एक आदर्श शेतकरी होणारआणि मी माझे जीवन शेतकामामध्ये झोकून देणार असे कोणीच म्हणत नाही. शेतकरी म्हणजे दुय्यम समाज असा दृष्टिकोन आजच्या या नवीन पिढीचा झाला आहे.

जय जवान जय किसानम्हणून आपण शेतकऱ्यांना गौरवितो. पण त्या शेतकऱ्यांच्या जीवनाचा त्यांच्या अडचणींचा आपण कधीच विचार करत नाही. आपल्या या मातृभूमीसाठी, देशासाठी अन्नधान्य पिकवणारा, सुजलाम सुफलाम धरती बनवणारा हा शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतो. परंतु दोन वेळचे पोटभर अन्नही नीट त्याच्या वाट्याला येत नाही आणि ऐशआरामाचे जीवनही तो जगू शकत नाही. शेतमालाला मिळेल तो दर, सरकारचे वेगवेगळे कर, कायदे यामुळे त्याच्या एकूण उत्पन्नाच्या दहा टक्के उत्पन्नही त्याला मिळत नाही. परंतु या सर्व शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील नफ्याला चटावलेला, सर्व नियम, कायदेकानून खिशात घेऊन फिरणारा आणि पैशाने लालची झालेला व्यापारी या गरीब शेतकऱ्याला पिळत असतो नागवत असतो. अंगमेहनत करूनही त्याच्या कष्टाला मोल राहत नाही असा हा असहाय्य शेतकरी एकदम खचलेला असतो. व्यापारी, दलाल मात्र कष्ट न करताही पैसे लुबाडत असतात आणि शेतकऱ्याचा माल कमीत कमी किमतीत खरेदी करून आपल्या शेतकरी बांधवाला नाराज करतात. त्यामुळे त्याच्या कष्टाला किंमत राहत नाही. 

स्वातंत्रोत्तर काळात सरकारने अनेक सवलती देऊ केल्या. आयकरातून शेती उत्पन्नाला सूट दिली. याशिवाय वेळोवेळी काही कारणांसाठी कर्जे दिली आणि प्रसंगी ती माफही केली. वीजदरात कपात केली असे असूनही शेतकरी अजूनही त्याच परिस्थितीत राहिला. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करू लागला कारण शेती करण्याच्या जुन्या, परंपरागत चालत आलेल्या पद्धती आणि काही अंधश्रद्धाळू पद्धती यांमुळे जास्तीत जास्त नफा मिळत नसल्याने कर्ज फेडणे मुश्किल होते. शेतकऱ्याला शेतीपासून जास्त उत्पादन घेण्यासाठी चांगले बी-बियाणे, खते, यंत्रणा आणि शेतीचे व्यवस्थित नियोजन आवश्यक असते. सहकार्याचा अभाव, तसेच भांडवल नसल्यामुळे अज्ञानी, त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी निसर्गापुढे मात करू शकत नाही. शेती पिकवण्यासाठी आणि जास्त फायदा मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान नाही. भारत हा खेड्यांचा देश आहेकिंवा ऐंशी टक्के भारतातील लोक खेड्यात राहतात. खेड्यांकडे चलाम्हणजेच खेड्यांचा विकास करा असे गांधीजी म्हणत असत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे व आधुनिक तंत्रज्ञानामुळे समाजजीवनाचा पूर्ण कायापालट झाला आहे. धरणे, तलाव, कालवे, बंधारे, बी-बियाणे, शेतीची नवनवीन अवजारे, रासायनिक खते यामुळे शेतीक्षेत्रात बरीच मोठी क्रांती झाली आहे. वेगवेगळ्या सिंचनाच्या पद्धती विकसित झाल्या आहेत, जसे की ठिबकसिंचन, तुषारसिंचन त्यामुळे शेतीला योग्य प्रमाणात पाणी मिळते आणि पाणीबचत सुद्धा होते. दोन बैलांना धरून नांगर चालविणाऱ्या शेतकऱ्याच्या जागी शर्ट पॅंट घालून ट्रॅक्टर चालविणारा आपला शेतकरी बांधव दिसू लागला आहे. पण सरकारी कायदे मुळे त्याला स्वतंत्र्यपणे शेती करू दिली जात नाही. आपल्याकडे हवामान खात्याचे अंदाज कधीच अचूक ठरत नाही. शेतीत बियाणे पेरून शेतकरी पाऊसाच्या प्रतिक्षेत असतो. हवामान खात्याचे केंद्र फक्त पुणे का? प्रत्येक जिल्ह्यात हवामान खात्याचे केंद्र असले पाहिजे पण यावर कोणी विचार करायला तयार नाही. महाराष्ट्रात किमान आपण असे केंद्र उभारली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला हवामानाच्या अंदाजा नुसार पिक पद्धतीत बदल करतील. सरकारने पीक विमा योजना सुरु केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन परंतु यामध्ये देखील शेतकऱ्यांचे स्वतंत्र्य हिरावून घेतले कारण त्याला पीक विमा कुठल्या कंपनीचा काढ्याचा हे ठरवता येत नाही सरकार सांगेल त्या कंपनी कडे त्याने पैसे भरावे हा निव्वळ मूर्खपणा आहे. ज्यावेळी विम्याची भरपाई देण्याची वेळ येते तेव्हा मात्र सगळयांचे हात दगडाखाली अडकले जातात. ही परिस्थिती जर शेतकऱ्यांची करून ठेवली असेल तर त्याने जीवन जगायचे तरी कसे. यासाठीच शेतकऱ्याला स्वतंत्र्य दिले पाहिजे. शेतकरी विरोधी जाचक कायदे संपवले पाहिजे. ज्या दिवशी शेतकरी विरोधी कायदे संपतील तो दिवस शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सोनेरी क्षण असेल.

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
भ्रमणध्वनी – ९०९६२१०६६९


1 comment:

  1. #dimeapp A wonderful caring gesture from the company which cares for its employees as a family...
    Thank you #dimeappWe at the dimeapp stadium care for all our players. And even in these trying times, we look out for each one of our superstar teammates, where we are needed the most.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.
    At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!
    Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeapp.in11IPL is a testimony of our positivity, and our confidence.
    So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!With this amazing recognition of our great culture, we look forward to the our biggest #dimeapp.in11IPL this year. And we welcome superstars across India to join us in our amazing journey forward.
    Try out with our #dimeapp.inTeam on apply.dimeapp.insports.co.in.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.

    At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!

    Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeappIPL is a testimony of our positivity, and our confidence.

    So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!

    ReplyDelete