Thursday, November 15, 2018

आमची वाटचाल नेमकी कुठल्या दिशेने.



       मागील काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमधील निवडणुका झाल्या ज्या प्रमाणे ह्या निवडणुका लढवल्या जात आहे. हे बघितल्या वर मिडिया व वृत्तपत्रात दिसणारे वृत्त ह्यावरून अंदाज लावला तर लक्षात येईल की देशाला स्वतंत्र मिळवून ७० वर्ष पूर्ण झाली आणि आज देखील आमचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आमचे राज्यकर्त अपयशी झाले असे सतत दिसते. मागील काही दिवस मी ग्रामीण भागात फिरलो परिस्थिती खूप विदारक आहे प्रंचड तापलेले ऊन आणि पाण्यासाठी वनवन फिरणारे लहाना पासून ते मोठ्या पर्यत असे काही चित्र आज देखील काही ग्रामीण भागात आहे मग शहरात राहणाऱ्याल गावाकडील परिस्थिती कशी लक्षात येईल नुसते जाऊन फिरून आल्याने परिस्थिती लक्षात नाही येणार किमान पंधरा दिवस तरी गावात राहून बघितले तर कळून येते. मी सुरुवातीला निवडणुकीचा विषय मांडला कारण देशात लोकशाहीचा गळा घोटला जातो आहे असे विरोधक सतत ओरडत असतात मला कळत नाही हे आजच होत आहे का? कॉंग्रेस आणि भाजप दोघे ही एकामाळेचे मनी आहे. हे देशातील जनतेला कळत नाही का? कॉंग्रेस मधील नेत्यांनी भ्रष्टाचार केला म्हणूनच भाजपला निवडून दिले पण ते तर महाचोर आहे कारण त्यांच्या कडे चेहरेच नाही सगळे आयात करून खुर्चीवर बसवलेले आहे. देशातील जनता ह्या दोघां वितरिक्त तिसरा पर्याय बद्दल का चर्चा करतांना दिसत नाही बर जनता सोडून देऊ पण मिडिया व वृत्तपत्र यांनी तरी आपले स्वतंत्र लक्षात घेता तिसऱ्या पर्याय बद्दल जनते मध्ये प्रबोधन केले पाहिजे.

       देशातील सध्याच्या परिस्थितीतून येणाऱ्या भावी पिढीवर संस्कार काय दिले जात आहे हे राजकीय व्यक्ती विसरत आहे. मी जेव्हा जेष्ठ व्यक्तीन सोबत चर्चा करायला बसतो तेव्हा त्यांना विचारतो की हा राजकारणातील बदल असा कश्यामुळे घडला. मला जाणकारांनी सांगितले असे की इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर जनता दल सत्तेत आले आणि पुन्हा काही दिवसांनी इंदिराजी यांचे सरकार सत्तेत आले तेव्हा पासून खऱ्या अर्थाने राजकारण बदलत गेले आणि ते तर आत खूप खालच्या पातळीला गेले आहे. मी त्यांना विचारले हे सर्व तुमच्या डोळ्या समोर घडते आणि आमच्या सारख्या तरुण पिढी समोर राजकारणातील घोडे बाजार होतात आणि ते सरळ सरळ मिडिया आणि वृत्तपत्रातून चर्चेला जातात हे बघून लोकशाही मध्ये हे घटनाकारना असे अपेक्षित होते का? मिडिया हा चौथा स्तंभ आहे आपण काय दाखवत असतो ह्याचं विचार करत असतील का कारण आज तंत्रज्ञान मुळे सर्व काही जवळ आले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम काय होत असेल हा विचार कधी करणार आहोत. देशाची प्रगती ही राजकीय व्यक्तीच्या हातात असते आणि ते जर घोडे बाजार करून सत्ता स्थापन करत असतील तर मग देशाची वाटचाल आमची नेमकी कुठे चालू आहे. आज राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील निवडणुका जर बघितले तर फक्त जातीय आणि  अर्थकारण घडत असते पण सर्वात जास्त प्रमाण अर्थकारण आहे मला प्रश्न पडतो हा पैसा नेमका येतो कुठून? मला काहीजन मूर्ख समजत असतील कारण माझ्या पप्रश्नाचे उत्तर सहज कोणीही देऊ शकेल परंतु आपण यावर कधी विचार करणार आहोत का हे जे घडत असते त्यांचा येणाऱ्या पिढीवर काय परिणाम होत आहे.

मी एका ग्रामीण भागात्तील निवडणूक बघितली पुढारी मंडळी प्रतिष्ठा मिळावी पद मिळावे म्हणून पैसा खर्च करून लढवता. जी निवडणूक लढवली जाते त्यातून नेते मंडळी ही मतदार यांना पैसा वाटते ते देखील लहान मुलांच्या डोळ्यासमोर तेव्हा त्याला नक्कीच कळत असेल नेमक काय प्रकार घडत आहे. मला हेच सांगायचे आहे की अश्या घडणाऱ्या घटना थांबले पाहिजे नाहीतर भविष्यातील पिढी कशी घडणार हे आपल्याला समजत असेल. सर्वच तसे नसता पण प्रमाण बघितले तर लक्षात येईल. पूर्वी निवडणूक लढण्यासाठी जनतेतून निधी गोळा करून निवडणुका लढवला जात होते पण आज चित्र उलटले आणि आमचे निवडणूक आयोग नेमक काय काम करत असते निवडणूक खर्चाची मर्यादा ठरवून दिले असतांना खर्च बघितला तर मोठ्या प्रमाणात होतो आणि याची चर्चा देखील मिडियावर होते तेव्हा निवडूक आयोग यावर काही पर्याय का नाही शोधत. त्यात महत्वाचे म्हणजे बोगस मतदार यादी यांची तर काही कमी नाही. निवडूक आयोग स्वायत्त असतांना तसे काम होताना दिसत नाही. मला वाटते लोकतर निवडूक आयोग वर देखील संशय घेत असतात. असे सर्व चित्र आपल्या देशात घडत असते हेच चित्र इतर विकसित देशात देखील घडत असते का? मग आपल्याला नाही का वाटत आपला देश देखील विकसित झाला पाहिजे. आपला देश इतर देशा पेक्षा खूप श्रीमंत आहे पण आपलेच नेते मंडळी आपली गरिबी इतर देशा समोर दाखवत असतात. आपला देश इतर देशावर सत्ता केंदित करू शकतो एवढी ताकद आहे पण “आपलेच घोडं पेंड खाते” आपल्या देशात सगळेच वाईट आहे असे मुळीच नाही. मला फक्त एवढच वाटते के आपण कुठलेही कार्य करत असतांना विचार केला पाहिजे की जे करतो आहे त्यांच्या भविष्यातील पिढीवर काही वाईट परिणाम तर होणार नाही ना.

       आपण आपल्या देशात इतर देशा प्रमाणे व्यवस्था निर्माण करू शकलो असतो तर आज बाहेरील देशात आपल्या देशातील जनता गेली नसती. जी गेली ती तेथील व्यवस्था आणि तेथील सुविधा ह्याचे आकर्षण मुळे गेले आणि आपल्या कढील नेते मंडळी इकडे कमवतील आणि तेकडे घर दार करतील काहींनी केली देखील आहे. तुम्ही आम्ही फक्त रोजच्या सुख सुविधा साठी भांडत बसा असे वास्तव आहे. हे बदले पाहिजे आणि हीच ताकद लोकशाही मध्ये आहे पुन्हा पुन्हा कॉंग्रेस आणि भाजप हेच चित्र देशात राहिले तर मग कुठली लोकशाही म्हणावी त्यामुळे ह्या दोघांना बाजूला ठेवावे आणि तिसरा चांगला पर्याय कोण होऊ शकतो त्यांचा मागे सर्व देशवासीयांनी उभे राहावे नाहीत पुन्हा पहिले पाढे पंचावन्न म्हणावे लागतील.

       देशात सुधारणा व्हावे इतर देशाच्या बरोबरीने आपण देखील अविकसित न राहता विकसित देश म्हणून आभिमाने कधी म्हणू त्या दिवसाची वाट किमान ह्या जन्मात तरी बघण्यास मिळो. देशासाठी सगळ्यांनी मिळून एक झाले पाहिजे आपले झाले म्हणजे जबाबदारी संपली ही भावना ठेऊन फक्त जीवन जगणे म्हणजेच जीवनाचे सार्थक झाले असे नाही. देशाचा नागरिक म्हणून देशातील लोकसभा व विधानसभा येथे आपल्याला जाणीव व जबाबदार, अभ्यासू नागरिक देशाची प्रगती घडवण्यासाठी पाठवणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.

मयूर बा. बागुल
पुणे
९०९६२१०६६९   








No comments:

Post a Comment