Thursday, November 15, 2018

याला जबाबदार कोण


               आज २१ व्या शतकात जगत असतांना देशाची लोकसंख्या बघितली तर दिवसेन दिवस वाढत आहे जन्मदर आधिक व मृत्यदर त्यामानाने कमी म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट होतच राहणार यात वाद नाही यावर नियोजन करणे कोणाची जबाबदारी असेल हे ठरवणे प्रत्येकाचे काम जगात चिन नंतर दुसर्‍या क्रमांका वर भारताचा नंबर लागतो पण हे सगळे वाढत असतांना त्यामानाने संसाधन आपल्या कडे उपलब्ध आहेत का ? हा प्रश्न आहे ह्या सर्वाचा परिणाम निर्सग, पर्यावरण, आरोग्य, रोजगार ह्या विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होतांना सध्या दिसते यावर नियोजन करणे गरजेचे आहे नाही तर भविष्यात खुप मोठा धोका असेल हे दिसते
                आज देशाला विविध समस्याने ग्रासले आहे यात नैसर्गीक आपत्ती सारखे घटना घडत आहे यात अंसख्य नागरिक मरण पावत त्याच प्रमाणे जखमी होत यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे या घटना का घडतात मागे माळीण येथील र्दुघटना माहित असतांना देखील आज मोठ्या प्रमाणात डोगराच्या पायथ्याशी लोकवस्ती दिसते मग परत जर काही र्दुघटना घडली तर जबाबदार कोणाला ठरवणार हि परिस्थिती सगळी कडे आहे.
              पर्यावरणचा सगळ्यांनी जीव घोटायला सुरुवात केली आहे वृक्ष तोड, डोगर फोड, नदी प्रदुषित मग नैर्सगिक आपत्ती येणारच मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात डोगर फोडली जात आहे पण यावर नियोजन काही कारण डोगर हे निर्सग निर्मित आहे आपण निर्सगाचा सृष्टीचा अंत करायला सुरुवात केली तर मग सृष्टी कुठल्या तरी मार्गाने मानवाचा अंत करणारच हे कोणाला समजत कसे नसेल अवकाळी पाऊस, दुष्काळ हे सर्व यांचा परिणाम आहे मोठ मोठे सिमेट चे टावर उभे राहत आहे रस्ता वर रोज नवीन एक गाडी धावत आहे प्रदुषण कसे थांबणार पुर्वी म्हणजे २० वर्षी आधी सगळे जण सुखाने आंनदाने एकत्र कुंटूब मध्ये राहत असे आणि पायी व सायकल वर चालत पण आज हि परिस्थिती दिसत नाही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून शहरात स्थालांतर झाले केवळ रोजगारा साठी आणि सरकार देखील यावर गंभीर नाही आज एवढ्या MIDC दिसतात पण फक्त मोठ्या मोठ्या शहरातच उद्योग धंदे वसलेले आहे निमशहरी व ग्रामीण भागात फक्त शेती व व्यवसाय सुरु आहे पण शेतीला जोड धंदा देखील विकसीत झालेले नाही मोठ्या प्रमाणात बेरोजगार दिवसेन दिवस वाढत आहे प्रत्येक जण म्हणते सगळी जबाबदारी सरकारची असा समज आहे मग नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय राहते हा विचार नको का करायला आपण नुसतीच शहर विकसीत करत आहोत ग्रामीण भाग व निमशहरी भाग विकसीत झाले पाहिजे
               शेवटी प्रत्येक जण फक्त क्षणिक सुखा साठी जगत आहे भविष्यात काय घडणार व आपण आज काय करतो आहे निर्सगाची हानी यांची जाणिव होतांना खुप कमी प्रमाणात दिसते आणि हे असेच जर चित्र राहिले तर एक दिवस अंत नक्की आहे.


मयुर बागुल, अमळनेर

No comments:

Post a Comment