आजच्या युगामध्ये स्त्री हि पुरुषाएवढीच आघाडीवर असलेली आपल्याला पहावयास
मिळते. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय
क्षेत्रात ती पुरुषांच्या बरोबरीने काम करताना प्रगती पथावर आहे. अर्थाजानामध्येही
ती पुरुषाएवढीच काही ठिकाणी त्यापेक्षाही जास्त करताना दिसते. साहजिकच
पूर्वीपेक्षा आताच्या युगात स्त्रीला समाजात मोठे स्थान प्राप्त झाले आहे. ते तिने
स्वत:च्या कर्तृत्वाने, कष्टाने, बुद्धीमतेने मिळविलेले आहे. यात
शंकाच नाही. एकूण सर्वच बाबतीत स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर आहेत.
हे जरी खरे असले तरी या सर्व गोष्टी काही ठराविक वर्गापुरत्या मर्यादित आहेत. काही
ठराविक स्त्रियांच्या बाबतीत खऱ्या आहेत. स्त्री सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे असे
म्हटले तरीही तिच्यावर अन्याय होताना आजही दिसून येतोच आहे. आजही वर्तमानपत्र
उघडले कि जास्तीत जास्त स्त्रीयांबाबाताच्याच अन्यायाच्या बातम्या जास्त असतात.
नवविवाहितेच्या आत्महत्या, सुनेचा छळ करून
मारले, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या
अश्या बातम्याच जास्त असतात. शहरी भागात आजच्या ‘एक या
दो’च्या काळात मुले आणि मुलांना काही अंशी समान स्वातंत्र्य
दिलं जातं. पण ते प्रमाण फारच कमी आहे. काही प्रगत दृष्टिकोनाच्या कुटुंबात
स्त्री-पुरुष भेदभाव केला जात नाही. तरी उरलेल्या ९०% घरातून आजही हा भेदभाव
आढळतोच. पूर्वी तिला अबला म्हटलं जायचं, पण ती सबला आहे,
हे जरी तिने दाखवून दिलं तरी पुरुष ते मानायला तयार नसतात. एकीकडे
ती जेवढी आधुनिकतेकडे झुकतेय, सर्व क्षेत्रात पुरुषांइतकीच
कर्तबगारीने झळाळून उठतेय, तितकीच तिच्यासमोरची आव्हानंही
वाढत आहेत. आजची स्त्री आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी दिसत असली तरी,स्वत:च्या कमाईचे पैसे ती आपल्या मनाने खर्च करू शकत नाही. अगदी कित्येक
उच्चशिक्षित बैकांचे नवरे तिच्या पगाराकडे डोळे लावून बसलेले दिसतात. त्यांचा
विनियोग कसा करायचा हे नव-याच्या मताने ठरतं, अशी उदाहरणे
पाहण्यात येतात. शिवाय घरची सर्व कामं तीनच करायची, मुलांच्या,
नव-याच्या खाण्यापिण्याची काळजी, मुलांचा
अभ्यास, त्यांची आजारपण इ. तिनेच पाहावं अशीही नवा-यासकट
उरलेल्यांचीही अपेक्षा असते. ह्यात स्त्रीला कुठलं स्वातंत्र्य मिळतं.? म्हणजेच कालची ती सामाजिक प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, रूढी इ. नि गांजलेली होती. आज तिची
केशभूषा, वेशभूषा आधुनिक झाली. काही बाबतीत तिच्यात पुरुषीपणाही
जाणवतो, पण तिचं स्त्री असणं हेच पुरुषांच्या दृष्टीने तिला
कमी लेखण्यासाठी पुरेसं असतं. सहज बोलता बोलता ते म्हणतात, “बायकांना
काय अक्कल असते?” म्हणजे सगळा अकलेचा मक्ता त्यांच्याकडेच
देवाने दिलेला असतो, अशी त्यांची ठाम समजूत असते.ही विचार सरणी
घातक आहे. सध्याच्या सरकारचं “बेटी बचाओ, बेटी पढाओ” हे
ब्रीदवाक्य आहे, हे खरं असलं, तरी
स्त्रीबाबतचा दृष्टिकोन बदलण्यासाठी असंच काही ब्रीदवाक्य योजण्याची गरज आहे. पाहा
बरं काही सुचतंय का? शिक्षित वर्गातही पहिली पत्नी सुगरण,
सुस्वभावी, समजूतदार असली तरीही तिला मुलीचं
झाल्या तर तो दोष तिचाच समजून पतीचा दुसरा विवाह लावला जातो. मुलगा व मुलगी होणे
हे स्त्रीच्या हातात नसते हे न कळण्या इतपत समाज मागासलेला तर आता नाही ना?
तरी पण या ठिकाणी काही गुन्हा नसताना स्त्रीला अन्याय सहन करावा
लागतो. साधारणपणे लग्नाला ५-६ वर्षे झाली न घरात पाळणा हलण्याची चिन्हे दिसली
नाहीत कि योगीबाबा, डॉक्टर तपासण्या चालू होतात. त्यात प्रथम
स्त्रीच्याच केल्या जातात. मुल जन्माला येण्यासाठी दोघेही तेवढेच जबाबदार असतात.
पण स्त्रीला प्रथम दोष लावण्यात येतो. का? तिच्यात काही दोष
नाही असे समजल्यास कसातरी तयार होऊन पुरुष डॉक्टरकडे जायला तयार होतो. या चाचण्यात
स्त्रीच्यात दोष निघाला तर पुरुष या कारणावरून तिच्या संमतीने अथवा तिच्याशी
घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्यास सिध्द होतो. पण पुरुषांमध्ये दोष आढळला तर एक तरी
स्त्री त्याच्यापासून घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचे आपल्याला आढळते का ?
आधुनिक समाजरचणेमध्ये स्त्रीला घराबाहेर पडून पुरुष्याच्या बरोबरीने
अर्थार्जन करणे हे अपरिहार्य झालेले आहे. घरची व
बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी तिला सांभाळावी लागत आहे त्यामुळे तिची तारे वरची
कसरत होत असते. याचा विचार शासकीय पातळीवर होऊन स्त्रियांना बालसंगोपनासाठी
आवश्यक असणाऱ्या प्रसूतीरजा,व अन्य सवलतींचे
कायदेही झाले आहेत, कामाच्या ठिकाणी पाळणाघरे, जेवणाच्या सोयी, भोजन गृहे वै योजना राबवतात
त्यामुळे त्यांना सुविधा मिळते. आजकाल गृहोपयोगी अत्याधुनिक साधने जागोजागी नवनवे
मॉल झाल्याने त्यांना वेळोवेळी फ्रेश असे साहित्य, नित्योपयोगी
वस्तू , गर्जे नुसार त्वरित मिळतात त्यामुळे तिचे घर
गृहस्तीचे कार्य अगदी सोपे झाले आहेत. तरीपण
त्यामुळे तिला घरात आता जास्त कामाचा ताण होत नाही. हे म्हणणे चुकीचे ठरते त्या
व्यतिरिक्त तिला घरात मुलांकडे लक्ष देणे त्यांचा अभ्यास सांभाळणे यात तिला लक्ष
घालायला वेळ मिळतो. त्यात तिची ओढाताण होतेच. घरातील सर्वांनीच तिला समजून घेतल्यास तिला थोडा घरकामाचा आधार दिल्यास तिचा नोकरी पेशातील
मजबुतीचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. या दृष्टीने तिच्या व्यवसायात,व नोकरीत आवश्यक ते प्रोत्साहन तिला द्ययला हवे. काही महत्वाच्या बाबतीत
तिला स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्यास मोकळीक दिल्यास
खऱ्या अर्थाने समाजात स्त्री व पुरुष समानता म्हणता
येईल. व ती सुखी व समृद्ध होईल.
सातत्याने बदलनारी व आधुनिकते कडे सरकणारी सामाजिक
परिस्थिती, स्त्रियांचा शिक्षणात वाढलेला सहभाग आणि परिणामी
मिळणारे वैचारिक स्वतंत्र आणि आर्थिक सववलंबत्वा, पुरातन
काळापासून चालत आलेल्या संस्कृतीचा होणारा ह्रास व तत्कालिक परिस्थिती ला अनुसरून
स्वत: मधे बदल करण्याचा मनुष्याचा स्वभाव ही स्त्री च्या प्रगती ची महत्वाची कारणे
आहेत. पाश्चिमात्य जीवन पद्धतीचा प्रसार माध्यमांनी झपाट्या ने
केलेला प्रसार व दळणवळानामधे झालेली प्रगती हे सुद्धा याला कारणीभूत
आहेत. जास्त कार्यक्षमता, नीटनेटकेपणा,
कोणतेही काम करण्याची क्षमता अश्या गोष्टींमुळे स्त्रिया आज सर्व
स्तरांवर आघाडीची भूमिका पार पडताना दिसतात. देशातील महत्वाच्या शासकीय
कार्यालयांमधे स्त्रियांना आरक्षण देण्याचा निर्णय नक्कीच योग्य आहे हे येणारा काळ
सिद्ध करून दाखवल्या शिवाय राहणार नाही. आश्या ह्या पुरूष प्रधान समाजामधे जश्या
स्त्रिया जास्त प्रमाणात सहभागी होतील तसा जीवन राहणीमनाचा स्तर उंचवला जाईल यात
कोणाचे दुमत नसावे. समाज हा सतत बदलत असतो आणि त्या प्रमाणे सद्ध्याची व येणारी
पिढी बदलते हा निसर्गाचा नियम कोणीही मोडू शकत नाही. ह्या बदललेल्या परस्तितीत
मात्र काही स्त्रिया धूम्रपनासारख्या वाईट व्यसनांच्या आधी होत असताना पाहून येणार्या काळाची
चिंता वाटते, कारण स्त्री शिकली की कुटुंब शिकते. जग एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुढे जात असताना देखील काही देशांमधे
स्त्रियांची परिस्थिती आजुन सुद्धा हालखीची असल्याचे जाणवते. मध्य आशियातील आखाती देश व आफ्रिकेतील काही देश याची उत्तम उदाहरणे आहेत. समाज
परिवर्तनला विरोध करणार्या कट्टर पन्थि लोकांनी व्यापलेला समाज व त्यांचा उदारमतवादी पणाला असलेला विरोध आणि आर्थिक स्तरावर झालेली कमी
प्रगती ही त्याची प्रमुख कारणे होय. मोठी लोकसंख्या असलेले देशच याला बळी पडल्याचे
लक्षात येते. भूतान सारख्या कमी प्रगत व लोकसंख्येने कमी असलेल्या देशांमधे असे
फार क्वचितच पाहायला मिळते.
मयुर
बाळकृष्ण बागुल, पुणे
मो – ९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment