गेली अनेक दिवस लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन म्हणजे सर्व ठप्प करणे असे
नसून काही प्रमाणात मोकळीक देणे गरजेचे असले पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात सरकार तसेच
प्रशासनाने नागरिकांच्या मुक्त फिरण्यावर वारंवार नाराजी व्यक्त केली होती तसेच
निर्बंध न पाळल्यास कठोर निर्णय घेतले जातील असा इशाराही दिला होता. त्यानुसार
कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता
मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली असून अधिक
काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. चीनच्या वुहान
शहरातून सुरू झालेला कोरोनाचा प्रवास वा प्रसार सा-या जगात सुरू आहे. अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील अनेक देशांना त्याने
आपल्या विळख्यात घेतले. अमेरिकाही कोरोनाच्या तडाख्यात सापडला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती
डोनाल्ड ट्रम्प प्रारंभी कोरोना व्हायरस संकट असल्याचे मान्य करीत नव्हते आता
त्यांनी याचे गांभीर्य ओळखले आहे. इराण व इटली या दोन देशांमध्ये कोरोनाचे संकट
गंभीर झाले असून, इटलीत मृतांची संख्या चीनपेक्षा अधिक झाली
आहे. ब्रिटनलाही कोरोनाने ग्रासले आहे. भारतातही कोरोचा प्रकोप सुरू असून, त्याला हाताळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे आपापल्या परीने प्रयत्न करीत
आहेत. भारतातील कोरोना हा आयात झालेलाच आहे. विदेशातून आलेल्या व्यक्तींना याचा
संसर्ग झाल्यानंतर, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना याची लागण
झाली. कोरोनाला हाताळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून केले जात असलेले प्रयत्न
समाधानकारक असल्याचे मानले जाते. भारताच्या नोकरशाहीच्या कामावर नेहमीच टीका होत
आली आहे. मात्र, संकटाच्या वेळी हीच नोकरशाही देशाला तारते,
असा अनुभव सध्या येत आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, डॉक्टर,
पोलीस, या सर्वांनी लॉकडाऊन काळात घराबाहेर न
पडण्याचे, घरातच थांबण्याचे, गर्दी न
करण्याचे, सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या
आवाहनानुसार पोलीस आणि प्रशासन देखील सामाजिक अंतराचे भान राखून, सुरक्षितता बाळगून कर्तव्ये पार पाडत आहोत. किमान अधिकारी व सहका-यांना
सोबत घेऊन, बैठका घेऊन विषय मार्गी लावत आहोत. केंद्र व
राज्य सरकार, सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय
अधिकारी, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील प्रत्येक जण जोखीम
पत्करुन कर्तव्य पार पाडत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच थांबून सरकारला
साथ द्यावी अशी किमान अपेक्षा असते. मुंबई-पुण्यातच नव्हे तर अनेक शहरांत कोरोनाने
हातपाय कसे पसरले आहेत हे आकडेवरून लक्षात येते. तरीही शहरात रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये नागरिक विनाकारण गर्दी होत आहेत. यातून हे नागरिक स्वत:च्या,
कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. कोरोना या जागतिक
महामारीचे पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही. त्यामुळे काही दिवस घराबाहेर न पडता
लॉकडाऊन नियमांचे पालन करावे. नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये, घराबाहेर पडू नये, गर्दीत जावून स्वत:चा आणि
कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन वारंवार करूनही
नागरिकांचा मिळत नसलेला प्रतिसाद कोरानाचा संसर्ग आणखी पसरविण्यास कारणीभूत ठरत
आहे. भारत हा जगातील दुस-या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश आहे. कोरोना चाचणीसाठी
असलेल्या तंत्रज्ञानाचा अद्याप म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. कोरोना चाचणीसाठी
आवश्यक असलेली साधने चीनमधून आयात केली जात आहेत. अशा स्थितीत ज्या भागात कोरोना
रुग्ण आढळतील तो भाग सील करण्याची व्यूहरचना सा-या देशात राबविली जात आहे. जी
योग्यच आहे. कारण, याशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र,
त्यामुळे सारा देश ठप्प झाला आहे. अशा स्थितीत कोरोनाग्रस्त भाग
वगळता अन्य भागाला मोकळे करण्याची व्यूहरचना राबविली जाऊ शकते. ज्या जिल्ह्यात
कोरोनाची एकही केस नाही, त्या जिल्ह्यात काही आर्थिक व्यवहार
सुरू करण्यात यावे, असे सुचविण्यास वाटते अर्थत
त्याठिकाणच्या सीमा बंद करून व्यवहार सुरु होणे गरजेचे आहे. नंतर राज्यातील
व्यवहार सुरू करण्यात यावे. त्यानंतर देशातील व्यवहार व सर्वात शेवटी
आंतरराष्ट्रीय व्यवहार, असा हा क्रम राहू शकतो. कोरोनाचे
संकट नवीन आहे, त्यावर लस निघालेली नाही, तत्काळ परिणाम होईल, अशी औषधे नाहीत. भविष्य काळात
यावर उपाय येतील, नाही असे नाही. मात्र तोपर्यंत काळजी घेणे
गरजेचे आहे. कोरोनाशी लढा आत्मबलाने द्यायचा आहे. तज्ज्ञ डॉक्टर, केंद्र व राज्य सरकार ज्या सूचना देत आहेत, त्याचे
पालन आपण सर्वांनी केले पाहिजे. मात्र याच काळात अनेकांच्या प्रतिभांना नवनवीन पंख
फुटत आहेत. सोशल मीडियावर कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे करा, ते करा असे सांगणारे संदेश, व्हीडिओ व्हायरल होत
आहेत. एकतर असे मेसेज वाचू नयेत, व्हीडिओ पाहू नयेत आणि
पाहिलेच तर ते फॉरवर्ड करू नयेत. कोरोना व्हायरसबाबत तज्ज्ञांचेच म्हणणे आपण ऐकले
पाहिजे. एका अर्थाने आज संपूर्ण भारताचे कोरोनाविरुद्ध युद्ध चालू आहे. पंतप्रधान
यांच्या भाषेत सांगायचे तर १३० कोटी भारतीय विरुद्ध कोरोना व्हायरस, असे या युद्धाचे स्वरूप आहे. हे युद्ध आपल्याला जिंकायचेच आहे. हे युद्ध
जिंकायचे म्हणजे कोरोनावर मात करायची आहे. कोरोनाला रोखायचे आहे, त्याचा फैलाव होऊ द्यायचा नाही. कोरोनाचा वाढता उद्रेक ही फक्त भारताचीच
नाही, तर संपूर्ण जगाची समस्या झाली आहे. साधी समस्या नाही,
तर अतिशय चिंताजनक आणि प्राणघातक अशी समस्या झाली आहे. चीनमधून उगम
पावलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. इटली आणि
इराणमध्ये तर कोरोनामुळे अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यावश्यक
सेवेतील कर्मचार्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना काही मर्यादांचे पालन करणे
आवश्यक होते. पण, काही उत्साही कार्यकर्ते तसेच त्यांच्या
अतिउत्साही नेत्यांनी रस्त्यावर उतरून जो गोंधळ घालतात, तो
अतिशय धक्कादायक आहे.
या लढाईत प्रत्येक
भारतीय हाच सैनिक आहे, लहान मुलांपासून
वयोवृद्धांपर्यंत सर्वांना लढायचे आहे. अशी ही सर्वंकष लढाई आहे. या लढाईत
सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. हा सहभाग म्हणजे सरकारने, तज्ज्ञांनी
दिलेल्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करणे हाच आहे. अशी लढाई यापूर्वी भारतात कधी लढली
गेली नाही. या लढाईत शस्त्रे उपयोगाची नाहीत. कोरोनाच्या विरोधातील लढाई त
आत्मसंयम हेच सर्वात मोठे आणि प्रभावी शस्त्र आहे. त्याचबरोबर आत्मनिग्रह, धैर्य, चिकाटी, सहृदयता,
बंधुभावना अशा गोष्टींचीही साथ आवश्यक आहे. आणि या बाबतीत आपली
बरोबरी करू शकेल असा मानवसमूह जगात नाही. चीन कोरोना संकटावर मात करू शकला याचे
मुख्य कारण त्या सरकारजवळ उपलब्ध असलेली सरकारी यंत्रणा हे होते. प्रारंभिक
चुकांनंतर चीनने दाखविलेली तडफ खरोखरीच वाखाणण्याजोगी होती. भारतातील राज्य सरकारे
योग्य निर्णय घेत आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढण्यासाठी
शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाऊन म्हणजे एक संकट असे वाटणारे लोकही आता
काहीसे निर्धास्त झाले आहेत. म्हणूनच कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन याच पर्यायाला
प्राधान्य दिले जात आहे. ज्या देशांनी कठोर लॉकडाऊन केला, तेथे
कोरोनाचा प्रसार झाला नाही आणि ज्यांनी लॉकडाऊनकडे दुर्लक्ष केले, तेथे कोरोनाचे रुग्ण वाढले आहे. पण, लॉकडाऊन किती
दिवस, हा प्रश्न उपस्थित होत आहे. लॉकडाऊनने एकप्रकारचे
द्वंद्व तयार केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत.
कोरोनाची वेगवान चाचणी करणे, कोरोनाची लक्षणे आढळल्यास
त्याला रुग्णालयात पाठविणे, हेच उपाय सध्या तरी दिसून येत
आहेत. मात्र, अशा चाचणीसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान अद्याप
पूर्णपणे भारताजवळ नाही. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर चाचण्या आणि कडक लॉकडाऊन या
दोन्ही मार्गांचा अवलंब भारतालाही करावा लागत आहे. कोरोनाचा नायनाट होण्यासाठी
लॉकडाऊन, चाचण्या, उपचार, खबरदारी हेच मार्ग सध्या उपलब्ध आहेत. एकूण सर्व परिस्थितीचा हा भारतीय
समाजाने करणे गरजेचे आहे. कोरोना याबद्दल गांभीर्याने आपण राहणे खूप गरजेचे आहे. आपला
हलगर्जीपणा हे आपले जीवन संपवू शकतो. लॉकडाऊन हा कमी काळात संपणारा नाही आपली
मानसिकता ही कोरोना बरोबर जगण्याची झाली पाहिजे. आपल्या घरातील लहान मुले आणि
वयोवृद्ध यांना शक्यतो घर बाहेर न पाठवणे आणि त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. हे
संकट मानवाने निर्माण केलेलं आहे त्यांचे प्रयाचीत त्याला मिळत आहे. मनुष्य हा
प्राणी मानवाचे जीवन जगण्याची पद्धत विसरला आणि निसर्गा सोबत खेळू लागला. मानवाला
हे देखील कळत नाही की हा जीव पंचमहाभूत मुळे सृष्टीवर आहे. कोरोनामुळे गांभीर्याने
तयार झालेली परिस्थिती मानवाने केलेल्या चुका लक्षात घेऊन समजून घेणे गरजेचे आहे.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment