सध्या
कोरोना परिस्थिती मध्ये सगळे घर
कोंडी मध्ये होते. एक दिवस फेसबुकवर घनश्याम पाटील यांची पोस्ट येते दरवळ
वाचकांच्या हाती येणार वाचून आनंद झाला. आज वर “दखलपात्र” आणि झुळूक आणि झळा हे
दोन लेख संग्रह पुस्तक वाचली आणि एकूणच त्यांच्या लेखणीची ताकद मनाला भावली
त्यामुळे पुढील लेख संग्रह कधी प्रकाशित होतो यांची मी आतुरतेने वाट बघत होतो.
कोरोना सारख्या परिस्थिती मध्ये सगळ शांत असतांना दरवळचा सुगंध दरवळला. खर तर लेख
संग्रह म्हणजे विविध प्रश्नांवर केले लिखाण जणू ते लिखाण प्रत्येक नागरिकांच्या
मनातील आहे असे जाणवते. दरवळ हे पुस्तक प्रकाशित झाले आणि २० प्रत बुक केल्या
त्यातील एक प्रत स्वतःसाठी ठेवून वाचन करण्यासाठी सुरुवात केली. दरवळ पुस्तकाचे
मुखपृष्ठ बघितल्यावर मन प्रसन्न होऊन जाते मोरपंखी रंगानी पिसरा फुलल्या सारखं
आतील साहित्य असेल अनुक्रमणिका बघितल्या नंतर जाणवले की प्रत्येक लेखात चौफेर
षटकार मारले असतील. खरतंर ह्या पुस्तकातील लेख याआधी दिवाळी अंक असेल किंवा दैनिक
वृत्तपत्र असेल याठिकाणी प्रकाशित झालेली होती परंतु सर्वच अंक घेऊन वाचक वाचत
नाही. त्यामुळे घनश्याम पाटील यांचे लेख वाचण्यासाठी दरवळ घेऊन वाचणे गरजेचे असते.
दरवळ लेख संग्रहात एकूण पंचवीस लेख आहे आणि विविध विषयांवर आहे. प्रत्येक लेख हा
विचार करायला लावणारा आहे. तटस्थपणे, उघड्या डोळ्यांनी वाचत असतांना समाजतील
उन्माद होत असतो त्याला कुठे तरी लेखातून चपराक दिली असे दिसते. दरवळ पुस्तकात लेख
वाचत असतांना मंत्रमुग्ध होऊन जातो कारण लेखक जे वास्तव मांडतो आहे ते आपल्याच
मनातील आहे असे वाटते. त्यामुळे एकूणच समजतील घडत असलेल्या घटना आणि त्यावर कोणी
तरी दिलेली चपराक हे समजून घेऊन मनुष्य म्हणून आपण नेमक कुठे चुकत, आपण काय केले
पाहिजे, आपली भूमिका तटस्थपणे काय असली पाहिजे यांचा कुठे तरी विचार हा समाज
म्हणून आपण करतो का? हा प्रश्न मला पडला.
दरवळ
मधील सुरुवातीचा लेख हा स्व बद्दल आहे. स्व म्हणजे स्वता आपण स्वतला किती ओळखतो
कारण आज समाजत खोटे मुखवटे घालून वावरणारे कमी नाही, आपल्या कार्यातून किंवा
कृतीतून नेमक काय घडणार हा देखील विचार करत नाही आणि स्वताला गमवून जातो. पद,
प्रतिष्ठा, सन्मान मिळेल परंतु आनंद, सुख आणि समाधान हरवून जातात. त्यात कुठल्या
दुनियात हे सगळ सुचते ज्यामुळे ध्येयाकडे जाणारी वाटचाल चुकीच्या दिशेने चालू
लागते आणि त्यावेळी वेळ निघून गेली असते तेव्हा मात्र आपण हतबल होतो. त्यामुळे
लेखातून एक लक्षात येते सगळ करावे परंतु स्वताला मात्र हरवू देऊ नका ज्यावेळी ‘स्व’
तुम्ही विसरतात त्यावेळी आपण नेमक कोण आहोत हेच लक्षात राहत नाही. त्यामुळे आपली व
इतर जंगली प्राणी यामध्ये फरक तो काय राहिला. पुढे सर्व लेख वाचत असतांना मला
शेतकरी प्रश्नाबाबत लेख वाचत असतांना व्यवस्थे बद्दल चीड निर्माण होते कसं आहे सगळ
फक्त सहन करत जगण्याची सवय लागली आहे. आपण किती निगरगठ झालो असतो कारण आपण फक्त
आजू बाजूला सगळ बघत असतो आणि सहन करत जीवन जगत असतो. लेखात अन्नत्याग बाबत लिहिले
एक छोटा उपक्रम जो आपली बांधिलकी शेतकरी प्रती दाखवतो त्यात चपराक परिवार सहभाग
घेतो ही नाळ जोडलेली दिसते. पुढे देशभक्ती वर येऊन लक्षात येते की देशभक्तीची
व्याख्या ही भारताला संगण्याची वेळ येते म्हंटल्यावर आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेत
नेमकं काय शिकलो हा प्रश्न उपस्थित होतो. कारण देशभक्त होण्यासाठी आपल्याला सोयीने
सगळ करावे लागते कसं झाले आपल्या तो सोन्या आणि दुसऱ्याचा तो बाब्या असे काही घटना
घडत असतात आणि वर पुन्हा असे म्हण्याचे खरे देशभक्त कोण अशी ही परिस्थिती लेखातून
समजते. पुढील लेखात तर भूक कधी कोणाचे संपेल असे काही दिसत नाही तसे असते तर आज
चित्र जरा वेगळ असते भूक ही अशी आहे की ती शोधण्यासाठी जीव तडपडतो भूक म्हणजे फक्त
अन्नग्रहण करणे नव्हे तर ज्या क्षेत्रात आपण कार्य करतो त्या क्षेत्रात समाधानी
आपण राहण्यासाठी शिकलो पाहिजे सर्व काही मला मिळाले पाहिजे असे नाही पण आज तसे
नाही राजकारणात तर ही भूक संपत नाही कारण घराणेशाही मधील तिसरी पिढी सत्तेत विराजमान
झाली आणि आम्ही लोकशाहीच्या भंपक चर्चा करतो. सत्ता मिळणे देखील काही साठी भूक आहे
त्यात ५० वर्ष दोन्ही सभागृह मध्ये कार्य करून देखील भूक संपत नाही त्यामुळे लेखात
भूक विषयी वाचत असतांना व्यक्तीला समधान मिळण्यासाठी लेखकांनी चपराक दिलीच पाहिजे
त्या शिवाय ही भूक संपणार नाही. पुढील काही लेखात सगळी दिवाळखोरी दिसते घटनेची
ज्या कारकुनी शिक्षण व्यवस्थेत शिक्षण घेऊन वैचारिक क्षमता गमवून बसलेले समजातील
तथाकथित बांडगुळ लोकांमुळे एकूणच समाज स्वस्थ बिघडले आहे. मग त्यात जातीचे लेबल
लावून पुरोगामी म्हणणारे असतील किंवा धर्माचे कवच कुंडल घेऊन फिरणारे भक्त असतील
यांनी खर तर एकूणच समाजतील लोकं मधील दरी कशी वाढत गेली त्यात महापुरुष देखील
वाटले गेले तरी आपल्याला काही फरक पडत नाही हा खरा पुरोगामी महाराष्ट्र आहे का ?
हे वाचत असतना मनात प्रश्न पडतात आणि मग ६० वर्षात महाराष्ट्र मध्ये नेमकं असं
बुडाखाली आग कशी लागली की एवढा जातीय द्वेष पसरावा लागला. लेख हे सगळ तस्थपणे
मांडतो ते समजल्या नंतर लक्षात येते की याला त्याला काही दोष देण्यात आपणच कमी
पडतो कारण आपण सगळ सहन करतो.
दरवळ
पुस्तकात लेखक नवीन लेखकांना लिहिण्यासाठी प्रोत्साहन देतात त्यांच्यातील लेख जागा
करतात आणि एकूणच साहित्य क्षेत्रातील नकारात्मक गोष्टीना खोडून ठाम सांगतात की
लेखक आणि प्रकाशक कमी पडतात वाचन संस्कृती कमी होत नसून ती अधिक वाढते आहे हे
सांगण्यासाठी लेख विविध प्रयोग करत असतात जेणेकरून वाचकाला काय पाहिजे हे समजून
घेण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे उमलत्या अंकुरांना बळ देणारे कमी आहे परंतु चपराक
हे बळ देऊन नवीन लेखक पिढी घडवत आहे हे आपल्याला त्यांच्या संकेतस्थळ वर जाऊन
पुस्तक सूची बघितली तर लक्षात येईल. शेवटी आपण काय लिहितो आणि कसे लिहितो यावर
सगळी सर्कस अवलंबून असते त्यामुळे लेखकांनी लिहिलेले लेखक प्रकाशित झाल्यानंतर जो
वाचकांचा फोन येतो आणि त्यामुळे मिळणारा आनंद हा पैसे देऊन देखील कुठे मिळणार नाही
जो दरवळ वाचत असतांना वाचकाची नाळ किती जोडली आहे. हे उमलणाऱ्या लेकराला जन्मला
येऊ देण्यासाठी मोठ्या ताकदीने ओळख नसलेल्या वाचकांला प्रेरणा देतो यावरूनच लक्षात
येते की हे नाते गोते थोडे नसावे.
दरवळ लेख संग्रह वाचत असतांना हे पुस्तक कसं वाचून झाले
हे लक्षात देखील येत नाही कारण प्रत्येक प्रसंग हा डोळ्या समोर येत असतो आणि त्यात
मी स्वताला बघत होतो म्हणूनच मला इतर काही साहित्य वाचण्यामध्ये फार जास्त आवड
नाही परंतु लेखसंग्रह वाचन म्हणजे सोभवताली घडणारे प्रसंग आणि त्यावर लेखकांनी
मांडलेल मत ही आपली वाटू लागतात त्यात एकुच परिस्थिती आणि समाजातील नेमक्या घटनावर
लिहिणारे फार कमी सापडतात त्यातील एक व्यक्तिमत्व म्हणजे घनश्याम पाटील आहे. कसं
असते ताकाला जाऊन भांड लपवण्यात अर्थ नसतो म्हणूनच तर मोठ्या ताकदीने लॉक डाऊन
च्या काळात पुस्तक प्रकाशित करणे आणि त्याची विक्रमी विक्री होणे हे थोडे नाही.
दरवळ
लेख संग्रह हा प्रत्येकाने विकत घेऊन वाचला पाहिजे कारण एकुणच त्यामधून वैचारिक
भूक पूर्ण होते. दरवळ यासाठी वाचले पाहिजे कारण यामध्ये निवडक लेख आहेत जे विविध
विषयांना स्पर्श करते आणि लक्षात येते की आपण एवढं सगळ होत असतांना शांत का असतो.
आपल्याला विचार नाही की भावना नाही. प्रत्येकाने लिहिले पाहिजे असे नाही बोलयला तर
पैसे लागत नाही मग कोणाला घाबरतात तेवढे जरी होत नसेल तर किमान दरवळ घेऊन वाचा आणि
इतरांना वाचण्यासाठी द्या. वाढदिवस, लग्न, गृह प्रवेश अश्या आनंदाच्या क्षणी आहार
देण्यापेक्षा पुस्तक भेट आणि वाचन संस्कृती वाढत नाही असे नकारात्मक बोलण्यापेक्षा
सकारात्मक कृती करून बदल घडवा. दरवळ खरच वाचत असतांना वैचारिक सुगंध देतो आणि हा
सुगंध असाच दरवळत राहू दे.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९