Monday, December 21, 2020

शेतकरी कायद्यामुळे कृषीमालाचे विक्री स्वातंत्र्य मिळाले.

 


शेतकऱ्याने कसे  पिकवायचे  हे सांगण्यापेक्षा कसे  विकायचे  हे सांगा? असे  म्हणणारे शेतकरी अधिक आहेत. अर्थात कसे पिकवायचे आणि कसे विकायचे याच संपूर्ण ज्ञान शेतकऱयांपर्यंत  पोहचले आहे. सध्या केंद्रात कृषी बिलावरून गदारोळ सुरु आहे. त्यात शेतकऱ्यांनी गुलामी मध्ये जगावे यासाठी रस्त्यावर लढा देणारे कायदे कसे चुकीचे यांचा गाजावाजा करत आहे. जरा का व्यवस्थेत बदल केला तर डाव्यांच्या पोटात गोळा तयार होतो.  शेतकऱ्यांनी शेत माल विकण्याचे स्वतंत्र्य कायद्याने मिळाले आहे. जिथे जिथे सरकारी हस्तक्षेप आला तिथे तिथे वाटोळे झाले आहे. सरकार मायबाप असते ही अंधश्रद्ध पसरवणारे कमी नये. सरकरा एका कडून घेते आणि दुसऱ्याला देते. सरकारने नागरिकांचा विकास करायचा नसतो. विकास व प्रगती ही व्यक्तींना स्वतंत्र्य दिल्याने होत असते. आज शेतमालाच्या बाजाराइतकी अनिश्चितता अन्य उत्पादनांमध्ये नाही. मुळात, शेती निसर्गावर अवलंबून आहे  आणि त्यात त्याच्या बाजाराची अनिश्चितता अधिक म्हणून एकूण शेती व्यवसाय आतबट्याचा होऊन बसला आहे. असे आहे म्हणून शेती करणे कोणी सोडून देणार नाही आणि तसे करणेही शक्य नाही. भारतात अजून ५५ ट्क्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या शेतीवरच अवलंबून आहे. परंतु या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात सकल घरेलू उत्पादनातील शेतीचा वाटा १३.७ टक्के इतकाच आहे. म्हणजेच या व्यवसायावर आधारित लोक अन्य लोंकांपेक्षा गरीब आहेत हे उघड आहे. शेतकरी, शेती व्यवसाय आणि त्यातल्या त्यात कृषिमालाच्या बाजार व्यवस्थापनाच्या या प्रश्नांची मांडणी करताना, ती आत्यंतिक डाव्या विंचारसणीतून केली जातें.

 

खरा प्रश्न आहे तो अन्य उत्पादकांपेक्षा भारतीय शेतकरी हा या व्यवस्थेत सर्वाधिक भरडला जाणारा अतिशय संवेदनशील असा घटक आहे. तो तसा का आहे याची काही कारणे पुढीलप्रमाणे.

1.      अत्यंत कमीं जमिनधारणा असल्याने विक्रीसाठी वैयक्तिक शेतक-याकडील शेतमाल तितक्याच कमी प्रमाणात आहे. (Marketable Surplus)

2.      उत्पादित शेतमालाची काही काळासाठी साठवणूक करून ठेवण्याची धारणक्षमता कमी असल्याने, त्याला माल लगेच बाजारात आणावा लागतो आणि मिळेल त्या बाजारभावात विकावा लागतो.

3.      बहुतांश शेतमाल हा ठराविक हंगामात बाजारात येतो आणि त्या-त्या हंगामात एकदाच शेतमाल बाजारात आल्याने भाव कोसळतात. विदेशी व्यापार कायद्याचा सरकार उपयोग करून शेत मला निर्यात बंदी करून टाकते.

4.      अशारितीने एकदाच बाजारात आलेल्या मालाची योग्य प्रतवारी, स्वच्छता म्हणावी तशी केलेली नसते, किंबहुना अशा प्रतवारीचे निकष कागदपत्री निश्चित असले तरी त्याबाबत संपूर्ण व्यवस्थेत अनास्था आहे. शेतक-याने आणलेल्या शेतमालात ओलावा, काडीकचरा अधिक आहे या सबबीखाली मोघम  स्वरूपात दरात कपात केली जाते किंवा वजनामध्ये / मोजमापामध्ये कपात केली जाते.

5.      एखाद्या शेतक-याने शेतमाल साठविण्याचे ठरविलेच तर तो माल नीट वाळवून, प्रतवारी करून साठवणुकीसाठी त्याच्या गावातच पायाभूत सोयी (गोदामे) उपलब्ध नाहीत. आहेत त्या सुविधा मोडकळीस आल्या आहेत.

6.      अन्नधान्याव्यतिरिक्त फळे, भाजीपाला ह्या माल नाशवंत असल्याने त्याची बाजारव्यवस्था आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधा (पॅकहाऊस, शीतसाखळी इ.) यांची अवस्था आणखीनच बिकट आहे.

7.      मुळात शेतमाल हा हाताळणीस अवघड असतो. साठवणुकीस अधिक जागा लागणारे (Bulky) उत्पादन आहे म्हणून एकदा बाजारात आणले की, ते विकावें लागते, भाव पड़ला तर परत नेणे परवड़त नाही.

8.      एखाद्या पिकाची लागवड करण्यापूर्वी त्याला बाजारभाव कसा राहील. याचा अंदाज वर्तवणारी कसलीही व्यवस्था उपलब्ध नाही. आता ब-याचशा शेतमालाचे भाव जागतिक बाजारावर अवलंबून आहेत. उदा: सोयाबीन, कापूस, मका इ. शेतमालाची जागतिक पातळीवर लागवड किती झाली आहे. त्या मालाची मागणी किती आहे. त्याचे बाजार कसे राहतील ही सर्व माहिती संकलित करून लागवडीपूर्वी ती प्रसारित करणारी सदृढ यंत्रणा अस्तित्वात नाही. यादृष्टीने केले जाणारे प्रयत्न तोकडे /अपुरे आहेत. त्यातही जी माहिती संकलित होते ती व्यापा-यांपुर्ती मर्यादित राहते, ती शेतक-यांपर्यंत पोहचत नाही. केवळ एखाद्या मालाचे भाव वाढले की, पुढच्या वर्षी मेंढरासारखे (Hurd Mentality) सर्वांनी त्याच पिकाची लागवड करायची मग पुन्हा भाव कोसळले की, नशिबाला दोष द्यायचा अशी अवस्था आहे.

9.      जसे अन्नधान्याचे तसेच फळे-भाजीपाल्याचे, कोणत्या पिकाची किती लागवड झालेली आहे आणि कोणत्या महिन्यात किती माल बाजारात येईल, याची शाश्वत माहिती उपलब्ध नसते. काही प्रमाणात ही माहिती असली तर त्याचे प्रसारण अभावानेच होते.

10.  किमान आधारभूत किंमत हे दुधारी शस्त्र आहे, कारण या किंमती ठरविताना ग्राहकांचे हितही पाहिले जाते आणि एक मानसिकता होते की, किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिक किंमत मिळत असेल तर शेतक-यांना तो भाव परवडतो तथापि नेहमीच वस्तुस्थिती तशी नसते. उपरोक्त प्रमाणे शेतकरी आणि शेतमालाच्या उत्पादनाच्या अंगभूत बाबी आहेत, परंतु या मर्यादांसह ज्या बाजारात शेतमालाची विक्री होते त्याबाबत माहिती घेणे अत्यावश्यक आहे.

आज राज्यात महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (नियमन) अधिनियम १९६३ नुसार कृषि उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. आजमितीस राज्यात सुमारे ३०० बाजार समित्या कार्यरत आहेत. कृषि उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना हा पणन व्यवस्थेच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. बाजार समित्या स्थापन होण्यापूर्वी मुख्यत: खेडा खरेदी पद्धती होती. त्यात व्यापारी शेतक-यांकडून खेड्यांमधून शेतमालाची खरेदी करत असत. यात शेतमालाची किंमत लिलाव न करता ठरत असे. अशा खरेदीत होणारी फसवणूक टाळून शेतक-यांना संरक्षण मिळावे व योग्य बाजारभावाने शेतमालाची खरेदी व्हावी यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना झाली. या नियंत्रित बाजार व्यवस्थेनुसार प्रत्येक बाजाराचे कार्यक्षेत्र, निश्चितस्थळी बाजार समित्या, त्याचे सबयार्ड हे अनुसूचित केले गेले. बाजार समित्यांना त्या त्या बाजारांतर्गत अडते (कमीशन एजंट), व्यापारी, हमाल, तोलाइदार इ. घटकांना परवाने देण्याचे अधिकार प्राप्त झाले. तसेच पारदर्शक पद्धतीने लिलाव/बोली बोलून स्पर्धात्मक पद्धतीने बाजारभाव ठरविण्याची पद्धती सुरू झाली. या बाजार समित्या सहकारी संस्था आहेत असा एक गैरसमज आहे. वस्तुतः सहकार कायद्यानुसार नव्हे तर एका स्वतंत्र पणन कायद्यानुसार अस्तित्वात आलेल्या या संस्था आहेत. या संस्थांचे संचालन आणि दैनंदिन कामकाजासाठी निवडून आलेले संचालक मंडळ असते. या संचालकांची नेमणूक सरळ जनता करीत नसून विविध संस्थामध्ये निवडून आलेल्या प्रतीनिधींमधून संचालकांची निवड केली जाते . शेतकऱ्यांच्या १५ प्रतिनिधींपैकी ११ प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्थांमधून आणि ४ ग्रामपंचायत सदस्यातून निवडले जातात. याशिवाय व्यापा-यांचे प्रतिनिधी, हमाल/तोलाइदारांचा  प्रतिनिधींचा यात समावेश असतो. या बाजार समित्यांच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरावर पणन संचालनालय आहे. पणन संचालक म्हणून सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकारी नियुक्त केलेले आहेत. त्यांच्यावतीने क्षेत्रीयस्तरावर सहकार विभागाचे निबंधक, बाजार समित्यांचे नियंत्रक म्हणून काम पाहतात. पणन संचालकांशिवाय कृषि पणन मंडळ ही स्वतंत्र संस्था १९८४ साली स्थापन करण्यात आली. या पणन मंडळाचे मुख्य काम बाजार समित्यांचा विकास करणे आणि एकूण पणन व्यवस्थेचा विकास करणे हा आहे. कृषि उत्पन्न बाजार समित्यांना बाजार समितीत झालेल्या व्यवहाराच्या एक टक्का इतका सेस मिळतो, त्यातील १ टक्क्यातील १ ते ५ टक्के रक्कम राज्य पणन मंडळाला मिळते. अशा बाजारव्यवस्थेत जिथे प्रशासनात शेतक-यांचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिका-यांचे प्रभुत्व आहे, तिथे शेतक-यांचे हित जपणे अपेक्षित आहे. परंतु शेतकरी हा घटक असंघटित असल्याने, एकदा बाजारात आणलेला माल कोणत्याही कारणाने परत नेणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याने, तो माल विकण्यासाठी शेतकरी अगतिक होत असल्याने, शेतक-यांपेक्षा अन्य घटकांचे वर्चस्व या बाजारात वाढत गेले. केवळ शेतकरी आपला माला दुसरीकडे विकू शकतो असे नाही तर शेतकर्‍याच्या बांधावर येवूनही कुणी खरेदी करण्यास तयार असेल तर त्यालाही या कायद्यांनी परवानगी दिली आहे. आंदोलन शेतकरी यावरच आक्षेप घेत आहेत. खरं तर हा आक्षेप व्यापार्‍यांचा असू शकतो. दलालांचा असू शकतो. आडत्यांचा असू शकतो. जो उत्पादक आहे तो शेतकरी याला विरोध कसा काय करू शकेल? आजची मंडी व्यवस्था शेतकर्‍याच्या बांधावर जावून माल खरेदी करत आहे का? काही वेळा तर शेतकर्‍याला कृषी उत्पन्न बाजार समितीत माल नेल्यावर झालेला खर्च आणि आलेली रक्कम यात तोटा होवून आपल्याच खिशातून पैसे भरावे लागले असे घडले आहे. याला उलटी पट्टीअसा शब्द आहे. मग जर कुणी अगदी शेतकर्‍याच्या बांधावर येवून माल खरेदी करणार असेल, शेतमालाचा सौदा शेतकर्‍याच्या बांधावरच होणार असेल तर यात नेमकी अडचण काय आहे? आज जे कायदे तयार करण्यात आले त्यात असे काही म्हंटले नाही कि बाजार समिती बंद करा उलट शेती माल शेतक-यांना कुठेही विकण्यासाठी स्वातंत्र्य मिळाले आहे. आज वर शेतक-यांना ज्यांनी लुटले तेच पुन्हा शेतक-यांना फसवणूक करण्यासाठी आरडाओरड करू लागले. केंद्रात एवढ जर मोठ्या संख्येने आंदोलन सुरु आहे त्यांचे पडसाद महराष्ट्रात मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरून करू शकला असता. शेतक-यांना देखील समजते आज वर लुटणारे कोण होते त्यामुळे रस्त्यावर उतरणारे डावे कॉंग्रेस प्रेमी मंडळी यांना शेतकरी प्रश्नांवर लढायचे असेल तर भारतीय संविधानातील परिशिष्ट ९ वर सरकारला विचारावे आणि ते रद्द करण्यासाठी लढावे ते मात्र करणार नाही कारण सरकारची हस्तक्षेपाने दलाल बनून लुटमार करणारे येथे तोंड उघडतील का ?

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

समन्वय समिती – किसानपुत्र आंदोलन

चलभाषा – ९०९६२१०६६९

 

शेतकऱ्यांना खुले बाजार स्वातंत्र्य मिळाले...!

भारत देश कृषिप्रधान देश आहे यांची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली. कोविड १९ मुळे सर्व ठप्प असतांना कृषी क्षेत्र सुरु होते म्हणून कृषी क्षेत्रातील GDP कुठेही घसरला नाही. देशातील कृषी व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणारे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारे दोन विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. लोकसभेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी 5 जून 2020 रोजी काढलेल्या अध्यादेशाची जागा घेण्यासाठी 14 सप्टेंबर 2020 रोजी शेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा विधेयक, 2020 सादर केले होते.

लोकसभेत विधेयक मंजूर होण्यापूर्वीच्या चर्चेला उत्तर देताना, नरेंद्र सिंग तोमर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी गाव-गरीब-शेतकरी यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहेत असे सांगत असतात. आता शेतकरी विहीत केलेल्या ठिकाणीच कृषी उत्पादन विकण्यापासून मुक्त असतील, किमान आधारभूत किंमतीने खरेदीप्रक्रिया सुरु राहणार आहे, तसेच राज्य कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या मंडी सुरु राहणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले की, या विधेयकामुळे कृषी क्षेत्रात क्रांतीकारी परिवर्तन आणि पारदर्शकता निर्माण होणार आहे, इलेक्ट्रॉनिक व्यापार वाढेल, पुरवठा साखळी आणि शेतीविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि यामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल.

 

शेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, 2020 शेतकरी आणि व्यापाऱ्यांना विक्री आणि खरेदीसाठी निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे, योग्य दर, पारदर्शकता आणि अडथळा-रहित राज्यांतर्गत आणि आंतरराज्य व्यापार आणि उद्योग, बाजारपेठांच्या बाहेर किंवा विविध राज्य कृषी उत्पादन बाजार कायद्यांनी अधिसूचीत केलेली अभिमत बाजारपेठांच्या ठिकाणी, इलेक्ट्रॉनिक व्यापार सुलभ होईल.

 

पार्श्वभूमी

भारतातील शेतकर्‍यांना आपल्या उत्पादनांचे विपणन करण्याच्या विविध निर्बंधांमुळे त्रास सहन करावा लागत होता. अधिसूचित एपीएमसी मार्केट यार्डा बाहेर शेतीमाल विक्रीवर शेतकऱ्यांना निर्बंध होते. शेतकर्‍यांना फक्त राज्य सरकारच्या नोंदणीकृत परवानाधारकांनाच शेतमाल विक्री करण्याचे बंधन होते. तसेच, राज्य सरकारांच्या विविध एपीएमसी कायद्यांमुळे कृषी उत्पादनांच्या खुल्या व्यापारावर निर्बंध होते. आज वर शेतकरी सर्वात जास्त मर्कट कमिटी मध्ये दलाल यांच्या मार्फत लुटला जात होता. राजकीय पुढारी व्यापारांना हाताशी धरून लुटमार करत होते ही वास्तविक परिस्थिती होती.

 

लाभ

नवीन कायद्यामुळे एक परिसंस्था तयार होईल जिथे शेतकरी व व्यापाऱ्यांना कृषी उत्पादनांच्या विक्री व खरेदीचे स्वातंत्र्य मिळेल. अडथळा मुक्त आंतरराज्य व्यापराला चालना मिळेल. देशातील मोठ्या प्रमाणावर नियमन केलेल्या कृषी बाजारांना खुले करण्याचे हे ऐतिहासिक पाऊल आहे.

यातून शेतकऱ्यांना अधिक पर्याय खुले होतील, शेतकर्‍यांचा विपणन खर्च कमी होईल आणि शेतमालाला चांगला दर मिळविण्यात मदत होईल. यामुळे अतिरिक्त उत्पादन असलेल्या प्रदेशांतील शेतकऱ्यांना टंचाई, कमी दर असलेल्या प्रदेशांतील चांगल्या किंमती मिळवून देण्यास मदत होईल. विधेयकात इलेक्ट्रॉनिक व्यापाराच्या माध्यमातून अडथळारहित व्यापाराचा समावेश आहे. शेतकऱ्यांकडून कोणताही अधिभार किंवा उपकराची या कायद्याद्वारे आकारणी केली जाणार नाही. तसेच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वाद निराकरण यंत्रणा असेल.   

 

एक देश, एक कृषी बाजारपेठ 

मुळात विधेयकाचे उद्दीष्ट एपीएमसी मार्केट यार्डबाहेर अतिरिक्त व्यापार संधी निर्माण करणे हे आहे जेणेकरून अतिरिक्त स्पर्धेमुळे शेतकर्‍यांना चांगले दर मिळू शकतील. हे सध्या एमएसपी खरेदी प्रक्रियेला पूरक आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळेल. यामुळे निश्चितपणे एक भारत, एक कृषी बाजारपेठ निर्माण होण्याचा मार्ग मोकळा होईल आणि आपल्या कष्टकरी शेतकर्‍यांना सुवर्ण पीक मिळावे यासाठी पायाभरणी होईल. देशात शेती क्षेत्रात गुंतवणूक येईल. सर्वात जास्त शेती ही ग्रामीण भागात केली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यास बळकटी मिळेल.

 

 शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा विधेयक, 2020 योग्य आणि पारदर्शक पद्धतीने परस्पर मान्य केलेल्या मोबदल्याच्या किंमतीच्या चौकटीत शेतीविषयक कराराच्या, प्रोसेसर, घाऊक विक्रेता, निर्यातदार किंवा शेती सेवांसाठी मोठ्या विक्रेत्यांशी आणि गुंतवणूकीसाठी शेती करारावरील राष्ट्रीय चौकटीसाठी आणि त्याद्वारे संबंधित गोष्टींसाठी न्याय आणि पारदर्शी पद्धतीने व्यवहार होतील.

 

पार्श्वभूमी 

भारतीय कृषी क्षेत्र छोट्या-छोट्या धारणक्षेत्रामुळे विखंडीत क्षेत्र आहे आणि हवामान अवलंबित्व, उत्पादन अनिश्चितता आणि बाजारपेठेची अनिश्चितता या कमकुवत बाबी आहेत. यामुळे कृषी जोखमीचे आणि गुंतवणूक आणि परतावा या दोन्ही बाबतीत अकार्यक्षम क्षेत्र ठरते.  

 

 लाभ

नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांना प्रोसेसर्स, घाऊक विक्रेते, मालाचे एकत्रिकरण करणारे, मोठे विक्रेते आणि निर्यातदारांशी व्यवहार करता येईल. शेतकऱ्याची बाजारपेठेच्या अनिश्चिततेविषयीची जोखीम कमी होईल आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि चांगले इनपुट मिळतील. शेतकऱ्यांचा विपणन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा होईल.  

हा कायदा राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठांमध्ये भारतीय शेतीच्या उत्पादनांची पुरवठा साखळी बांधण्यासाठी खासगी क्षेत्राच्या गुंतवणूकीला आकर्षित करण्यासाठी व कृषी पायाभूत सुविधांकरिता मध्यस्थ म्हणून काम करेल. शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाचा लाभ आणि उच्च मूल्य असलेल्या शेतीसाठी सल्ले मिळतील आणि अशा उत्पादनांसाठी बाजारपेठ तयार होईल. हे जर व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर देशात कृषी आधारित उद्योग प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात उभे राहतील आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणत उद्योग व व्यवसाय स्थानिक लोकांना मिळेल. शेतकरी थेट विपणनात आल्यामुळे मध्यस्थांचे उच्चाटन होऊन शेतकऱ्यांना पूर्ण किंमत मिळेल. शेतकऱ्यांना पुरेसे संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची जमीन विक्री, भाडे किंवा गहाण ठेवण्यास बंदी आहे. शेतकऱ्यांना प्रभावी वाद निराकरण यंत्रणा निश्चित कालमर्यादेत निराकरण करण्यासाठी पुरवण्यात आली आहे. केंद्र सरकारने हे पाउल उचले याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आभार मानले पाहिजे.

 

किसानपुत्र आंदोलन शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी गेली अनेक वर्ष सातत्याने लढत आहे. आज केंद्र सरकाने आवश्यक वस्तू कायद्यात बदल करून बाजार स्वतंत्र्य दिले खरं परंतु भविष्यात शेती क्षेत्रात उद्योग उभे करण्यासाठी कमाल जमीन धारणा कायद्याचा विचार करावा लागेल. किसानपुत्र आंदोलन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा म्हणून लढा हा सुरूच ठेवेल कारण सरकार हे शेती माल विक्री स्वातंत्र्य ‘विदेशी व्यापार कायदा १९९२’ चा वापर करून शेत माल निर्यातवर बंदी आणते. नुकतेच कांदा निर्यात बंदी आपल्याला माहिती असेल. मुळात सरकारने शेतकरी यांच्या पाठीवर कायदे करून ओझे केले नाही पाहिजे. त्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करा ही भूमिका आज देखील बदली नाही. शेतकर्यांच्या विरोधातील कायदे संविधानाच्या परिशिष्ट ९ मध्ये टाकले आहे. त्यामुळे शेतकरी यांना गुलाम केले गेले आहे. केंद्र सरकारने काही बदल केले आणि लगेच सरकारी लाभार्थी विरोध करायला लागले. शेती हा उद्योग आहे आणि उद्योग करण्यासाठी जे स्वतंत्र्य एखाद्या उद्योगपतीला देते तेच सरकारने शेतकरी यांना दिले पाहिजे. शेतकरी स्वता मालक आहे त्यामुळे विरोध करणारे यांनी शेतकरी यांची फसवणूक करणे थांबवले पाहिजे. आज पर्यत मार्केट मध्ये शेतकऱ्यांचे कल्याण झाले असे कुठे आदर्श उदाहरण देशात आहे का ? जर ते होत नसेल तर व्यवस्था बदलावी लागते आणि व्यवस्था बदलण्यासाठी जे पाउल उचले आहे त्यांचे शेतकरी बांधवांनी स्वागत केले पाहिजे. किसानपुत्र आंदोलनाची लढाई येथेच थांबणार नाही तर सर्जकांना स्वतंत्र्य मिळे पर्यत लढा हा सुरूच राहील.

 

आज जे काही बदल करण्यात आले त्याचं काही प्रमाणात शेतकरी कायद्याचं अभ्यास केला तर लक्षात येईल आज पर्यत देशात शेतकर्यांना गुलामी मध्ये शेती करावी लागत होती. जे की चुकीचे आहे. शेती मध्ये कष्ट शेतकऱ्याने करायचे आणि मार्केट मध्ये दलाल शेतकर्यांना कवडीमोल किंमत देऊन लुटत होते. मार्केट कमिटी हे शेतकर्यांना फसवणूक करून राजकारण करण्याचा अड्डा होता. राजकीय नेत्यांचे बगल बच्चे हाताला २० ते ३० व्यापरी हाताशी धरून मक्तेदारी करून ठेवली होती. कधी कधी अशी वेळ शेतकरी यांच्या वर येत होती की त्यांना त्यांचा माल रस्त्यावर टाकून द्यावा लागत होता. आज मात्र त्यांना शेत माल विक्रीचे स्वातंत्र्य मिळाले सोबत स्वताच्या मालाची किंमत देखील ठरवता येणार. सरकार सगळेच निर्णय चुकीचे घेत नसते जे चांगले त्यांचे कौतुक केले पाहिजे. देशात शेतकरी रसातळाला जात असतांना नीती आयोगाच्या आर्थिक अहवालात त्यांनी ही सूचना किमान एक वर्षापूर्वीच सांगितली होती. त्यामुळे जे विरोध करत आहे त्यांनी प्रथम परिस्थितीचे आकलन करून सध्या एकूणच होणारी शेतकऱ्यांची लुट लक्षात घेता जे निर्णय घेतला त्यांचे स्वागत करून त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी कार्यशील राहिले पाहिजे आणि ती जबाबदारी देशातील किसानपुत्रांची आहे.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, समन्वय समिती सदस्य, किसानपुत्र आंदोलन, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९ 

Friday, December 18, 2020

पालावरचे जग आश्रमशाळेचा वाटेवर....!

 

पालावरचे जग आश्रमशाळेचा वाटेवर....!

सध्या कोरोना संकट आले आणि या संकटात सगळे भीतीदायक वातावरणात जगत आहे. भिती असणे साहजिक आहे परंतु समाजाला कोरोना बरोबर जगण्याची सवय करून घ्यावी लागणार असे दिसते. शाळा कधी सुरू होतील ऑनलाइन शिक्षण कसे द्यावे या सर्व चर्चा रंगत असताना आश्रमशाळांचे काय होईल ? याबाबत मात्र सन्नाटा आहे. सरकारकडूनही याबाबत विशेष विचार होताना दिसत नाही. आश्रमशाळा योजना ही आदिवासी आणि भटके विमुक्त या वंचित वर्गाच्या शिक्षणाची योजना आहे. उपेक्षित वर्गातील मुले यामुळे शिकू लागली. त्यामुळे या वर्गाचे शिक्षण सुरु राहणे खूप महत्वाचे आहे. आदिवासी विभागाच्या राज्यात १०४६ आश्रम शाळा आहेत व त्यात साडेचार लाख विद्यार्थी शिकतात व समाजकल्याण विभागाच्या भटक्या विमुक्तांसाठी ९२० आश्रमशाळा आहेत त्यात विद्यार्थी शिकतात. अनुसूचित जातींसाठी 200 स्वतंत्र शाळा आहेत.

                   पण या सर्व शाळा निवासी असल्याने व विद्यार्थिसंख्या ३०० असल्याने शारीरिक अंतर ठेवून नियम पाळणे बाबत मार्गदर्शिका तयार करून शासनाने शाळा सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. आज ह्या उपेक्षित कुटुंबातील पहिली पिढी असले जी पालावरचे जग सोडून आश्रम शाळेच्या वाटेवर शिक्षणाचा मुळप्रवाहत आहे. कोरोना महामारी मुळे विद्यार्थाच्या शिक्षणावर कुऱ्हाड शासनाने मारू नये. राज्यात ज्या ठिकाणी आश्रम शाळा तिथे किमान पुढील दोन महिने वर्ग सुरू होण्याची शक्यताच दिसत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न अधिकच गंभीर होणार आहे. त्यात आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी दुर्गम डोंगराळ भागात राहात असल्याने तिथे ऑनलाइन शिक्षणाची शक्यता आहे का बघितले पाहिजे. तेव्हा आश्रम शाळा ही सुरू होत नाही तो पर्यंत प्रशासकीय स्तरावर सर्वाना जबाबदारी देऊन विद्यार्थना ऑनलाईन शिक्षण मिळण्याची सोय करणे खुप महत्वाचे आहे. कल्याणकारी राज्य व्यवस्था ज्यावेळी म्हणत असतो त्यावेळी कोणावर तरी अन्याय होणे हे योग्य नाही. मुलांनी शाळेत येऊन शिक्षण घ्यावे यासाठी आश्रम शाळा ह्या अद्यावत करणे यासाठी समाजातील दानशूर व्यक्तीचे सहकार्य शासकीय अधिकारी यांनी घेतले पाहिजे. जर आश्रमशाळा ह्या सुरु झाले नाही तर ही मुले शिक्षणातून गळती होण्याची शक्यता वाढणार आहे. अगोदरच पालकांच्या दारिद्र्याशी झगडा करत शिक्षक कसेतरी या मुलांना आश्रम शाळेत आणतात, टिकवण्याचा प्रयत्न करतात पण ते शिक्षण जर खंडित झाले तर पुन्हा गळतीचा धोका संभवतो. त्यामुळे शासनाने प्राधान्यक्रमाने उपाययोजना करायला हवी. 

           आश्रमशाळांतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिथे शाळा भरवणे शक्य आहे त्या शाळेत मुलांची कोरोना टेस्ट करून शाळा नियमित केले पाहिजे. आश्रम शाळेच्या खोल्या या मर्यादित असतील तर विद्यार्थी संख्या कमी करून अन्य जेवढी क्षमता असेल तेवढ्या साठी प्रेवश निश्चित करून शाळा सुरु केले पाहिजे. आज अनेक सामजिक संस्था महराष्ट्रात कार्य करत असतात शासनाने त्यांना विना अनुदानित परवानगी देऊन जर तांडा तिथे शाळा उपक्रम सुरु करून विद्यार्थना शिक्षणाचा मूळप्रवाहत टिकवून ठेवणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. शाळा बंद ठेवणे पर्याय असू शकत नाही ऑनलाइन शिक्षण शक्य आहे. आज अनेक आय टी क्षेत्रातील कंपनी आहे ज्यांच्या कडे मनुष्यबळ आहे यांचा उपयोग घेऊन शासनाने उद्यावत ऑफ लाइन अप्लिकेशन तयार करून शिक्षक विद्यार्थना संपर्क करून त्याबाबत आढावा घेऊ शकतात. आश्रम शाळेचे भवितव्य अधांतरीत असे करून चालणार नाही. महाराष्ट्र मध्ये अनेक विद्यार्थी हे आश्रमशाळेतून घडले आहे. कोरोना संकटात हतबल होण्याची गरज नाही तर पर्याय शोधणे गरजेचे आहे. संकट आहेत म्हणून पळ काढून मार्ग न शोधणे म्हणजे उपेक्षित कुटुंबाना आजून दारिद्याच्या खाईत लोटणे असे होईल. आश्रम शाळा हे सुरु कराव्या लागतील विद्यार्थना आज झालेले पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तिकांची छपाई करून शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सोडवायला सुरुवात करून त्यांचे शिक्षणही सुरू राहील. अधून मधून शिक्षक विद्यार्थ्यांच्या अडचणी बाबतही मदत करता येईल. 

            आज आश्रमशाळा सध्या तरी सुरु होणे असे दिसत नसले तरी ज्यांच्या कडे अद्यावत तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असलेले मोबाईल आहे त्या विद्यार्थाचे वर्ग सुरु केले पाहिजे. आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा काही प्रमाणात कमी झाले त्यामुळे एक विद्यार्थी एक टॅबलेटउपलब्ध करून त्यात महराष्ट्र शिक्षण विभागाचे सर्व अभ्यास अपलोड करून रोज किमान ४ तास शाळा भरू शकतात. त्याचप्रमाणे एका विद्यार्थ्यावर शासन जितके अनुदान देते ती रक्कम दर महिन्याला संस्था व पालकांना ५० टक्के अशी विभागून देण्यात यावी. त्यातून आश्रम शाळा संस्था मधील अद्यावत सुधारणा करण्यासाठी ती रक्कम उपयोगी होईल झालेल्या प्रत्येक कामाचे ऑडीट करून शाळा सुरु होण्यासाठी सहकार्य होईल तसेच काही रक्कम पालक त्या विद्यार्थ्यांचे योग्य पोषण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवू शकतील. या मुलांचे आरोग्य बिघडू नये व कुपोषण होऊ नये हा ही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे पालकांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे. त्यातून पालकांवर भार पडणार नाही. शाळेत दाखल करण्याची किमान दोन ते तीन महिने काही मार्ग नाही. या कालावधीत विध्यार्थना ऑनलाइन शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी पालकांना समुपदेशन करावे लागेल यासाठी व्यवसायिक समाजकार्य झालेले विद्यार्थी आहेत ते यासाठी कामासाठी घेता येतील विद्यार्थाचे पाठपुरावा व त्याची शिकण्याची सात्यतता हे बघण्याचे काम व्यवसायिक समाजकार्य पदवी घेतला व्यक्ती अतिशय उत्तम प्रकारे करू शकतील. ही योजना किमान वर्षभर राबवली तर या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची नुकसान होणार नाही. शक्य असेल तर त्या शाळेच्या शिक्षकांनाही जिथे विद्यार्थी आहेत त्याठिकाणी अध्यापनासाठी नेमकी व्यवस्था काय आहे हे तपासून तेथील विद्यार्थ्यांना सुविधा पुरवून शिक्षण देण्याचे कार्य शिक्षकांनी करणे गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थी शिक्षण खंडित होणार नाही. 

              या उपाययोजनेमुळे आश्रम शाळा बंद करण्याचा दृष्टिकोन अशा नजरेने न बघता ही तात्पुरती व्यवस्था विद्यार्थ्यांच्या हिताची आहे अशा दृष्टिकोनातून बघायला हवे. जर या दृष्टीने आपण बघितले नाहीतर यामध्ये सर्वांचे नुकसान आहे. यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य व जबाबदारी लक्षात घेऊन विद्यार्थी हिताच्या दृष्टीने शासनाने याची अंमलबजावणी करायला हवी. आज आश्रमशाळांतील शिक्षणामध्ये आदिवासी भटके विमुक्त यांच्यात एक मध्यमवर्ग तयार झाला आहे शिक्षणाबाबत आदिवासी भागात भटक्या-विमुक्त जागृती वाढते आहे तेव्हा अशा स्थितीत या विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाही. याबाबत तातडीने आग्रही भूमिका घेण्याची गरज आहे. खूप कष्टाने आदिवासी आणि भटके विमुक्त समुहातील शिक्षणाचे प्रमाण वाढते आहे त्याला कोरोनाचा विषाणू पसरला म्हणून शिक्षणाचे संकट होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. आदिवासी गावात व्यवसायिक समाजकार्य शिक्षण झालेला तरुण मुलांचीही लहान मुलांना शिकवण्यासाठी उपयोग करून घ्यायला हवा. रोज एकत्र येऊन तरून मुला मुलीनी लहान मुलांना एकत्र येऊन अभ्यासिका चालवायला हवी. त्यातून मोठी मुले लहान मुलांना शिकवू शकतील व शिक्षण सुरु राहील. पाड्यापाड्यावर आणि पालापालावर शिक्षणाची पेटलेली ज्योत विझता कामा नये आणि ह्या उपेक्षित घटक जो पालावर जीवन जगतो त्याच्या मधील शिक्षणाची दरी पडू नये यासाठी जे काही करता येणे शक्य आहे ते शासन व प्रशासन म्हणून करायला व्हावे. ह्या विद्यार्थांच्या शिक्षणासाठी काही सहकार्य करण्याची गरज जाणवली तर समाजातील दानशूर व्यक्ती सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढे येतील परंतु पालावरचे जग आश्रम शाळेच्या वाटेवर राहू दिले पाहिजे व शिक्षणाचा दिवा  विझू दिला नाही पाहिजे.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९

इ – मेल – bagul.mayur@gmail.com

देवराई निसर्गसंवर्धनाचा सांस्कृतिक वारसा

 

“देवराई निसर्गसंवर्धनाचा सांस्कृतिक वारसा”

            पर्यावरणच्या संरक्षणासाठी काम करणारे डॉ. उमेश मुंडल्‍ये यांचे देवराई हे पुस्तकं मागील काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. पुस्तकात मी देवराई विषयी वाचन करत असतांना हे पुस्तकं पर्यावरण क्षेत्रात तसेच एकूण भौगोलिक परिस्थिती बद्दल ज्यांना आस्था आहे त्यांच्या पर्यत पोहचवणे उचित वाटले. आज नवीन पिढीला देवराई म्हणजे काय असते हे शहरात राहून तरी माहिती होत नाही. देवराई हे पुस्तकं वाचल्यापासून लक्षात येते की आपल्या पूर्वजांकडे किती ज्ञान होते ते कधी गांभीर्याने आपण घेत नाही. पुस्तकात अनेक गोष्टी समजण्यास मदत होते. आंब्याच्या झाडाचे जंगल म्हणजे आमराई तसेच देवासाठी राखून ठेवलेली जंगले म्हणजे देवराई किती छान व सुंदर संकल्पना आहे. ही देवाचं जंगलं त्याची झाडाझुडपं पुर्वी म्हणे अशा अनेक देवराया महाराष्ट्रात होत्या. अशा देवराईत देवाचं वास्तव्य असल्यामुळे अशा जंगलातील पानपान वर्षोंवर्षे सुरक्षित राहत असे.

मागील काही वर्षांपूर्वी जागतिक बँकेने दिलेल्या निधीतून महाराष्ट्रातील देवरायांची काय परिस्थिती आहे याविषयी पाहणी, अभ्यास करण्याचा प्रकल्प बी.एन.एच.एस. मध्ये करण्याचे ठरले. डॉ. उमेश मुंडल्ये यांची निवड त्‍या प्रकल्पासाठी झाली होती. त्‍यापूर्वी प्रसिद्ध संशोधक माधव गाडगीळ व वर्तक यांनी तीस वर्षे देवरायांवर संशोधन करून पुणे -सातारा -सांगली या विभागातील चारशे देवरायांचा अभ्यास केला होता. त्यांनतर देवराई या विषयावर डॉ. उमेश मुंडल्ये यांनीच सखोल अभ्यास केला आहे. डॉ. मुंडल्ये यांनी सुरुवातीला सावंतवाडी मधील देवरायांना भेटी दिल्या त्यावेळी रेव्हेन्यू खात्यात त्यांनी चौकशी केली असता तेथे तब्बल साडेचारशे देवराया असल्याचे त्यांना कळले. यांनी १९९७ ते २००१ या चार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात ३७८३ देवराया असल्याचे दाखवून दिले. त्‍यासाठी त्यांना सरकारच्या रेव्हेन्यू खात्यातील नोंदींचा उपयोग झाला. त्यापैकी सुमारे १४५० देवरायांना त्यांनी स्वतः भेट दिली आहे. त्‍या भेटींदरम्यान त्यांनी संशोधनासाठी एक माहिती तक्ता तयार करून त्यात देवराईचे क्षेत्र, तेथे कोणती झाडे आहेत, तेथून गाव किती अंतरावर आहे, किती अंतरावर एस.टी येते. इत्‍यादी मुद्दे नोंदवले. 
 

डॉ. उमेश मुंडल्‍ये यांनी लिहिलेल्या पुस्तकात व अभ्यासादरम्यान अद्भुत म्हणता येतील अशा अनेक गोष्टी दिसल्या. देवराईतील जंगलांमध्ये स्थानिक गावकरी झाडे तोडत नाहीत. काही ठिकाणी देवराईत चप्पल घालून जायला मनाई असते. (अशा घनदाट जंगलात विनाचपलेचे वावरणे बिकट असल्याने कुणी तेथे फारसे जात नाही व ते जंगल आपोआप संरक्षित राहते असा विचार कुणीतरी जुन्या जाणत्याने केला असावा असे डॉ. मुंडल्ये यांना वाटते. काही ठिकाणी विळा/कोयता नेला तर चालते, पण कुर्‍हाड मात्र नेण्यास सर्व ठिकाणी बंदी असते. (त्‍यामागे अशा ठिकाणाहून कोयत्याने तोडण्यासारख्या वाळक्या लहान फांद्या सरपणासाठी आणता याव्यात, पण कुर्‍हाडीने मोठी झाडे तोडली जाऊ नयेत असा विचार असू शकतो.) प्रत्येक देवराईमध्ये एक किंवा अनेक देव असतात. काही ठिकाणी त्यांची रीतसर देवळे असतात तर काही ठिकाणी झाडाखालीच त्यांची स्थापना असते. चंद्रपूर -गोंदिया अशा आदिवासींच्या भागातील देवरायांमध्ये हत्तिदेव, घोडेदेव, वाघदेव असे प्राण्यांवर आधारित देव आहेत. काही ठिकाणी बांबूच्या वनात असलेल्या दैवताला कळकाई, वडाच्या झाडाखाली असलेल्या देवाला वडजाई अशी देवींची नावे असतात. कोकणात ब्रह्मदेवाच्या नावाने असलेल्या दोन देवराया आहेत. कोणताच देव नसल्यास बहुतेक ठिकाणी शंकराचे देऊळ देवराईत आढळते. अशा देवळां मध्ये गावातली मंडळी महिन्यातून एका दिवशी जमतात. देवराई मध्ये पाण्याचे उत्तम नैसर्गिक साठे असल्याचे दिसून आले आहे. कोकणातील कुडावळे या गावाजवळील देवराईतून तर नदीचा उगम होतो. भिमाशंकर परिसरातील डोण गावातील देवराई गावापेक्षा उंचावर आहे. गावातील विहिरी जानेवारी-फेब्रुवारी मध्येच सुकतात. मात्र उंचावर असलेल्या देवराईतील विहिरीला बारमाही पाणी असते. अनेक देवरायांमध्ये डॉ. मुंडल्ये यांनी दहा मीटर (सुमारे तेहतीस फूट) एवढा मोठा घेर असलेले वृक्ष पाहिले आहेत. एवढेच नाही तर दोन मीटर (सुमारे सहा फूट) घेर असलेल्या वेली त्यांनी बघितल्या आहेत. दातपाडी नावाचे झुडुपवजा झाड त्यांनी देवराईमध्ये वीस-पंचवीस फूट एवढे मोठे झालेले पाहिले आहे. त्‍यांनी देवरायांच्या अभ्यासादरम्यान ३६६८ देवरायांची नोंद केली. १०६८ वनस्पतींची ओळख पटवली. (गंमत म्हणून आपण झाडांच्या नावांची यादी करायची म्हटली तरी ती पंचवीसच्या वर जाणार नाही, हे बघता या संशोधनामुळे थक्क व्हायला होते.) या सर्व संशोधनासाठी त्यांनी खूप भटकंती (खरेतर पायपीट) केली आहे. किर्र जंगलात एकट्याने फिरताना त्यांना कधीही भीती वाटली नाही. त्‍याला अपवाद म्हणून फक्त एका देवराईमध्ये त्यांना आत शिरताना मनामध्ये अनामिक भितीची भावना जागृत झाल्याचे त्यांनी पुस्तकात नमूद केलेले दिसते. 

पुस्तकात वाचतांना लक्षात येते की अनेक देवरायांची स्थिती गंभीर होत आहे. पर्यावरण उपाय योजनेच्या नावाखाली फक्त निधी जाहीर केला जातो परंतु देवराई संवर्धन व देवराई बद्दल अधिक माहिती व प्रसारण करण्यासाठी आपल्यकडे किती लक्ष दिले जाते हा प्रश्न आहे. आज खाजगी जमिनीवरील अनेक देवराया, तेथील जमिनमालकांनी कोळसा करण्यासाठी अक्षरशः तेथील वृक्ष तोडून जाळले आणि अगणित वर्षांपासूनची असलेली वृक्षसंपदा नष्ट झाली. डॉ. उमेश मुंडल्ये यांनी आपल्या या वारशाचा अभ्यास केला. त्‍यामुळे त्यांना नवीन जीवनदृष्टी मिळाली व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करत असतांना आर्थिक फायदाही कसा करून घेता येईल याविषयी मार्गदर्शन करणारे हे पुस्तकं नवीन पिढीला निसर्ग संवर्धन करण्यासाठी ज्ञानाच खजिना म्हणून उपलब्ध करून दिले आहे. जुने ते सारे वाईट, मागास असे समजण्याच्या सध्याच्या मॉडर्नजमान्यात, जुन्यापैकी जे उपयुक्त आहे त्याचा अभ्यास करणे व त्यासंबधी विचार मांडणे हे गरजेचे आहे. डॉ. उमेश मुंडल्ये हे चाळीशीतील धडाडीचे संशोधक हे काम करत आहेत. त्यांच्या पुस्तकाचा उपयोग नवीन पिढीला निश्चितच दिशादर्शक ठरणारा आहे.

देवराई निसर्गसंवर्धनाचा सांस्कृतिक वारसा हे पुस्तकं लेखक डॉ. उमेश मुंडल्ये यांनी लिहिले असून ते साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशक संस्था) यांच्या संस्थेकडून प्रकाशित झाले. पुस्तकं मुल्य १७५/- असून एकूण १२८ पानांचे पुस्तकं आहे.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९

 

शिक्षणाच्या नावाने चांगभलं.

 

शिक्षणाच्या नावाने चांगभलं... 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे अनेकांच्या जीवनशैलीमध्ये फार मोठा फरक पडत चालला आहे. ऑफिस मध्ये आठ-आठ तास काम करणारा नोकरदार वर्ग आज घरात एकाच ठिकाणी बसून वर्क फ्रॉम  होमच्या नावाखाली बोर झाला आहे. मग मुलांची काय अवस्था झाली असेल. गेल्या शंभर दिवसापासून घरातच कोंडून राहावे लागल्यामुळे त्यांना घरात अस्वस्थ वाटू लागले आहे आणि लॉकडाऊन मुळे शाळा कॉलेज उघडणार नसल्याने आता घरातच बसून ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागणार. आता शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्रांतीचा उगम झाला आणि हे कुठं पर्यंत चालेल सांगता येणार नाही. ऑनलाईन शिक्षण घ्यायचे झाले तर तासंतास कॉम्प्युटर आणि मोबाईल समोर बसावे लागेल. शिवाय नेटवर्क च्या समस्या विद्यार्थी वर्गासमोर आ वासुन उभ्या  आहेच. मुंबईत जरी मोबाईलचे नेटवर्क चांगले असले तरी  खेडयात राहणार्या विद्यार्थ्यांचे काय? आज ही गावच्या ठिकाणी दोन दोन दिवस लाईट येत नाही मग मुलांनी मोबाईल चार्जिंग करायचे कुठे? याचा शिक्षण मंत्र्यांनी विचार केला आहे का? ऑनलाईन शिक्षण श्रीमंतांची मुले घेतील त्यांना परवडेलही, गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून द्यायचे काय? ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळा, कॉलेजची फी  पालकांकडून उकळण्याचा पुरेपूर प्रयत्न शिक्षण खात्याकडून होत आहे. त्यांना विद्यार्थी वर्गाच्या समस्यांचे काही देणे घेणे नाही. कोरोनाने खर्या अर्थाने शिक्षणाचे चांगभलं करून टाकले आहे. करोना व्हायरसचा जगातील इतर देशांसह भारतातही वाढता प्रादुर्भाव पाहता मार्च २०२० च्या मध्यावर शाळा व महाविद्यालये काही काळापुरती बंद ठेवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. हा व्हायरस नवीन असून त्यावर कोणतेही औषध वा लस उपलब्ध नाही आणि प्रसार अधिक वेगाने होत असल्याने त्यावर सध्या तरी उपाय एकच - तो म्हणजे सामाजिक अंतर पाळणे असे माध्यमांतर्फे आणि सरकारतर्फे सुचवण्यात आले. बघता बघता म्हणजे २४ मार्च रोजी केंद्र सरकारने लॉकडाउनघोषित केला.

सुरुवातीचे काही दिवस घराबाहेर पडू नका वगैरे सूचनांचे पालन करून झाल्यानंतर जेव्हा कोविड-१९ चा प्रसार दिवसेंदिवस वाढू लागला, तेव्हा मात्र हे काहीतरी वेगळे आणि गंभीर प्रकरण आहे आणि पुढचे कित्येक दिवस आपल्याला घरातच थांबावे लागणार आहे, याची सर्वांना जाणीव झाली. आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमकरण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनीही घरूनच काम करावे अशी व्यवस्था करण्यात आली. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दिवसाचा काही वेळ जाऊ लागला. कधीही कल्पनाही न केलेले आयुष्य समोर आले. या सगळ्याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर न झाला तरच नवल. शिक्षक आणि विद्यार्थी घरात अडकून पडले तरी शिक्षण दिले व घेतले जाऊ शकते आणि तेसुद्धा रोज वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही कल्पना जोर धरू लागली, आणि बघता बघता अगदी प्राथमिक ते अगदी पदव्युत्तर स्तरावरील अध्ययन व अध्यापन ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले.  करोना संसर्गामुळे चालू शैक्षणिक वर्षातील तीन महिने आतापर्यंत वाया गेले असून, यावर पर्याय म्हणून बहुतांश शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला आहे. विद्यार्थी व पालकांकडूनही या पर्यायास प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

 

तांत्रिक साधनाचा अभावमुळे २७ टक्के मुले शिक्षणापासून वंचित

 

 देशभरातील अनेक विद्यार्थी तांत्रिक सुविधांअभावी या शिक्षणापासून वंचित राहात असल्याचे एन.सी.आर.टी च्या सर्वेक्षणानुसार जर आकडेवारी बघितली तर लक्षात येईल. द नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, स्मार्टफोन व कॉम्पुटर यांसारखी साधने नसल्याने किमान २७ टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणात सहभागी होऊ शकत नसल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षणात ३४ हजार जणांचा सहभाग २८ टक्के विद्यार्थ्यांना अपुऱ्या वीजपुरवठ्याची समस्या टीव्ही, रेडिओ या माध्यमांचा नगण्य वापर 'एनसीईआरटी'ने केलेल्या या सर्वेक्षणात ३४ हजार जण सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक मुख्याध्यापकांनी अभिप्राय नोंदवले. या सर्वेक्षणात केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालयांसह सीबीएसई शाळांच्या शिक्षक, मुख्याध्यापकांचाही सहभाग होता. यातील २७ टक्के सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्याकडे स्मार्टफोन वा लॅपटॉप नसल्याचे सांगितले. तर, २८ टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अपुऱ्या वीजपुरवठ्याची समस्या जाणवत असल्याचेही स्पष्ट झाले. या इलेक्ट्रॉनिक साधनांचा शैक्षणिक उद्देशासाठी प्रभावीपणे वापर करण्याचे ज्ञान नसणे तसेच, या ऑनलाइन माध्यमांमध्ये शिक्षक पारंगत नसणे या अडचणीही येत असल्याचे या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले. ऑनलाइन शिक्षण ही सध्याची गरज झाली असली, तरी ३६ टक्के विद्यार्थी हे आजही त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाठ्यपुस्तके व अन्य पुस्तकांवर अवलंबून असल्याचे यात दिसून आले. यानंतर स्मार्टफोन व लॅपटॉपना पसंती मिळाली आहे. अध्ययन व अध्यापनासाठी टीव्ही, रेडिओ या माध्यमांचा नगण्य वापर होत असल्याचेही यात स्पष्ट झाले. करोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील शाळा आणि विद्यापीठे १६ मार्चपासून बंद ठेवली आहेत. आज सर्व सुरु असतांना महाविद्यालय मध्ये काळजी घेऊन महाविद्यालय व शाळा सुरु करणे गरजेचे वाटते. राज्यात दारूची दुकान उघडली, हॉटेल उघडली परंतु खाजगी क्लास किंवा शाळा व महाविद्यालय सुरु व्हावी म्हणून कोणी त्यावर विचार केला नाही. कोविड १९ आजार आहे काळजी घेतली पाहिजे पण नेमक किती दिवस शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवणार आहे. आज शिक्षणाची परिस्थिती बघता समाजिक विषमता वाढेल असे चित्र दिसते आहे. शिक्षण हे महत्वाचे असतांना शासन त्यावर गांभीर्याने विचार का करत नसावे.

ऑनलाईन शिक्षण, अडचणीच फार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणा पासून कुणीही विद्यार्थी वंचित राहू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये या भावनेतून शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणास प्राधान्य देत शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा निर्णय घेतलाय किंवा घ्यावा लागलाही, हे जरी खर असल तरी मात्र ज्यांच्याकडे लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन आदि सुविधा आहेत किंवा घेऊ शकतात अशा शहरातील सदन, चाकरमानी शिक्षित पालक आपल्या मुलांना सहज ऑनलाइन शिक्षण देवू शकतात, परंतु वीज खंडित होणे, बिघाड होणे या गोष्टिना पालक कसं आवर घालणार? शहरात राहतट म्हणून सर्वच पालकांकडे ऑनलाइन शिक्षणाची आयुध असतातच असे नाही किंबहुना मुलांना अभ्यास समजावून सांगण्या इतपत सक्षम असतातच असेही नाही. शाळेत प्रत्यक्ष जेवढा अभ्यास होतो त्याच्या अर्ध्यानेही घरात ऑनलाइन अभ्यास मूल एकाग्रपणे करू शकत नाही हेही तेवढेच सत्य होय. कोरोनाच्या चाहूलीने हबकलेल्या सरकारने सर्व शिक्षणसंस्था बंद केल्या आणि नंतर लॉकडाऊन जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय असा? प्रश्न पडला आणि त्यावर ऑनलाइन शिक्षणाचा उपाय सर्वांनी शोधला. तात्पुरती व्यवस्था म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय ठीक असला तरी तो कायम होणे योग्य ठरणार नाही. शाळेत वा कॉलेजमध्ये फक्त अभ्यासक्रम शिकविला जात नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होतात. तसेच इतरांशी कसे वागावं, वेळ पडल्यास आपला हट्ट सोडून देणे, दुसर्यांचं कौतुक करणे, सामुदायिक खेळातूनही खूप शिकायला मिळते. शिक्षकांशी रोज भेट झाल्याने एक वेगळं नातं तयार होतं. रोज शाळेत गेल्याने शाळेबद्दल आत्मियता वाटायला लागते. हे सर्व ऑनलाइन शिक्षणात होत नाही. हल्ली तसंही घरटी एक मूल असल्याने एकलकोंडी वृत्ती वाढीस लागली आहे ती ऑनलाईन शिक्षणाने वाढण्याचा धोका संभवतो. आता कोरोनासोबतच जगायचे असल्याने ऑनलाइन शिक्षण किती काळ चालू ठेवायचे ह्याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे.

ऑनलाईनमधील त्रुटी दूर करण्याची आवश्यकता

कोरोनाच्या साथीमुळे शिक्षणावर न भुतो अशी बंधने आली आहेत. विद्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन शिक्षण घेणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण हाच पर्याय उरला आहे. आपल्या देशात शिक्षण क्षेत्रामध्ये आधुनिक साधने उपलब्ध असतानाही बहुतांश ठिकाणी पारंपारिक म्हणजेच ऑन-कॅम्पस पद्धत रूढ आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये संक्रमण करताना भारतासह जगातील सर्वच शिक्षण संस्थांसमोर मोठे आव्हान आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे भरपूर फायदे आहेत. पण त्याचबरोबर काही त्रुटी व तोटे आहेत. या त्रुटी दूर करून नवे पर्याय शोधावेच लागतील. मुख्य म्हणजे अशा परिस्थितीची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने यथोचित ऑनलाइन शिक्षण साधने उपलब्ध होण्यास काही काळ लागू शकतो. सध्या काही संस्थांनी ऑनलाइन पद्धत स्विकारलेली आहे व ती बर्यापैकी यशस्वी होत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एकाग्र ठेवणे व त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष देणे कठीण आहे. अभियांत्रिकी, वैद्यकशात्र, किंवा तत्सम अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिक सहभागाशिवाय शिक्षण देणे आणि घेणे अशक्यप्राय आहे. म्हणजेच संपूर्णपणे ऑनलाईन शिक्षण होऊ शकत नाही. त्यासाठी वेगळ्या पद्धती आणि नियम बनवावे लागतील. ज्या ठिकाणी अद्ययावत संगणकीय सुविधा उपलब्ध नसतील तेथे त्या पुरवाव्या लागतील. ऑनलाइन शिक्षण ही आजच्या परिस्थितीतील अपरिहार्यता असली तरी हा कायमस्वरूपी तोडगा नव्हे. देशात आज ऑनलाइन शिक्षणाचे प्रमाण 30 टक्के आहे. परंतु हे फक्त महानगरांमध्ये आढळते. इंटरनेटची तसेच विजेची उपलब्धता, स्पीड, संस्थांमधील यंत्रणा, शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षक व विद्यार्थी यांचे कसब अशा अनेक पैलुंवर याचे यश अवलंबून आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी परीक्षा पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल करावे लागतील. त्याचबरोबर हॅकिंग /व्हायरस सारख्या समस्यांसाठी खात्रीलायक उपाय योजावे लागतील. मुंबई विद्यापीठामध्ये आजही दूरःस्थ / बहिःशाल विभागात ऑनलाईन पद्धत असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठात प्रत्यक्ष जावे लागतेच. अशा पार्श्वभूमीवर आपण या नव्या संकटास किती प्रभावीपणे तोंड देऊ शकू याबाबत साशंकता आहे. पण विद्यार्थ्यांचे आयुष्यातील किमान एक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे ते टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण अपरिहार्य आहे. मात्र त्यातील त्रुटी आपल्याला जाणीवपूर्वक व चौकटीबाहेरचे परिश्रम घेऊन दूर कराव्या लागतील.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९

माणुसकीच्या शोधात आहे...!

 

माणुसकीच्या शोधात आहे...!

 सध्याच्या परिस्थितीमध्ये जात, धर्म याचा दुरुपयोग करून समाजाचे विघटन केले जात आहे. माणसाची मन दुरावत आहेत. आपण २१ व्या शतकात प्रवेश केला आणि गेल्या दशकापासून ते आत्तापर्यंत आम्ही आमचा देदीप्यमान विकास केलेला आहे. पण हा विकास होत असताना खरंच या माणसाला माणूसपण राहिलंय का? हा प्रश्‍न मनामध्ये मात्र थैमान घालू लागला आहे. अमानुष कृत्याचं दर्शन आपल्याला वृत्तपत्र व वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा डोळ्यांसमोर येतं तेव्हा मन अस्वस्थ होऊन जाते. बलात्कारासारखं निंदनीय कृत्य, स्त्रीयांवरील वाढत चाललेले अत्याचार, बिहार मध्ये अनाथ मुलांवर झालेला प्रसंग हा माणुसकीच्या नावाला काळीमा फासणार्‍या या सर्व गोष्टी कधी थांबणार आहेत? म्हणूनच आजची स्त्री अबला की सबला हा प्रश्‍नदेखील निरुत्तरीत आहे. प्रत्येक माणूस विचारी असतो. माणसाला मेंदू असतो अन् त्या मेंदूत अक्कल ही असतेच. पण त्या अकलेचं आज खोबरं झालेलं आहे. माणूस किती जगतो याला महत्त्व नाही तर त्यापेक्षा तो कसा जगतो याला फार महत्त्व आहे. आयुष्यातील खडतर प्रवासाने यश संपादन होत असते. सर्वप्रथम विद्यार्थी घडत असताना शिक्षकांनी त्यांच्यासमोर आदर्श ठेवला पाहिजे. त्याचबरोबर आई-वडिलांनी चांगले संस्कार पेरणे गरजेचे आहे. पालकांनी बेजबाबदार न राहता त्यांच्यामध्ये चांगले विचार बिंबवणे खूप गरजेचे आहे. माणसाची सर्वांत महत्त्वाची गरज नुसते शिक्षण नाही, त्याचे चारित्र्य आहे. नुसतेच पुस्तकी ज्ञान न घेता चारित्र्य संवर्धन होणेही गरजेचे आहे. त्याने स्वत:चे रक्षण होत असते. दैनंदिन जीवन जगत असतांना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता, त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावु तेवढा लागतो, जेवढा ताणू तेवढा ताणतो, जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. कधी ती लगेच पहायला मिळते तर कधी कधी ती शोधावी लागते. कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून तर कधी बोलण्यातून त्याची ओळख होत असते. प्रत्येक शब्द कितीही छोटा वा मोठा असो त्या शब्दाच्या गर्भितार्थावरून त्या शब्दाची जाडी-रूंदी आणि त्याची विस्तृतता कळते. त्यापैकी असाच एक जो आपल्या सर्वांना परिचित असलेला पण त्याची फारशी खोल ओळख नसणारा शब्द म्हणजे  माणुसकी. ओळख नसणारा शब्द यासाठी की आजचा माणूस माणसाची ओळख विसरत चालला आहेमाणुसकी हा केवळ शब्दच नव्हे तर पर्यायाने आपल्या रोजच्या जगण्यातून खुद्द माणूसकीच गहाळ होत चालली आहे असे चित्र आहे. ऎकायला आणि बोलायला अगदीच सहज आणि सोपा वाटणारा हा शब्द, पण त्याचा नेमका अर्थ काय.?  माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. खरच पाहायला मिळते का या सध्याच्या धावपळीच्या जगात ही माणुसकी. पण या माणुसकीला जर ओळखायचे असेल तर असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आले असतील आणि जरी अद्याप आले नसतील तरी कधी ना कधी ते नक्कीच येतील. जीवनात आलेल्या त्या प्रसंगाना अगदी एकांतात बसून बारकाईने त्यावर नजर टाका म्हणजे माणुसकीतला माणूस किंवा माणसातली माणुसकी शिल्लक राहिली आहे का हे कळेल. या जगात कोणीही तुमचा मित्र किंवा शत्रु म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टीकोण, आपली नाती आणि त्यापेक्षा त्या नात्यांमधील प्रेम यावर ठरते कोण आपला मित्र कोण आपला शत्रू आहे ते. मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या विचार आणि कर्तुत्वावर अवलंबुन असते. तुमच्या विचारातूनच तुमचं व्यक्तिमत्व झळकत असतं, त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी इतरांचे लक्ष असते, तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात, म्हणून सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व घडवा.

शरीर जे एक वाहन म्हणून तो त्याचा वापर करतो आहे, आणि त्या वाहनाला लागणारे इंधन हे एकाच आहे, परंतु आपले विचार ग्रासले, माणुसकी हरवली आणि आपण त्या इंधालाच सर्व काही मानून बसलो. याचा अर्थ असाही नाही कि आपण बसून राहवे, आपण काहीच करू नये. आपण कष्ट करावेत, ते इंधन मिळावे परंतु या परिस्थिती आपण आपल्या बुद्धीला कुठले इंधन दिले पाहिजे ज्यामुळे विचारांची सीमा वाढेल हे समजणे गरजेचे आहे. समाज माध्यम आज ज्या पद्धतीने चित्र मांडत असतात हे बघितल्यावर नेमकं कळत की आपण विकासाच्या नाही तरी आपल्या प्रगती मधील अडथळे तयार करतो आहे. समजतील एकंदरीत परिस्थिती बघितली तर सकारात्मक पेक्षा नकारात्मक घटना जास्त चर्चेत आणले जाते. माणसातील माणूस आजच्या धावपळीच्या जगात हरवत आहे. साधारणपणे १५ ते २० वर्षापूर्वी ग्रामीण भाग हा बहरलेला होता पण आज ग्रामीण भागातील उदासीनता, मोठ्या प्रमाणात असलेले बेरोजगार, उद्योग व्यवसायाची कमतरता कदाचित या करणामुळे देखील माणसाच्या विचाराची पातळी घसरली असेल आणि माणसातला माणूस हरवला असेल. शहरात प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढली त्यामानाने तेथील सुविधा ह्या कमी पडू लागल्या लोकांन मध्ये संघर्ष व स्पर्धा वाढू लागली. एकत्र कुटुंब ही विभक्त झाली प्रत्येक व्यक्ती फक्त स्वता पुरता मर्यादित विचार करू लागला. ज्यांच्या कडे लक्ष्मी आहे ती फक्त त्यांच्या कडे जाताना दिसते गरीब जनता एक वेळ फक्त भूक पूर्ण करत जीवन जगत आहे. माणुसकी की समाजातील प्रत्येक व्यक्ती मध्ये रुजवली पाहिजे यांची सुरुवात ही खरी कुटुंबा पासून सुरु झाली पाहिजे. आज शहरात मोठ्या प्रमाणात मोठ मोठ्या सदनिका मध्ये लोक वास्तव करत आहे. प्रत्येकाला वेळ आठवड्यातून काढता येई शकतो आणि आपन जिथे राहतो तिथे जर आपण वैचारिक वर्ग अथवा ज्यामुळे सकारात्मक घटना ज्यामुळे समाजातील नवीन तयार होणाऱ्या पिढी मध्ये संस्कार व मुल्ये रुजवण्यास मदत होईल. अशक्य असे काही नसते फक्त चांगले काही करण्याची उमेद आपल्या मनात असली पाहिजे. माणसाच्या वाढत्या गर्दीत माणुसकी शोधत फिरतोय मी,रस्त्यावरील भीक मागणाऱ्या माणसात देव शोधत फिरतोय मी,कधी त्यांच्या वेदना तरकधी त्याच्या संवेदनाशी जीवनाचं कडीमोल व्याख्या विचारतोय. आयुष्य सुंदर म्हणत भरकटणारे कोण आणि सुंदर आयुष्य स्वतःच्या कर्तृत्वावर व स्वतःच्या मनगटी मिळवणारे कोण.? सांगाल का.?

मानवी जीवन जगतोय म्हणजे समाजात आम्ही कोणत्या अंगांचे शृंगार करतोय, मानवी जीवन म्हणजे केवळ आणि केवळ मी आणि माझं पण यातच गुरफटून बसलेला हा समाज कधी आजूबाजूला चालू असलेल्या या निर्घृणपन समजून त्यांवर आपली माणुसकीच्या भिंती बांधत फिरणे हा कर्तव्य समजा व मानवी जीवणाचा उद्धार पणा ही प्रत्येकाच्या हृदयात जागे व्हावे ही काळाची गरज आहे. माणुसकी म्हणजे माणसांनी माणसांशी वागण्याचे कौशल्य नव्हे तर माणसांनी माणसांशी आपुलकीतून आपलंसं मानणारा वर्ग म्हणजे माणुसकीचा रखाना. या मातीशी नाळ असणारा जागृत वर्ग म्हणजे माणुसकी या मानवी जीवनातील प्रत्येक सजीव सृष्टीसोबत रक्ताचे नाते निर्माण करणारा म्हणजे माणुसकी. या मानवी जीवनात जीवन जगत असतांना अनेकदा डोळ्यासमोर ठळकपणे दिसुन येते या शेतकाऱ्यांवरील अन्याय असो व माझ्या स्त्रीवर्गावरील अत्याचार किव्हा दलितांवरील अन्याय हे सहज हळव्या मनाला स्पर्शून सांगून जातात,बेटा या जगात माणुसकी लोकपावली आहे, अत्ता त्या शब्दाचा केवळ उदोउदो करण्या पलीकडे आपल्याकडे दुसरं काही उरलं नाही.

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

भ्रमणध्वनी – ९०९६२१०६९