Tuesday, February 6, 2024

मी नदी बोलते आहे...!


 

               मी एक नदी बोलते, माझा जन्म हिमालयाच्या उंच शिखरावर झाला. लहानपणी मी फारच अवघड होते. कधी एका जागेवर न थांबता मागेपुढे न पाहता एकसारखे दगड-गोटे, झाडे-झुडपे यांच्या मधून रस्ता काढत फक्त धावत राहायचे. वाटेतील वेली माझी वाट अडविण्याचा प्रयत्न करत आणि माझ्याशी लपंडाव खेळत पण कुणालाही न सापडतात मी धावत राहायचे. वाळू व माती माझ्या पात्रातून नेऊन मला कोरडे ठणठणीत करीत आहेत. कसे होणार माझी व माझ्या सहवासातील जलचरांची जोपासना कोण करेल हे मनुष्याला केव्हा कळणार? आमच्यावरील हे अन्याय-अत्याचार केव्हा थांबणार आज मनुष्याला सावध करणे गरजेचे झाले आहे. मला गलिच्छ करतात मी इतके चांगले त्यांचे करत असते. माझा श्वास गुदमरला इतकी घाण फुले कचरा आणि सांडपाणी टाकून मला प्रदूषित करतात. तेच पाणी पिऊन मग त्रस्त होतात. त्यांना हे कळत नाही की मी वाहत राहिले तरच त्यांना चांगले पाणी मिळेल. त्यांना कोण सांगणार, मी हे सर्व मूकपणे सहन करते आणि माझ्या बाबांकडे आणि शंकराकडे विनवणी करते, की त्यांना समजू दे. नाहीतर माझा संयम संपला तर ह्याचा सर्वनाश होईल. देवा ही वेळ माझ्यावर आणू नको. मला अनेक भाऊ-बहिणी येऊन मिळायचे त्यामुळे माझा वेग वाढतच असते. त्यापासून पायथ्यापर्यंत जाताना रस्त्यात अनेक संकटे येतात. त्या सर्व संकटांना तोंड देत मी माझे ध्येय गाठत असते. एखाद्या योध्याप्रमाणे मी लढत असते आणि पुढे जात असते. नंतर मात्र वाट चालणे मुश्कील होईल कारण सपोर्ट रस्त्यांवर शेतीवर अनेक अडथळे पार करणे जिकरीचे होऊन त्यांच्याशी सामना करत माझी स्वारी तशीच आपले घोडे दवडत पुढे चालत असते. पण या सर्व प्रवासामध्ये मला माझ्या बहिण भावांनी शेवटपर्यंत खूप साथ दिली आणि मैलोन मैल धावत सर्व गावांना माझी शुद्ध जल वाटत राहिले सर्वांची तहान भागवत राहिले. त्यावर तिथे जमिनींना आपले पोट भरून घेतले सर्व शेती माझ्यामुळे हिरवेगार दिसू लागते. शहरे अन्नधान्यांनी संपन्न होतात. मनुष्याला आपल्या बुद्धीचा अभिमान आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण तसेच अनेक प्रकल्प वगैरे केले जातात. पण तेही प्रदूषण न करता सर्वांना शुद्ध पाण्याचा उपयोग घेऊ दिला तर जलचर तरी सुखाने जगतील पण पैसे कमावण्या -च्या हव्यासापोटी माझ्या पात्राचे व पाण्याचे प्रदूषण होत आहे. गणपती विसर्जनासाठी आल्यानंतर तसेच इतर वेळीही निर्माल्य माझ्या प्रवाहामध्ये सोडून देतात आणि मला दूषित करतात.

कचरा सुद्धा तुम्ही माझ्या पात्रात टाकता. काही जण तर वाहने सुद्धा माझ्या पात्रातून धूतात खरंतर मला तुम्ही सर्वजण खूपच पवित्र मानतात, पण तुम्हीच माझ्या पवित्र पणाला डाग लावत आहेत. मी डोंगर माथ्यावरून खूप खोल दरीत उडी मारुन डोंगरावरून सोप्या सोप्या मार्गाने येणारच नाही. माणूस असल्याने आता मला जाता येत नाही. अशा अडचणीच्या जागांवरून झाडाझुडपातून या वरून त्या खडकांवर उड्या मारत उसळ्या घेत खाली येईल तिथून रमत-गमत समुद्रात जाते. समुद्रात गेल्यावर तर मज्जाच मज्जा होते.

लहान-मोठी हजारो रंगीबिरंगी मासे पाहायला मिळतात. त्यांच्या अंगावरुन हात फिरवून मी पाहिल मला भितीच वाटणार नाही. कधी समुद्राच्या महाकाय लाटांबरोबर दंगामस्ती करीत तर कधी समुद्राच्या तळाशी असलेल्या खोल भुयारातून एकटीच फिरेल मी नदी बनले तर एक गोष्ट नक्की करीन डोंगरातून उतरताना उड्या मारताना उसळत येईन. तसा गावात आल्यावर मात्र धावणार नाही. गावातून मी संथपणे वाहत जाईल.

माझ्या पात्रात मी लहान-मोठे डोह निर्माण करीन, मग माझ्यासारखीच खूप मुलं घेऊन मनसोक्त होतील. मला त्यांच्याशी खेळायला मिळेल मी माझ्या काठावर मोठी खूप झाडे वाढवीन येणारे-जाणारे वाटसरु मग घटकाभर किंवा क्षणभर माझ्या पाशी विसावा घेतील व पुढे जातील. संध्याकाळी अनेक लोक काठावर येथील माझ्या प्रवाहाचे सौंदर्य आनंदाने पाहता येईल गप्पा मारतील आणि तृप्त होऊन घरी परततील मी नदी बनलो तर नदीच्या काठावरील सर्व परिसर सुजल सुफल बनवेल.

लोकांना पाण्याचे महत्त्व समजू सांगेल व त्यांना शेती टिकवण्यास मदत करेल. माझा प्रवाह मी स्वतः बनवेल जिथे माझी गरज आहे, तिथे नक्की जाईल. मी कधीच विश्रांती घेत नाही, नेहमी वाहत असते. खूप लोक माझ्या पाण्यात विविध प्रकारच्या वस्तू टाकत असतात. त्यामुळे माझे पाणी दूषित होते. मी दूषित झाल्यामुळे तुमचेच आरोग्य धोक्यात येते, असे न करता मला स्वच्छ ठेवत चला म्हणजे तुमचे जीवन निरोगी राहील. समोर मी समुद्राला मिळत असते. अशा प्रकारे माझे जीवन आहे. तुम्ही सर्वच प्राणी जन्मता आणि मरता पण मी कधीच मरत नाही. मी सदैव वाहत असते. मी मानव समाजाची मोठी सेवा करते. तसेच सर्वच प्राण्यांची देखील तहान भागविते. पक्ष्यांची सुद्धा तहान भागवते. मानव जातीची मोठी सेवा मी करीत असते. त्यांनी माझे आभार मानायला पाहिजेत, पावसाळ्यात तर मी खूप ओसांडून वाहत असते आणि त्यामुळे मला माझ्या काठाच्या वरून मला जावे लागते आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते आणि बहुतेक लोकांचे नुकसान सुद्धा होते.

पण यामध्ये मी दोषी कसे ठरणार? माझे पाणी थांबण्यासाठी तुमच्या सरकारने अनेक जागी मोठे बंधारे बांधले आहेत. कधीकधी मला माझे उग्ररूप सुद्धा धारण करावे लागते. माझ्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतो तसेच जे काही शेतकरी करतात त्यांची पिके अधिक जोमाने वाढतात. माझे पाणी माझ्या काठाच्या दोन्ही बाजूंच्या शेतांची सुपीकता वाढविते, तेथे मुबलक पिके वाढतात. देश समृद्ध होतो. लोकांनी माझ्या किनार्‍यावर मोठी शहरे वसविली आहेत.

यातील काही शहरे संस्कृतीची केंद्रे आहेत, काहींना व्यावसायिक महत्त्व आहे, तर काही लोक व्यापार करण्यासाठी सुद्धा माझा वापर करतात. माझ्या पाठीवरून नौका चालवितात आणि मोठ्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंची देवाणघेवाण करतात. पृष्ठभागावर ते नका आणि स्टीमर चालवतात शेकडो लोक पाण्याने स्नान करतात. माझे पाणी पिण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरतात.

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९ 

No comments:

Post a Comment