शिक्षणाचा दर्जा कोणत्याही माणसापासून लपलेला नाही. शिक्षणाच्या महत्त्वाचा सुगंध सुसंस्कृत समाज घडवतो. सुसंस्कृत समाज हा सुशिक्षित वर्गाचा बनलेला असतो. मुलांना चांगले शिक्षण देणे ही पालकांची पहिली जबाबदारी आहे. मुले शिक्षित झाली तर त्यांच्यासोबत कुटुंब आणि समाजही शिक्षित होईल. मुलांना त्यांचे पहिले शिक्षण त्यांच्या पालकांकडून मिळते. त्यानंतर, शाळेत म्हणजेच शाळेत पाऊल ठेवताच, मुले शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात येतात. शाळा म्हणजेच शालेय शिक्षण ही मुलांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सुजाण नागरिक होण्यासाठी शालेय शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेतील शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करून विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. शाळेत, विषयाशी संबंधित ज्ञानाव्यतिरिक्त, विद्यार्थ्याला व्यावहारिक जीवनाशी संबंधित व्यावहारिक ज्ञान नक्कीच मिळते. गेली दोन वर्षा पासून कोविड १९ च्या मुळे शिक्षण कसे मिळत गेले हे आपल्याला माहिती असेलच. शिक्षण कधी हे ऑफलाईन किंवा ऑनलाईन असे काही सुरु होते. यामध्ये एकूणच शिक्षण गुणवत्ता कशी विकसीत झाली असेल हा प्रश्न पडतो. शालेय विध्यार्थ्यांच्या लेखन, वाचन, गणित, सामान्य ज्ञान आदी कौशल्याबाबतची माहिती आकडेवारीसह मांडणारा 'प्रथम' संस्थेचा 'असर' अहवाल सादर होत असतो. देशात दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक दर्जात अजनूही 'कसर' असल्याचे अनेक धक्कादायक निष्कर्ष हे दरवर्षी अहवालातून समोर येत असतात. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कितीही योजना आणि उपाय केल्या जात असले तरी प्रत्यक्षात मात्र त्या प्रमाणात त्याचा असर होत नसल्याचे सत्य दरवर्षी समोर येत असतो. देशाच्या सार्वजणीक विकास प्रक्रियेमध्ये शिक्षणाचा महत्वाचा वाटा असतो. सर्वांगिण विकासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ निर्मितीची प्रक्रिया असो कि, सामाजिक जीवनाचा स्तर उंचविण्यासाठी तसेच राष्र्टीय विकासाच्या प्रक्रियेचे चक्र गतीमान करण्यासाठीची प्रक्रिया असो. दर्जेदार आणि गुणात्मक शिक्षण हेच या प्रक्रियेसाठी पोषक ठरते. परंतु दुर्दैवाने सार्वत्रिक दर्जदार शिक्षणाचे उद्दिष्ट अजून पूर्ण झाले नसल्याची वास्तूस्थती असर च्या अहवाल निमित्ताने समोर येत असते. त्यामुळे देशातील शैक्षणिक पद्धतीतील उणिवा दूर करण्यासाठी या क्षेत्रातील त्रुटींवर अधिकाधिक ऊहापोह होणे आवश्यक आहे.
प्रथम या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने २००५ पासून भारतीय शिक्षणाचा वार्षिक दर्जा अहवाल, 'असर' अर्थात ‘अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ प्रकाशित केला जातो. प्रत्येक राज्यातील काही जिल्हे निवडून घरोघरी भेट देऊन हे सर्वेक्षण करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्य, आकलन, आकडेमोड यांची चाचणी घेतानाच व्यवहारात या कौशल्यांचा वापर मुले कशी करतात याचीही चाचणी या सर्वेक्षणात घेण्यात येते. असरमध्ये आतापर्यंत ६ ते १४ वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक कौशल्यांची चाचणी घेण्यात येत होती, मात्र यावेळी पहिल्यांदाच १४ ते १८ वयोगटातील विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जाचे सर्वेक्षण करण्यात येते. कोविड मुळे शिक्षणाचा बट्याबोळ झाला आहे. त्यामुळे असर संस्थेने सर्वेक्षण केले तरी अहवाल हा सुधारणात्मक नसेल. आज मुलांची शाळा पाहिजे तसी झाली नसल्याने मुलांमध्ये शिक्षण कौशल्यात मागे पडले. त्यामुळे शाळेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची दशा आणि दिशा काय? हे एकवेळ तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. देशाच्या लोकसंखेच्या अर्धीअधिक संख्या युवकांची असल्याने भारत हा युवकांचा देश असल्याचे मोठ्या गौरवाने म्हटले जाते. मात्र, ज्यांच्या खांद्यावर देशाचे भविष्य आणि वर्तमान अवलंबून आहे, त्या नवयुवकांच्या शैक्षणीक दर्जाची आणि गुणवत्तेची अशी व्यथा असेल तर जागतिक स्पर्धेच्या बाजारपेठेत हि पिढी टिकेल का? यावर अंतर्मुख व्हावे लागणार आहे. शिक्षण क्षेत्रात मुलांचा शैक्षणिक खंड पडला त्यामुळे शाळेत मुलांना लिहिणे, वाचणे यासारखे कौशल्य मध्ये मागे पडले आहेत. त्यामुळे सर्व शिक्षण अधिकार कायद्यानुसार सरसकट उतीर्णी करून मुलांना पुढील वर्गात प्रवेश दिला जातो आहे.
आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आजचे युग स्पर्धेचे युग म्हणून ओळखले जावू लागले आहे. या स्पर्धेच्या युगात तग धरण्यासाठी पारंपारीक शिक्षणातील पदव्या पुरेशा नाहीत. तर काळ सुसंगत व्यवसायीक व रोजगारभिमुक अभ्यासक्रमावर भर देण्याची आता गरज निर्माण झाली आहे. याची सुरवात प्राथमिक शिक्षणापासूनच करावी लागणार आहे. देशातील प्रत्येक मुलाला सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा करण्यात आला. यामुळे 'पट' वाढला असेल, पण 'पत' अजून सुधारली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यामागील कारणे शोधून शिक्षणाची पत सुधारण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे." विद्येविना मती गेली ,मती विना निती गेली, निती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले". महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या प्राख्यात रचनेतून शिक्षणाचे महत्त्व आणि मानवी विकासाची क्षमता शिक्षणात दडलेली असल्याचे लक्षात येते. सामाजिक, मानवी आणि राष्ट्रीय विकासाचे शिक्षण हेच प्रभावी माध्यम ठरू शकते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील वर्तमान 'कसर' वेळीच भरून काढावी लागणार आहे. शिक्षणाला जेव्हा आजूबाजूच्या वातावरणाशी जोडले जाते तेव्हा त्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या संपूर्ण जीवनावर होतो, त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर देखील होतो. उदाहरणार्थ, जपानकडे पहा, तिथे शिनरीन-योकू ची पद्धत आहे. शिनरिन म्हणजे जंगल किंवा वन आणि योकू म्हणजे स्नान. म्हणजेच वन-स्नान. तेथे विद्यार्थ्यांना जंगलात नेले जाते किंवा जिथे बरीच झाडे-झुडपे आहेत अशा ठिकाणी नेण्यात येत, जिथे मुलांना नैसर्गिकरित्या निसर्गाचा अनुभवायला मिळेल. झाडे-झुडपे, फुलांना ऐकायला पाहायला, स्पर्श करायला, सुगंध घ्यायला मिळेल. यामुळे मुलं निसर्ग आणि वातावरणाशी जोडली जातात आणि त्यांच्या समग्र विकासाला चालना मिळते . मुलेही याचा आनंद घेतात आणि एकत्र बर्याच गोष्टी शिकत असतात. मुलांना शाळेत सांगितले पाहिजे की गावातील सर्वात जुना वृक्ष सर्वात जास्त वय असलेले झाड कोणते आहे ते शोधा. यासाठी मुलांना सगळीकडे जावे लागले, गावाच्या सभोवतालची सर्व झाडे पहावी लागतील, शिक्षकांना विचारावे लागले. आणि प्रत्येकाने हे मान्य केले की हे झाड खूप जुने आहे आणि नंतर मुले शाळेत आल्यावर त्यावर गाणी लिहायची, निबंध लिहायचा.
परंतु त्या प्रक्रियेत, त्यांना बरीच झाडे बघावी लागली, सर्वात जुने झाड शोधावे लागले. त्यामुळे ते बर्याच गोष्टी शिकल्या आणि हा प्रयोग खूप यशस्वी झाला. एकीकडे मुलांना वातावरणाविषयी माहिती मिळाली, तसंच त्यांना त्यांच्या खेड्यांविषयी बरीच माहिती मिळवण्याची संधीही मिळाली. आपल्याला अशा सोप्या आणि नाविन्यपूर्ण पद्धती विकसित कराव्या लागतील. हे प्रयोग आमच्या नवीन युग शिक्षणाचा मुलमंत्र असले पाहिजेत – Engage, Explore, Experience, Express आणि Excess म्हणजेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार क्रियाकलाप, कार्यक्रम, प्रकल्पांमध्ये व्यस्त रहावे. स्वत: नुसार ते समजून घ्यावे. या विविध घटना, प्रकल्पांना आपला अनुभव आणि दृष्टीकोनानुसार समजून घ्या. हा त्यांचा वैयक्तिक अनुभव किंवा एकत्रित अनुभव असू शकतो. मग मुले विधायक मार्गाने व्यक्त करणे शिकतात. या सर्व गोष्टी एकत्रित केल्याने पुन्हा उत्कृष्ट होण्याचा मार्ग तयार होतो. आपण मुलांना पर्वतावर, ऐतिहासिक स्थळांवर, शेतात, सुरक्षित कारखान्यांमध्ये नेऊ शकतो. आता बघा, तुम्ही वर्गात मुलांना रेल्वे इंजिना विषयी शिकवत. तेव्हा तुम्ही फक्त शिकवता पण कधी गावाजवळील रेल्वे स्टेशनवर घेऊन जा इंजिन कसे आहे ते मुलांना दाखवा मग कधी बसस्थानकावर घेऊन जा, बस कशी असते ते दाखवा. मुलं ते पाहून शिकण्यास सुरवात करतात. मला माहित आहे की बर्याच मुख्याध्यापकांनी आणि शिक्षक असा विचार करत असतील की आमच्या शाळेत किंवा महाविद्यालयात असे करतो. मला विश्वास आहे की बरेच शिक्षक अभिनव कल्पना राबवतात परंतु हे सर्वत्र होत नाही. आणि यामुळे बरेच विद्यार्थी व्यावहारिक ज्ञानापासून दूर राहतात. या चांगल्या गोष्टींचा जितका प्रसार होईल तितकीच आमच्या शिक्षकांना शिकण्याची संधी मिळेल. शिक्षक आपला अनुभव जितका सामायिक करतील तितका ते मुलांना त्याचा फायदा होईल. या पूर्वीचे जे शौक्षणिक धोरण होते, त्याने आपल्या अनेक विद्यार्थ्यांना गुंतवून (बांधून) ठेवले होते. जसे उदाहरण घ्यायचे झाले तर, जो विद्यार्थी शास्त्र शाखेत प्रवेश घेतो, तो कला किंवा वाणिज्य शिकू शकत नाही. कला – वाणिज्य मधील मुलांसाठी समजून घेऊ की ते इतिहास, भूगोल, सांख्यिकी अशासाठी शिकत आहेत, की ते शास्त्र शिकू शकत नाहीत. पण काय खऱ्या जगात, तुमच्या आमच्या आयुष्यात असे घडते का, की फक्त एकाच क्षेत्राची माहिती घेऊन सगळी कामे होतात ? प्रत्यक्षात सगळे विषय एकमेकांशी जोडले गेलेले आहेत, एकमेकांशी बांधले गेलेले आहेत. प्रत्येक शिक्षण परस्परांशी जोडले गेले आहे. विद्यार्थी जे कोणते क्षेत्र निवडतात, त्यांना कालांतराने वाटू लागते की ते दुसऱ्या कोणत्या तरी क्षेत्रात अधिक चांगले काम करू शकतात. मात्र विद्यमान व्यवस्था ही त्यांना बदलण्याची, नव्या संधींशी जोडले जाण्याची संधीच देत नाही. बऱ्याच मुलांचे नापास होण्याचे, शिक्षण सोडण्याचे देखील हे एक मोठे कारण आहे. म्हणूनच, राष्ट्रीय शिक्षण धोरणाने विद्यार्थ्यांना कोणताही विषय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. याकडे मी एक मोठी सुधारणा या अर्थाने बघतो. आता आमच्या युवकांना विज्ञान, मानवता किंवा वाणिज्य यामध्ये कोणत्या एका चौकटीत बसावे लागणार नाही. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला, त्याच्या प्रतिभेला आता पूर्ण संधी मिळेल.
आज मुले प्रत्यक्ष कृती, निरीक्षण आणि अनुभव यांतून आणि शैक्षणिक साधनांच्या आणि एकमेकांच्या मदतीने शिकतात. आपले विचार स्वतःच्या शब्दांत सांगायला आणि लिहायला लागतात. शिकण्याची दैनंदिन व्यवहाराशी सांगड घातली जाते. मुलांपर्यंत संकल्पना सर्व अंगांनी पोहोचाव्यात म्हणून पाठ त्या प्रकारे तयार केले जातात आणि तसे घेतले जातात. त्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी, मुलाखती, गप्पा, प्रात्यक्षिके, प्रश्नोत्तरे, चर्चा या सर्व माध्यमांचा वापर केला जातो. शिकलेल्या गोष्टींचे उपयोजन किंवा वापर करता यावा यासाठी वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात. जसे : संमेलन, दुकानजत्रा, प्रदर्शन, भाषा-शिबिरे, खेळदिन. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा वापर मुलांच्या शिकण्यासाठी कसा करता येईल, हे पाहिले जाते. शाळेत मिळणाऱ्या संधींमुळे मुले लहान-लहान वाटणारी, पण महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करत आहेत. ही कौशल्ये मुलांना पुढील आयुष्यासाठी सक्षम करतात. या गोष्टी इतर शाळांमध्ये का करता येणार नाहीत? केवळ पुढे असणाऱ्या मुलांचे नाही, तर सर्व मुलांचे काम (लेखन, चित्रे, कार्यानुभवाच्या गोष्टी इ.) मांडले जाते. प्रत्येक मुलाला आपले विचार, भावना आणि मते मांडण्यासाठी संधी आणि प्रोत्साहन दिले जाते. दुसऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि नंतर त्यावर आपले मत मांडणे याची सवय मुलांना जाणीवपूर्वक लावली जाते. वर्गातील विविध विभागांचे प्रमुख मुलांतून निवडताना प्रमुखाच्या अंगी कोणते गुण असणे आवश्यक आहे, यावर वर्गात चर्चा होते आणि मगच प्रमुख निवडले जातात. हे प्रमुख दर महिन्याला बदलतात. त्यावेळी त्यांच्या कामाचा आढावा घेतला जातो. दिव्यांग मुलांची काळजी सर्व मिळून घेतात. सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती मुलांमध्ये हळूहळू तयार होताना दिसते. एकमेकांबद्दल प्रेम, मदत करण्याची वृत्ती, जबाबदारी घेण्याची तयारी मुलांमध्ये दिसून येते.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment