भूजल ही नैसर्गिक साधनसंपत्ती असून राज्यातील भूजलाची उपलब्धता मर्यादित आहे. शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या कारणांसाठी भूजलाचा वारेमाप व बेसुमार वापर होत असल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही वाढलेली भूजल पातळी फार काळ राहत नाही. राज्यात आजही एकूण सिंचित क्षेत्रापैकी ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक क्षेत्र भूजलावर आधारित आहे. म्हणजेच राज्याच्या कृषी-अर्थ व्यवस्थेचा भूजल हा कणा आहे. परंतु राज्यातील भूजल उपलब्धतेचा आढावा घेतला असता, अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्राची संख्या वाढत असल्याचे दिसून आले. माझ्या जमिनीखालील पाण्यावर माझीच मालकी या विचाराने पर्यावरणविषयक बाबींचा फारसा विचार न करता भूजलाचा उपसा करण्याची मानसिकता त्याला जबाबदार आहे. नद्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील सिंचन विहिरींच्या अतिउपशामुळे नद्यांची अधिक काळ वाहण्याची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. त्याचा पर्यावरण व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावरही विपरीत परिणाम झाला आहे. दर वर्षी पावसाद्वारे निर्माण होणाऱ्या भूजल उपलब्धतेचा विचार न करता निव्वळ अधिक-अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या स्पर्धेमुळे अतिखोल विंधण विहिरी मोठय़ा प्रमाणात घेतल्या जात असून त्याचा भूजल पातळीवर विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत चांगला पाऊस होऊनही भूजल भरणा म्हणजेच पुनर्भरण पुरेसे होत नसल्याने पाणी टंचाईसारख्या संकटाला आपल्याला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे अति रासायनिक खताचा वापर शेतात केला जात असल्याने रसायन हे भूगर्भात जात असते आणि अखेर ते भूगर्भातील पाण्यात मिसळते.
आज ग्रामीण भागात
पिण्यासाठी पाणी मुबलक नसल्याने अनेक जण भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहेत.
भूगर्भातील पाणी किती शुद्ध हे पाणी परीक्षण यावरून लक्षात येईल. नुकतेच केंदीय
भूजल विभागाने “केंद्रीय भूजल गुणवत्ता अहवाल २०२४” हा नुकताच सादर करण्यात
आला आणि या अहवालामध्ये अनेक धक्कादायक वास्तव पुढे आले. महाराष्ट्रातील वर्धा,
बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड आणि जळगाव या ७ जिल्ह्यातील भूजलात विषारी
पदार्थ मिसळलेले असल्याचे धक्कादायक वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झाले.
या ७ जिल्हात भूजलात नायट्रेट या विषारी रसायनेचे प्रमाण धोकादायक पात्रते पेक्षा
अधिक प्रमाणात आढळले असून ते आरोग्यासाठी अतिघातक आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि
भारतीय मानक ब्युरो यांनी पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटची मर्यादा ४५
मिलीग्राम प्रति लिटर निश्चित केली आहे मात्र देशातील ४४० जिल्ह्यांमध्ये
पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळले आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक
भूजल गुणवत्ता अहवाल २०२४ मध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार
अभ्यासलेल्या नमुन्यापैकी २०% नमुन्यामध्ये नायट्रेटची पातळी मर्यादा पेक्षा अधिक
असल्याचे आढळले. केंद्रीय भूजल विभाग आणि देशातील १५२५९ ठिकाणी परीक्षण केले असून
या परीक्षणामध्ये २५% विहिरीवर (बीआयएस १०५०० नुसार सर्वाधिक धोकादायक) सविस्तर
अभ्यास करण्यात आला. पुनर्भरणामुळे गुणवत्ता वर होणाऱ्या परिणामाची माहिती
घेण्यासाठी मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर ४१८२ ठिकाण भोजलाचे नमुने गोळा
करण्यात आले असे अहवालात नमूद केले आहे. भारताच्या भूजला मधील नायट्रेट
प्रदूषणाच्या स्थितीचा अंदाज अमेरिकन केमिकल सोसायटीच्या अहवालात वर्तवला आहे. या अंदाजानुसार
भारताच्या ३७% भूभाग आणि ६८ कोटी लोक नायट्रेटच्या धोक्याच्या कक्षेत आहेत. महाराष्ट्राचा
बाबतीत विचार केला असता ३५.७४% भूगर्भातील
पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे. भूगर्भात नायट्रेट कुठून येते तर ते सांड-पाण्याचे
गैरव्यवस्थापन, वॉटर ट्रीटमेंट प्लांटची योग्य देखभाल न करणे रासायनिक खतांचा
अतिवापर अशा विविध स्त्रोतांतून नायट्रेटचे प्रमाण हे भूगर्भात पाण्यात मिसळते.
भूजलात
नायट्रेटची वाढती पातळी अत्याधिक सिंचनाच्या परिणाम असू शकतो खतामधील नायट्रेट
जमिनीवर खोलवर जाऊन ते पाण्यात मिसळले जाते. पाण्यात नायट्रेट मिसळल्यामुळे नेमकी
धोकादायक परिस्थिती म्हणजे नायट्रेट पाणी किंवा अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करते.
ते तोंड आणि आतड्यांमध्ये असलेल्या जिवाणू मार्फत ऑक्सिडायझर असलेला नायट्रेटमध्ये
रूपांतर होते. नायट्रेट हिमोग्लोबिन मधील आर्यन फॉरेसला फॉरिक मध्ये बदलते. यामुळे
हिमोग्लोबिनचे रूपांतर मेटाहिमोग्लोबिन मध्ये होते. अशा परिस्थितीमध्ये
होमोग्लोबिन अर्थात रक्त आपली ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता गमावते. यामुळे विविध
आजार होतात पोटाचा कर्करोग, लहान मुलांमध्ये ब्लू बेबी सिड्रेम, जन्मदोष, जन्मजात
व्यंग, न्यूरल ट्यूब दोष असे आजार सद्या ग्रामणी भागातील लोकामध्ये दिसतात.
पिण्यायोग्य शुद्ध पाणी नसल्याने अतिगंभीर आजारांना आपण आमंत्रित करत आहे. या पाण्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रातील ७
जिल्ह्याचा यामध्ये समावेश यामध्ये आहे पण उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रातील
पाण्याचे परीक्षण केल्यास अनेक धक्कादायक बाब पुढे येईल.
भूजलातील पाणी
शुद्ध ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी गावातील पाणी बंद
बाटली मधील पाणी पिणे बंद करणे. शेती मध्ये कमी रसायनाचा वापर करून पिक नियोजन
करणे. दरवर्षी विहीर व बोअरवेल मधील पाणी परीक्षण करणे. ग्रामीण भागातील वाहून
जाणारे घरातील पाणी ग्रामपंचायत निधीच्या माध्यमातून एसटीपी प्रकल्प उभे करणे गरजेचे आहे. पिण्यासाठी वापरले जाणारे
पाणी हे गरम उकळून पिणे. आपण जुने ते सोन असे म्हणतो त्यामुळे मातीचे रांजण मध्ये
पाणी ठेवून पाणी पिणे गरजेचे आहे. भूजलाचा कमीत कमी वापर करून पाणी अडवून पाणी भूजलात
पुनर्भरण करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात वारेमाप पाणी उपसा करून बाटली बंद
व्यवसाय अनधिकृत पणे केला जात आहे. हे पाणी शुध्द म्हणून लोक विश्वासने पाणी
घेत असतात पण हे पाणी देखील पिण्यायोग्य
नाही. पिण्यायोग्य पाणी हे गावातील पारंपारिक पाण्याचे स्त्रोत पुनर्जीव करणे
गरजेचे आहे. सरकार काही करेल या आशेवर जनतेने राहून चलणार नाही. आपल आरोग्य ही
आपली सामुहिक जबाबदरी असल्याने आपल्या गावातील आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असल्यास
सर्वांनी मिळून काम केले तर निश्चत त्यांचा फायदा होईल.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
राज्य समन्वयक – सहज जलबोध अभियान, महाराष्ट्र
चलभाषा – ९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment