हवामान बदल व कृषी
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक जल विकास
अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की हवामान बदलामुळे पाण्याच्या उपलब्धतेवर
परिणाम होईल आणि यामुळे जागतिक अन्न उत्पादन क्षमतेत मूलभूत स्वरूप बदलू शकते.
अशाप्रकारे, आगामी काळात हवामानातील अगदी लहान
बदलदेखील अन्न असुरक्षिततेचे प्रमाण व वितरण प्रणाली वर प्रतिकूल परिणाम होवू शकतो
व अन्नधान्याच्या किंमतींमध्ये वाढ आणि ग्रामीण भागातील दारिद्र्य वाढवू शकतात.
नॅशनल प्रोसीडिंग ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ अमेरिका सन
२०४० पर्यंत स्थानिक हवामान पध्दतीत बदल झाल्यामुळे गहू, तांदूळ, सोयाबीन आणि मका या चार प्रमुख
पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. मे महिन्यात नॅशनल - प्रोसीडिंग ऑफ नॅशनल
अकॅडमी ऑफ सायन्सेस अंदाज दर्शवितात की अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील काही
भाग आफ्रिकेसह काही कोरडे पडतील तर उष्ण कटिबंधीय आणि उत्तर भागात गारा पडतील.
तांदळाच्या लागवडीसाठी वापरल्या जाणा १००टक्के, मक्याच्या ९० टक्के आणि
सोयाबीनच्या ८०टक्के जागेवर पुढील ४० वर्षांत पावसाच्या तीव्र वातावरणाचा सामना
करावा लागणार आहे. अशा इशारा हा अहवालात नमूद करण्यात आला आहे.
कृषी कार्याचे वाढते दर आणि दिवसेंदिवस वाढणारा धोका आणि हवामानातील बदलामुळे पुढील ५०-१००वर्षे खूप कृषी क्षेत्रासाठी खुप अवघड जात जातील हे हे सिद्ध करते. वाढते तापमान आणि दीर्घकाळात होणारे हवामान बदल हे आगामी काळात अन्न उत्पादनाच्या व अन्नसुरक्षेच्या चिंतेचे मुख्य कारण आव्हाने आहेत.जगातील प्रमुख कृषी पध्दती, मग ती भारतीय उपखंड किंवा उत्तर आफ्रिकेचा प्रदेश असो, सर्व हवामान बदलांमुळे होणार्या परिणामास असुरक्षित आहेत. जागतिक अन्न व्यवस्थेमध्ये वाढत्या कॅलरींच्या मागणीची पूर्तता होत असूनही, या अहवालात असे म्हटले आहे की ८२१ दशलक्ष लोक (जगातील ११टक्के लोक) कुपोषित असून आणि ही संख्या वेगाने वाढत आहे. भारतातील शेतीचा सर्वाधिक भाग मोसमी पावसावर अवलंबून आहे आणि हवामानातील बदलांमुळे शेतीचे नुकसान होत आहे. देशातील शेती उत्पादनामध्ये चढउतार होण्याचे मुख्य कारण अतिशय कमी किंवा अत्यधिक पाऊस हेच आहे. याखेरीज अतिआर्द्रता, असामान्य तापमान, रोग आणि किडींचा प्रकोप, अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, गारपीट ही कारणेही आहेतच. गेल्या काही वर्षांपासून हवामानाचे चक्र सर्वांना स्तिमित करण्याइतके बिघडले आहे
. अतिवृष्टी आणि अवर्षण या दोन्ही गोष्टी शेतीसाठी अभिशाप ठरल्या आहेत. गेल्या काही वर्षांमधील कमी पावसामुळे जे दुष्परिणाम शेतीवर झाले, ते अलीकडच्या काळात अधिक गडद झाले आहेत. जलवायू परिवर्तन आणि तापमानवाढीचा परिणाम म्हणून पूर आणि दुष्काळ वारंवार उद्भवत आहेत. त्यामुळे आगामी काळात शेतीचे नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे.
हवामान बदल वाढविणारी
प्रमुख आव्हाने
शेतीवरील अवलंबित्व
वाढले असले तरी, जिरायती
जमिनीचा आकार आणि गुणवत्तेमध्ये घट होत आहे, त्यामुळे जमिनीचा सरासरी आकार
१.०८ हेक्टर
इतका कमी होत आहे. लागवडीयोग्य जमिनीचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन आणि निष्काळजी
माती व्यवस्थापनामुळे जमिनीच्या ऱ्हासाचे प्रमाण वाढत आहे. यापेक्षा अधिक, CSE नुसार, भारतातील ३०% जमिनीची
वाळवंटीकरणाच्या दिशेने वाटचाल होत आहे.
२०१९ मध्ये, इंटरगव्हर्नमेंटल
पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ने असा अहवाल दिला की "जमिनीचा ऱ्हास हा हरितगृह
वायूंच्या उत्सर्जनामुळे आणि कार्बन शोषणाच्या घटलेल्या दरांमुळे हवामान बदलाचा
चालक आहे". हे एक दुष्टचक्र आहे हवामान बदलाचे
सामाजिक-आर्थिक परिणाम जमिनीच्या ऱ्हासाला गती देतात. हवामानातील बदलांमुळे
अप्रत्याशित हवामान आणि नैसर्गिक संकटेही आली आहेत - मग तो दुष्काळ असो, साथीचा रोग, चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर
असो. आर्द्रता, तापमान
आणि पर्जन्यमानात वाढलेली अनिश्चितता पारंपारिक कृषी दिनदर्शिकेत अतिशय हवामानाच्या
तीव्र स्फोटांसह व्यत्यय आणते.
सिंचनासाठी
पाण्याच्या वाढत्या वापरामुळे भारताच्या दरडोई पाण्याच्या उपलब्धतेत सतत घट झाली
आहे – गेल्या ५० वर्षांत
६०% ने, जमिनीच्या ऱ्हासाला
गती देणे.
शिवाय, तांदूळ आणि ऊस
यांसारख्या पाण्याच्या गहन पिकांच्या जगातील आघाडीच्या निर्यातदारांपैकी एक
असल्याने,
आम्ही
कृषी निर्यातीसह पाणी (आभासी पाणी) निर्यात करतो. या घटनेमुळे केवळ हवामान बदल
वाढत नाही तर परिणामी वाढीच्या चक्रांवर उत्पादकता कमी होते.
अंदाजानुसार, हवामान बदल दरवर्षी
जवळपास ४-९% पर्यंत
कृषी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम करते, ज्यामुळे जीडीपीमध्ये दरवर्षी
जवळपास १.५% नुकसान
परिणाम होतो. भारत कृषी उत्पादकतेच्या बाबतीत बहुतांश देशांच्या मागे आहे.
उदाहरणार्थ, मका, तांदूळ, भुईमूग आणि डाळींची
उत्पादकता ५४%, ४०%, ३१% आणि ३३% त्यांच्या संबंधित जागतिक
सरासरीपेक्षा कमी आहे. या सर्व घटकांनी खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आव्हान
दिले आहे - जगातील एकूण जमीन क्षेत्रापैकी केवळ २.४% भारताला जगभरातील १८%
लोकांना सहाय्य करावे लागेल. हवामान बदलाचा शेतीवर आणि १४५ दशलक्ष घरांवर होणारा
परिणाम कमी करण्याच्या रूपात आम्हाला एका कठीण कामाचा सामना करावा लागतो.
दुसरीकडे वेगाने वाढत जाणार्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची मागणी
वाढत जाणार आहे. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांचे अत्यधिक दोहन करावे लागेल. आताही
स्रोतांचा अतिवापर केल्यामुळे पर्यावरणाचे चक्र बिघडले आहे. पर्यावरणात होत
असलेल्या परिवर्तनाचा थेट परिणाम शेतीवर पडणार आहे. कारण तापमान आणि पावसात बदल
झाल्यामुळे मातीची उत्पादकता कमी होत जाते आणि किड रोगांचा प्रसार होण्याचा धोका
वाढतो. किडींचा फैलाव अधिक वेगाने झाल्यामुळेही उत्पादन घटते. पर्यावरणातील अनेक
बदल शेतीवर थेट परिणाम करणारे आहेत. सरासरी तापमानातील वाढ हा पहिला बदल होय.
गेल्या काही दशकांत तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अनेक वनस्पतींच्या प्रजातींना
वाढीसाठी विशिष्ट तापमान असणे आवश्यक असते. वातावरणाचे तापमान वाढल्यामुळे
त्यांच्या उत्पादकतेत प्रचंड घट होते. पाऊस
कमी पडल्यामुळे मातीतील आर्द्रता कमी होते. जमिनीच्या तापमानात सतत चढउतार होत
राहिल्यास अपक्षयाची प्रक्रिया सुरू होता. तापमानवाढीमुळे दुष्काळाची परिस्थिती
वारंवार उद्भवते आणि हळूहळू वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू होते.पावसाचे प्रमाण आणि
स्वरुपात झालेला बदल हाही पिकांवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. पाऊस कमी
पडल्यास जमिनीतील ओलावा नष्ट होत जातो तर एकाच वेळी अधिक पाऊस पडल्यास मातीची धूप
होऊन जमीन नापीक बनू लागते. पावसाचा एकंदरच शेतीवर प्रचंड परिणाम होतो. शेतातील
सर्वच्या सर्व रोपे जगण्यासाठी विशिष्ट प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. पाऊस तर
शेतीसाठी महत्त्वाचा आहेच, पण तो वेळेवर आणि योग्य
प्रमाणात पडणेही आवश्यक आहे. वातावरणातील बदलांमुळेही शेती अडचणीत येत आहे.
वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे वनस्पतींवर प्रतिकूल परिणाम
होतो. वातावरणातील हे परिवर्तन काही ठिकाणांसाठी चांगले तर काही ठिकाणी अत्यंत
हानिकारक ठरते. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे वातावरणातील ओझोनच्या थरावर
अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे. या वायूंच्या उत्सर्जनामुळे ओझोनचा थर पातळ होत
चालला आहे.
हा थर
एक टक्क्याने जरी घटला तरी अतिनील किरणांच्या प्रमाणात दोन टक्क्यांची वाढ होते.
त्याच प्रमाणात मानवी जीवन आणि अन्नधान्याच्या उत्पादनावरही परिणाम होत जातो.
त्यामुळे या वायूंचे उत्सर्जन कमी करून ओझोनचा थर वाचवणे अत्यावश्यक बनले आहे.
तापमानवाढ
आणि जलवायू परिवर्तनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकर्यांनी काळजी घेणे आवश्यक
आहे. शेतात जलव्यवस्थापन आणि सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. जमिनीची
धूप रोखण्याबरोबरच पावसाचे पाणी उपयोगात आणण्यासाठी जलसंवर्धन हा दुहेरी उपयोगाचा
मार्ग ठरतो. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमातून आपण पावसाचे पाणी अडवून
शेतीसाठी उपयोगात आणू शकतो.
शिवाय
त्यामुळे मातीची धूपही थांबते. त्याचवेळी साठलेले पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील
पाणीपातळी वाढण्यास मदत होते. त्याचा पुन्हा शेतीसाठी उपयोग होतो. सेंद्रीय आणि
नैसर्गिक शेती करणे आता काळाची गरज बनली आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके
जमिनीच्या उत्पादकतेत घट करणारी ठरली आहेत.
तसेच
त्यामधील विषारी घटक अन्नसाखळीत समाविष्ट होऊन अन्नावाटे पोटात जाऊन आरोग्याचेही
गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचप्रमाणे रासायनिक शेतीतून हरितगृह वायूंचे
उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळे निसर्गाचे चक्र आणखी बिघडते.
त्यामुळे आपल्याला जैविक आणि संमिश्र शेतीचा अवलंब यापुढील काळात करावा लागणार
आहे. एकल शेतीऐवजी समग्र शेतीतंत्राचा वापर करण्यामुळे जोखीम कमी होते. समग्र
शेतीत अनेक पिकांचे उत्पादन एकाच वेळी घेतले जाते. नैसर्गिक प्रकोपामुळे एखादे पीक
हातचे गेले तरी इतर पिकांमधून शेतकर्याला उत्पन्न मिळू शकते. यासाठी शेतकरी
विरोधी नरभक्षी कायदे रद्द करावे लागतील. कमाल जमीन धारणा कायद्यामुळे जमीन धारण
क्षमता कमी झाली.
जलवायू
परिवर्तनाचे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता पीक उत्पादनात नवनवीन पद्धतींचा अवलंब
यापुढे करावा लागणार आहे. पेरणीच्या वेळेतही यापुढे बदल करावा लागेल, असे बिघडलेल्या पर्जन्यचक्रामधून
लक्षात येते. शेतकर्याने आपले पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्राच्या समन्वयातून
संकटावर मात करायला शिकले पाहिजे. संमिश्र शेती आणि आंतरपिके घेऊन जलवायू
परिवर्तनामुळे निर्माण झालेल्या धोक्यापासून काही प्रमाणात बचाव करता येऊ शकतो.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment