मनात आलेले ते लिहित राहावे. आपले विचार स्वता पुरते मर्यादित न ठेवता इतरांन पर्यत पोहचाण्यासाठी नुसते विचार करून उपयोग नाही तर ते लिहिले देखील पाहिजे. समाजकार्य क्षेत्रात काम करतांना बऱ्याच गोष्टी लक्षात येतात आणि ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आपण नक्की वाचावे आणि आपले मत मांडावी.
Sunday, October 17, 2021
स्त्री स्वतंत्र्याचा पुष्पगंध दरवळू या...!
Tuesday, September 14, 2021
तिच्या पंखाना बळ देऊया...
देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन
चालू बंद ची चर्चा सतत सुरु असतात. लॉकडाऊन परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये बाल विवाहचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव माहिती
अधिकार अंतर्गत माहिती मध्ये समोर आले आहे. लोकांमध्ये जागृती आणि कायद्याचे
अज्ञान याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र मध्ये बाल विवाह रोखण्यात महिला व बाल विकास विभागाला यश
आले आहे. पण काही ठिकाणी मोठ्या प्रमाणत बाल विवाह झाले आहेत.
नुकताच युनाटेड नेशन्स पॉप्यूलेशन फंड (युएनएफपीए) स्टेट वल्ड पॉप्यूलेशन संस्थेचा २०२० चा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात जगभरातील बाल विवाह विषयक सद्यस्थिती नोंद घेण्यात आली आहे. असे असले तरी हिंदुस्थानात ४ पैकी १ मुलीचा विवाह हा १८ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच केला जातो. तब्बल २१ टक्के मुलींचे विवाह हे १८ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी लावले जातात. महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड आंध्रप्रदेश व बिहार या ५ राज्यात सर्वेक्षण करण्यात आले. तरी बाल विवाहाची टक्केवारी २६.८ असे ही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हटला जातो परंतु बाल विवाह बाबत महाराष्ट्र मागे नाही. बाल विवाह होऊ नयेत म्हणून सरकार प्रयत्न करत असते. मात्र अद्याप त्याला पूर्णपणे रोखण्यात यश आले नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू झाली. या दरम्यान वेगवेगळ्या पद्धतीने विवाह झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, त्यातच बाल विवाह ही होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 21 व्या शतकात आजही समाजात दुर्लब घटक म्हणून महिला व मुलींना दुय्यम स्थान दिले जात आहे. कोविड १९ च्या काळात महाराष्ट्र मध्ये विविध जिल्ह्यात बाल विवाह थांबवले गेले. त्यात प्रमुख्याने अमरावती १२, मुंबई ७, अकोला ४, बुलढाणा २३, ठाणे ६, वर्धा १६, चंद्रपूर ३, भंडारा ५, बीड १९, जालना २७, औरंगाबाद ३६, परभणी ११, सातारा ५, यवतमाळ २१, हिंगोली १६, नागपूर ११, नंदुरबार ३, पालघर ९, नांदेड २९, अहमदनगर २४ , लातूर २५, धुळे १४, जळगाव ११, नाशिक १८, सोलापूर ६८, उस्मानाबाद ३३, कोल्हापूर २२, सांगली २२ व वाशिम १५ यादी जिल्हातील एकूण ५१९ बाल विवाह सन २०२० ते २१ मध्ये थांबवले गेले तर प्रत्यक्ष बाल विवाह झालेलं काही जिल्हे पालघर ५, बुलढाणा ३८ व अन्य जिल्ह्यात बाल विवाह झाले आहे. वरील आकडेवारी ही महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र यांच्या कडून माहिती अधिकारात मिळाली आहे. हे घटना आजू बाजूला घडत असतांना समाजातील भिषण विदारक स्थिती आपल्याला बघण्यास मिळते.
बाल विवाह घटना शहरी भागापेक्षा
ग्रामीण भागात अधिक घडत असतात. ग्रामीण भागातील जीवन हे शेती क्षेत्राशी निगडीत
आहे. आज शेती क्षेत्रा मध्ये बंदिस्त व्यवस्था असल्याने गुंतवणूक येत नाही.
गुंतवणूक येत नसल्याने नागरिकांची परिस्थिती बिकट झाली. आज जमीन धारण क्षमता कमी
झाले. कमाल जमीन धारण कायद्यामुळे शेत जमिनीवर मर्यादा आहे. ग्रामीण भागात आज
सरासरी २ एकर जमिनी शेतकरी बांधवाकडे आहे. शेती मध्ये पैसा नाही म्हणून शहराकडे
धाव घेतो. मुलगी म्हणजे परक्याचे धन या विचाराने मुलांची लग्न अगदी कवळ्या वयात
लावून दिले जात आहे. आज बालविवाह बेकायदा असला तरी अनेक
पालक आपल्या मुला-मुलींचे बालविवाह करू पाहात आहेत. या संदर्भातल्या कारवाईचे
वृत्त आपण अनेकदा वर्तमानपत्रांमधून वाचतच असतो. पण कारवाई होत असूनही बालविवाह
मात्र थांबलेले नाहीत, ही शोकांतिका आहे. अशा विवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य,
खेळण्याचं वय हिरावून घेतलं जातं. बालविवाहाचे गांभीर्य लक्षात घेऊन
राजा राममोहन रॉय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, बेहरामजी मलबारी, लाला गिरधारीलाल यांनी
बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनमत जागे केले. त्यानंतर कायद्यांमध्ये
सुधारणा होत होत बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ च्या कलम ९ व १० नुसार बालविवाह
लावणाऱ्याला दोन वर्षांपर्यंत कठोर कैद व १ लाख रुपये दंड सुनिश्चित केला गेला
आहे. हे असतांना देखील बाल विवाह घटना घडतात. अतिशय लहान वयात लादलेल्या
गरोदरपणामुळे व प्रसूतीमुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते. तसेच गर्भपात, कमी वजनाचे अर्भक, अकाली प्रसूती, अर्भकमृत्यू व उपजत मृत्यूची शक्यता वाढते. मातामृत्यूचे प्रमाण वाढते.
अपरिपक्व वयातल्या विवाहात वधू-वरांची निवड माय-बाप करतात. मुला-मुलींच्या
पसंती-नापसंतीचा विचार केला जात नाही. त्यामुळे रूप, बुद्धिमत्ता,
पात्रता, वय इत्यादीतील विषमतेमुळे हे विवाह
विजोड ठरतात. अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता
आणि परंपरा या कारणांनी बालविवाह घडून येतात. ग्रामीण भागात विवाह असला की तलाठी,
ग्रामसेवक, पोलिस पाटील व शिक्षकांना निमंत्रण
दिले जाते. या लोकांनी होणार असलेल्या विवाहाबाबत अर्थात मुला-मुलींच्या वयाबाबत
माहिती घेऊन कमी वयात होणारे विवाह थांबवायला हवेत.
बालविवाह हा कायद्याने गुन्हा ठरतो. १९२९ मध्ये हा कायदा केला गेला. त्यात सुधारणा होऊन देशात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ करण्यात आला व १ नोव्हेंबर २००७ पासून तो अमलात आला. वधू- वर सज्ञान म्हणजेच मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ असेल, तर विवाह ग्राह्य मानला जातो. याचा अर्थ वयात येणे म्हणजे मुलगी गर्भधारणेस योग्य व मुलगा प्रजोत्पादनक्षम असून ते शारीरिक व मानसिक परिपक्वता प्राप्त होतात, असा आहे. बालविवाह झाल्यास मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो, परिणामी त्यांना गर्भधारणा झाली, तर बाळाच्या पोषणासाठी शरीर सक्षम नसते. त्याचे परिणाम तिच्या आणि विशेषत: बाळाच्या आरोग्यावर होतो. बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी समाजसेवी संस्था, ग्रामपंचायत, सरकारी कार्यालये, निमशासकीय संस्था इत्यादींना बालविवाह अधिकार आहेत. बालविवाहाचे अनेक दुष्परिणाम असल्याने समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडण्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास शिक्षा होऊ होते. १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास तो गुन्हेगार ठरून तो शिक्षेस पात्र ठरतो. या कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे दखलपात्र व अजामिनपात्र आहेत. अधिक माहितीसाठी वकिलाचा सल्ला घ्यावावा.
परंतु हा इतका कळीचा मुद्दा असूनसुद्धा
बालविवाह हा विषय जणू मागच्या शतकात होता आणि जणू आता ती समस्या उरली नाही, अशीच अनेकांची समजूत असते. त्यामुळे या विषयावर उपाययोजना तर सोडाच,
पण फारशी चर्चाही होत नाही. किमान राजस्थानात हे प्रमाण जास्त
असल्याने झालीच चर्चा तर राजस्थानची होते. महाराष्ट्र हे ‘पुरोगामी’
राज्य असल्याने जणू इथे बालविवाह नसतीलच, असाच
सार्वत्रिक समज आहे. या समजामुळे महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण किती
बालविवाहाच्या प्रश्नाची दाहकता किती आहे याची चर्चा कोणीच करत नाही. यामुळे
महाराष्ट्रातील बालविवाहाचा प्रश्न जणू संपला आहे, असे सर्वसाधारण
समजले जाते. बालविवाह थांबवून लग्नाचे वय लांबविणे यासाठी प्रयत्न करायला हवेत. १८
वर्षांची मुलगी फारतर १२ वी पर्यंत शिकते. त्यामुळे पदवीधर झाल्याशिवाय म्हणजे २१
वयाच्या पुढेच मुलींच्या विवाहाची मर्यादा न्यायला हवी. बालविवाह व शिक्षणाचा अन्योन्यसंबंध आहे. असे स्पष्टपणे आढळते की, मुलीच्या शिक्षणातील गळतीचा परिणाम हा अपरिहार्यपणे थेट बालविवाहात होताना
दिसतो. मुलगी जर शिकत राहिली तर बालविवाहाची शक्यता काहीशी कमी होते, असाच निष्कर्ष अनेक पाहण्यांमधून दिसून येतो. त्यामुळे बाल विवाह
थांबविण्यासाठी फक्त कायदा उपयोगी नाही तर अनेक उपाय योजना करणे गरजेचे आहे.
त्यातील महत्वाचा उपाय म्हणजे मुलीच्या विवाहाचे वय वाढवणे, मुलींच्या शिक्षणाकडे
लक्ष देणे, शालेय शिक्षणा पासून मुलीना व्यवसाय शिक्षणाची गोडी लावणे, बाल विवाह
प्रतिबंध कायदाचा प्रचार प्रसार प्रशिक्षण शिबीर घेणे, चाईल्ड लाईन संपर्क कक्ष
प्रत्येक ग्रामीण भागात नेमणे, बाल विवाह थांबवणाऱ्या व्यक्तीस सन्मान करणे इ.
उपया योजना करणे गरजेचे वाटते.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९
Saturday, August 28, 2021
‘मरण माझे मरून गेले, मज केले अमर’
Wednesday, March 10, 2021
भय येथले संपत नाही...
जगात ज्या महामारीने मागील वर्षी सर्व ठप्प पडले होते.
कोविड १९ हा रोग पूर्णपणे संपला असे म्हणता येणार नाही. आज जवळपास वर्ष होईल
पुन्हा सरकारने डोके वर काढले आहे. कोविड १९ आजरावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. हे
आज आपल्याला बघण्यास मिळत आहे. विलीगिकरण
करून घरी देखील आजारावर नियंत्रण मिळवता येतो. देशात लसीकरण सुरु केले आहे.
लसीकरणाचा वेग वाढवणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात सध्या पुन्हा रुग्ण संख्या वाढू
लागली आहे परंतु तो एकूण टक्केवारी मध्ये बघितला तर फार कमी दिसतात. सरकारने आपले
प्राधन्य ठरवत असतांना पुन्हा नागरिकांना घर बंदिस्त करण्याचे डाव खेळू नये.
करोनाचे रुग्ण वाढत आहे हे जरी खरे असले तरी सरकारने लसीकरण करण्याचा वेग देखील
वाढवला पाहिजे होता. शासन आणि प्रशासन हे नागरिकांना जुलमी अत्याचार सारखे वागणूक
देत आहे. आज पोलिस प्रशासन नागरिकांना संरक्षण देण्याऐवजी चौका चौकात हफ्ता वसुली
सारखे अडवणूक करून पावती करत असतात. पोलिस प्रशासनाचे नेमक्या जबाबदारी आणि
कर्तव्याची जाणीव अधिकारी यांना नसेल का ? शासन मनाला वाटेल तो निर्णय घेऊन सामन्य
जनतेची आर्थिक अडवणूक करत आहे. आज कुठे तरी गाडी रुळावर येत असतांना नागरिकांना
पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण करून करोनाची दहशत निर्माण शासन पुरस्कृत करोना
तयार करत आहे.
साथरोग नियंत्रण कायद्याच उपयोग
आपल्याला
माहिती असेल काही वर्षापूर्वी एका भयावह काळाची सुरुवात 'ब्यूबॉनिक प्लेग'च्या
साथीपासून पासून होते. सप्टेंबर १८९६ मध्ये मुंबईत प्लेगचे रुग्ण सापडल्याचं निदान
झालं. हाँगकाँगमधून तो इथे या बंदरात आल्याचं म्हटलं गेलं. सुरुवातीला तत्कालिन
ब्रिटिश सरकारनं त्याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही, पण
थोड्याच काळात प्लेगनं त्याचे हातपाय पसरायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या,
म्हणजेच तत्कालिन मुंबई इलाख्याच्या, इतर
भागातही तो पसरु लागला. स्वच्छता, जंतूनाशक फवारणी असं काम
महानगरांच्या प्रशासनानं सुरु केलं, पण थोडक्याच काळात हे
प्रयत्न पुरेसे नाहीत हे स्पष्ट झालं. थोडक्याच कालावधीत प्लेगची साथ पुण्यात
पसरली आणि मृतांची संख्या, बाधितांची संख्या झपाट्यानं
वाढायला लागली. जानेवारी १८९७ पर्यंत पुण्यात प्लेगचा कहर सुरु झाला होता. रोजचा मृतांचा
आकडा तोपर्यंत शेकड्यापर्यंत पोहोचू लागला. सरकारला हे कळून चुकलं की नवा कायदा
हवा आणि त्याची अंमलबजावणीही हवी. या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारनं नवा कायदा
आणला, जो आजही अस्तित्वात आहे आणि कोरोनाशी लढण्यासाठी २०२० मध्येही
वापरला जातोय, तो म्हणजे 'एपिडेमिक
डिसिजेस अॅक्ट' किंवा 'साथरोग नियंत्रण
कायदा १८९७. या कायद्यानं त्याची सरकारी अधिका-यांना असे
अधिकार दिले जे यापूर्वी कधीही नव्हते. कोणत्याही जहाजाची वा वाहनाची तपासणी करणे,
संशयित रोगी व्यक्तीला ताब्यात घेणे, विलगीकरणात
पाठवणे, कोणत्याही इमारतीची, घरांची
झडती घेणे, निर्जंतुकीकरण करणे, इमारती-घरं
मोकळी करवणे किंवा संसर्गित इमारत पाडणे इथपर्यंत हे अधिकार होते. जे आपण आज देखील
कोविड १९ या रोगामुळे एकूण समाजाला काय परिस्थितीतीला सामोरे जावे लागत आहे हे आपण
सर्व अनुभव घेत असतो. आज पुन्हा नव्याने २०२१ मध्ये ह्या कायद्याचा उपयोग केला जात
आहे. मागील वर्ष संपूर्ण पणे बंधिवासात नागरिकांनी जीवन रडत पडत काढले. सामान्य
नागरिकांची आर्थिक घडी पूर्णपणे कोलमंडली त्यात कुठे तरी गाडी रुळावर येत असतांना
पुन्हा नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरवण्याचे कार्य कोणाचा आशीर्वादाने
सुरु आहे. बरं आता रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाय आणि मार्ग उपलब्ध
आहेत. समान्य नागरिकांचे उदरनिर्वाह करण्याचे व्यवसाय यावर कुऱ्हाड सरकारने मारून
ठेवली. ग्रामीण भागात या परिस्थितीमुळे वाईट प्रवृत्ती निर्माण होऊ लागले आहेत
शासन जर असेच करत राहणार समाज व्यवस्था बिघडवण्यास जबाबदार येथील व्यवस्था
कारणीभूत दिसते. आज तसे न करता फक्त नागरिकांना फक्त त्रास होईल असे निर्णय आणि
वागणूक दिली जात असेल तर कुठे तर शासन व्यवस्था कोरोना नियंत्रणात आणण्यास कमी पडत
आहे.
जनतेवर पाळत ठेवणे सरकारचे काम का ?
कोरोना
या रोगाची साथ थांबवण्यासाठी,
राज्यातील सर्व जनतेला काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. तसे
करायचे तर दोन मुख्य मार्ग आहेत. नागरिकांवर लक्ष ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांना
शिक्षा देणे हा पर्याय असू शकत नाही. मागील एक वर्ष कोरोना रोगाचा प्रचार प्रसार
करण्यास शासन कमी पडले का? आज मानवी इतिहासामध्ये पहिल्यांदाच तंत्रज्ञानामुळे प्रत्येक
वेळी सर्वांवर पाळत ठेवले जाते. काम करत असताना आपल्याला ज्या समस्यांचा सामना
करावा लागतो, त्यापैकी एक म्हणजे आपल्यापैकी कोणालाही हे माहीत नाही की, आपल्यावर कशा प्रकारे
नजर ठेवली जात आहे आणि येणाऱ्या काळात आपल्यापुढे कोणते ताट वाढून ठेवलेले आहे.
लोकांवर पाळत ठेवण्याचे हे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे आणि दहा
वर्षांपूर्वीच्या ज्या विज्ञान-कल्पित गोष्टी होत्या, त्या आज जुन्या
बातम्या बनल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये
बेजबाबदार राजकारण्यांनी विज्ञानावर, सार्वजनिक
प्राधिकरणांवर आणि माध्यमांवर विश्वास ठेवणे जाणीवपूर्वक कमी केले आहे. योग्य
गोष्टी करण्यासाठी आपण फक्त जनतेवर विश्वास ठेवू शकत नाही,
असा युक्तिवाद करत याच बेजबाबदार
राजकारण्यांना यानिमित्ताने आपल्या एकाधिकारशाहीचा
मार्ग प्रशस्त करण्याचा मोह होऊ शकेल. आज सगळ्यांचा यंत्रणा जनतेला फक्त त्रास
देण्यासाठी काम करत आहेत का? असे कुठे परिस्थिती बघितल्या नंतर दिसते. प्रत्येक
कामातून जनतेला कधी समाधान मिळाले असे फार कमी प्रमाणात अनुभवयाला येते. आज सामान्यत:
वर्षानुवर्षे नष्ट झालेला विश्वास एका रात्रीत पुन्हा कमावता येत नाही. परंतु ही
सामान्य वेळ नाही. संकटाच्या एखाद्या क्षणी आपली मनेसुद्धा पटकन बदलू शकतात. आपण
अनेक वर्षांपासून आपल्या भावंडांशी कटु वाद घालत असतो,
परंतु जेव्हा काही आपत्कालीन परिस्थिती
उद्भवते, तेव्हा
आपल्याला अचानक भावंडांबद्दलचा लपलेला विश्वास आणि प्रेमळपणा पुन्हा गवसतो आणि आपण
एकमेकांना मदत करण्यासाठी धावतो. जनतेवर पाळत ठेवण्याची व्यवस्था तयार करण्याऐवजी
विज्ञानावर विश्वास ठेवून सार्वजनिक अधिकारी व माध्यमां यांनी लोकांना बंधनात
अडकवून न ठेवण्या ऐवजी दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्यास भर देणे
गरजेचे.
आदर्श समाज
व्यवस्था कमी पडते ?
आज सार्वत्रिक विवेकाचे आदर्श
तत्त्व,
भौतिक
जगात व्यक्ती व्यक्तींमधील नैतिक व्यवहार, नागरी मूल्य, सार्वत्रिक हित यांची चिकित्सा करत असते. समाजाची
नैतिक मूल्याधिष्ठित व्यवहाराची चिकित्सा करणारी ही एक मोजपट्टी आहे, असे मानले जाते. कोणताही समाज त्या
त्या सामाजिक व्यवस्थेची काही मूलभूत श्रद्धा, मूल्ये इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर विकसित करत
असतो. विविध सामाजिक स्तर ही श्रद्धा, मूल्ये व्यापक पातळीवर आपल्याला सोयीची जाईल अशा
पद्धतीने उभी करून,
त्या
दृष्टीने विवेकशील समाजभान जनमानसात स्वयंसिद्ध करण्यास मदत करतात. कधी कधी सदोष
मानवी वर्तन ही श्रद्धा, मूल्ये
प्रश्नांकित करतात. आज मानवी व्यवहारांतील 'न्याय्य तत्त्वांच्या' निष्ठेबद्दल संशयग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
आपण समाज म्हणून नागरिकांना बंधिवसात ठेवून किती दिवस कोरोना ची भिती पसरवत असणार
आहे. आपली भारतीय समाजव्यवस्था सांस्कृतिकदृष्ट्या एकजिनसी नाही. अनेक धार्मिक, वांशिक व भाषिक गटांचे अस्तित्व
येथे आहे. त्याचबरोबर, आर्थिक
क्षमतेच्या निकषावरही मोठ्या प्रमाणात विषमता सापडते. अशा बहुलवादी समाजरचना
असलेल्या देशात जेव्हा मोठ्या प्रमाणात करोनाची लागण होते, तेव्हा त्या समाजाचे टीकात्मक
परीक्षण 'सार्वजनिक विवेकाच्या' माध्यमातून होणे आवश्यक बनते.
सार्वजनिक विवेकाचे तत्त्व सार्वत्रिक श्रद्धा, मूल्ये व नैतिक जीवनदृष्टीबरोबर, इतरांच्या नागरी हक्कांप्रती आदर
भावना व्यक्त करत असते. प्रस्थापित व्यवस्थेतील अपूर्णता सांगताना फक्त दोष
दिग्दर्शन न करता,
नागरी
आयुष्यात बंधुभाव कसा उतरेल, यावर
भर देत असते. कोविड १९ च्या नावाने समान्य नागरिकांना वेगळा
न्याय आणि करोडपती, आमदार, खासदर व मंत्री यांना वेगळा न्याय, कायदा सगळ्यांना
समान हे फक्त कागदावर असते. गरीब दुबळ्या समाजातील नागरिकांना फक्त कायद्याची भीती
दाखवून फक्त लुटमार करणारी येथील व्यवस्था सत्ताधारीच्या कुबडायवर काम करते. किमान या
राज्यातील अधिकारी यांनी तरी आपल्या उच्च संसकृत शिक्षणाचा आदर करून स्वताच्या
सदसद्विवेक जागेवरून ठेवून निर्णय घ्यावे, सामन्य नागरिकांच्या खिश्यावर दरोडा
टाकणे थांबवले पाहिजे अन्न्यथा समाजातील बघडणारी परिस्थितीला जबाबदार आपण असाल.
कदाचित म्हणूनच म्हणावे वाटते २१ व्या शतकात पुन्हा नव्याने वाटते सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९
Sunday, January 17, 2021
समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी...