Thursday, July 2, 2020

गरीबीची सिमारेषा काय ?


गरीबीची सिमारेषा काय ?

महाराष्ट्र राज्यावर गेली दोन वर्षापासून अनेक संकट येत आहे. महाराष्ट्र मध्ये मागील वर्षी सांगली आणि कोल्हापूर येथे महापुरामुळे मोठे संकट आले. या संकटात सांगली आणि कोल्हापूर येथील नागरिकांनी हे संकट अनुभवले मरण दारात असतांना देखील खंबीरपणे लढा दिला. ह्या महापुरात लोकांच्या मदतीला मोठ्या प्रमाणात शहरातून माणुसकीचे दर्शन घडले. मी सांगली येथे महापूर आल्या नंतर माझ्या सहकार्य सोबत मदत कार्य करण्यासाठी व लोकांना वाचवण्यासाठी प्रत्यक्ष कार्य करत होतो. महापुराच्या वेळी लोकांना संकट मोठ्या प्रमाणात येईल असे वाटले नव्हते. लोकांचे जीव वाचावे म्हणून सगळेजण मोठ्या प्रमाणत जे साधन मिळेल त्याचा उपयोग करून लोकांचे जीवन वाचू लागली होते. या परिस्थिती मध्ये लोकांना जेवणाची सोय नव्हती. या संकटात सांगली व कोल्हापूर येथील अनेक सामजिक संस्था व राजकीय व्यक्तींनी जेवणाची सोय केली. मिडीयावर याबाबत मोठ्या प्रमाणत वृत्ताकन सुरु होते. यामुळे शहारत राहणारे लोकं अति भावनाशील होते मदत कार्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धान्य व इतर साहित्य पाठवून देऊ लागले. मी लोकांच्या घरातील गाळ काढणे, घरातील साफ – सफाई तसेच लोकांना पाण्यातून सुरक्षित बाहेर काढणे हे कार्य करत होतो. संकटात मदत कार्य केले पाहिजे परंतु भावनेच्या आहारी जावून कार्य करणे उचित नाही असे मला वाटू लागले. संकटात नेमकं काय प्रथम गरज आहे हे बघणे गरजेचे आहे. ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी जर मदत म्हणून पाठवली त्या गोष्टीचा त्यावेळी खरच उपयोग झाला का हा प्रश्न मला सतत जाणवत होता. त्या परिस्थिती मध्ये लोकांच्या घरातील साफ सफाई करण्यासाठी साहित्याची गरज मोठ्या प्रमाणत होती परंतु लोकांनी मदत मोठ्या प्रमाणात ती म्हणजे सकोरडे धान्य मग आलेलं सर्व सामान हा आजूबाजूला शाळेत ठेऊन द्यावी लागली. त्यात सरकारने मदत जाहीर केलेली वेगळी होती. संकटात लोकांना मदत करतांना लाखो हात पुढे येतात परंतु मदत घेणाऱ्या लोकांना मदत ही मिळेल याची खात्री नसावी का? संकटात सगळ्यांना मदत मिळायला पाहिजे असे काही असते का? हा मला प्रश्न पडत होता. यासाठी कारण संकट जरी होते तरी त्या नुकसान सर्वाचे झाले होते असे नाही. ज्यांची खरच मातीची घर होती त्याचं काही राहिले नाही परंतु सिमेंटची घर आहे. बागायती शेती आहे, घरातील व्यक्ती सरकारी नोकरीला आहे. यांनी मदत कार्य घेण्यासाठी यावे म्हणजे काय समजावे. यांना मदतीची गरज नाही असे मुळीच नाही ते संकट महापुराचे होते त्यात घरातील नुकसान झाले परंतु त्याची भरपाई शासनाना कडून दिली जाते. मी या प्रसंगात सर्व बघत होतो मदत कार्य करतांना लोकांची झुंबड आणि गर्दी बघून म्हणावे वाटते की गरीबीची सीमारेषा काय असली पाहिजे. महापुरात गरीब आणि श्रीमंती हा विषय नाही परंतु नुकसान झाले नसतांना देखील त्याचा लाभ घेणारे अनेकजण होते. जिथे पाणी आले नाही तिथे देखील धान्य जाऊन पोहचले. शहरातून लोकांनी गरज नसतांना मोठ्या प्रमाणात धान्य पाठवली आणि आजूबाजूला गावातील लोकांनी काही धान्य हे जिथे नुकसान नाही तिथे गाड्या जाऊन पोहचले. मी सर्व परिस्थिती जवळून बघितली अनुभवली होती. आज भारत स्वातंत्र्य होऊन ७० वर्ष झाली तरी देखील गरिबांच्या घरातील परिस्थिती तीच का हा प्रश्न पडतो. महाराष्ट्र मध्ये नाही तर संपूर्ण जगावर कोरोना सारख्या विषाणू मुळे भीषण संकट आले आहे. या संकटात लोकांना मदत कार्य करणे सर्वांचे काम आहे. ही मदत करत असतांना गरजूवंत यांच्या पर्यत मदत पोहचणे गरजेचे वाटते. ज्यांची हातावर पोट आहे. ज्यांच्याकडे कुठलेही आर्थिक तरतूद घरात नाही. भटके – अदिवासी लोक जे पालावर जगत असतात त्यांना खर गरजेचे आहे. 

शहरात अनेक झोपडपट्टी आहेत येथील नागरिक गरीब आहे का? असा प्रश्न पडतो कारण ७० वर्ष होऊन गेली तरी आजून ही लोक झोपडपट्टी मध्ये कसे अडकून पडले. प्रत्येक गोष्टीला सरकारला जबाबदार नाही ठरवता येत एक पिढी गरिबीत वाढली असेल याचा अर्थ असा नाही की पुढच्या दोन पिढीने देखील आपले जीवन या झोपडपट्टी मध्ये जीवन जगले पाहिजे. आज कोरोन संकटात झोपडपट्टी मध्ये पत्र्यात राहणाऱ्या लोकांना मदत कार्य करायला गेले की सिमेंटच्या घरात राहणाऱ्या नागरिकाला मदत पाहिजे असते ही मानसिकता कश्यामुळे वाढली असेल. आज अनेक गोष्टी सरकार कडून पाहिजे म्हणून लढा देत असतात परंतु स्वताच्या कार्यक्षमतेने स्वताची प्रगती करण्यास अडथळा ७० वर्षात कश्यामुळे निर्माण झाला ह्यावर कोणी का विचार करत नसेल. झोपडपट्टी सुधार योजना अंतर्गत लोकांचे पुनर्वसन केल्या नंतर देखील लोकं त्या घरात जात नसतील तर या योजना कश्याला राबविल्या पाहिजे. लोकांना असे तर वाटत नसेल बघा झोपडपट्टी मध्ये जीवन जगले म्हणजे सरकार कडून, सामजिक संस्था आणि सामान्य जनतेकडून मोफत मदत संकट काळात असेल किंवा उत्तम जीवन जगण्यासाठी मिळत असते. संकट काळात मदत केली पाहिजे परंतु खरा लाभार्थी दूर राहून मोफत मदत मिळते म्हणून झुंबड करणाऱ्या लोकांची मानसिकता झोपडपट्टी मध्ये कश्यामुळे वाढली असेल हा प्रश्न पडतो.

            आज कोरोन संकटात पुण्यात मदत कार्य सुरु केले. मला सांगली येथील महापूरच अनुभव होता. यामुळे मी ठरवले की लोकांना प्रथम जेवणाची सोय करून रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना जेवण वाटप करण्याचे ठरवले. मला असे देखील वाटले पुण्यात मोठ्या प्रमाणत झोपडपट्टी मध्ये लोक पत्र्याच्या घरात राहतात काही हातावर पोट असलेली आहे. या लोकांची माहिती घेऊन त्यांना धान्य देण्याचे काम सुरु केले. लोकांनकडून माहिती घेताना देखील ज्यांच्या घरात सर्व काही असे काही मंडळी माहिती देऊ लागले. यासाठी मी पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागात आदिवासी लोकांना मदत देण्याचे ठरवले. मला प्रश्न हा सतत पडत होता की लोकांना ७० वर्षात मोफत मिळत राहिले म्हणून लोकांची मानसिकता अशी झाली असावी का? खर सरकारचे काम हे असते का लोकांना मोफत वस्तू देणे. लोकांच्या अर्थिक स्वतंत्र्याच्या बाबतीत त्यांना अधिक व्यवसाय व उद्योग स्वतंत्र्य देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी सहकार्य करणे की त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना मोफत म्हणजे नागरिकांच्या करातून योजना जाहीर करून विकास करणे. मला वाटते सरकारने ७० वर्षात ही सवय लावून लोकांच्या कामची क्रयशक्ती संपवली लोकांना आळशी केले. कल्याणकारी राज्य म्हणजे लोकांना आळशी करून सरकारने त्यांच्या बोजा स्वताकडे घेऊन काम करणे म्हणजे सरकारने नागरिकांचे स्वतंत्र्य हिरावून सरकार उद्योग व व्यवसाय करत असते. आज या संकटात सरकारच्या मदती आधी जनतेची मदत अधिक प्रमाणत लोकांना मिळत आहे. आज सरकार यामुळे मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार व काळाबाजार होण्याची व्यवस्था ७० वर्षात तयार करून ठेवली असे स्पष्ट दिसते. आज अनेकांना वाटते प्रत्येक काम सरकारचे मला वाटते सरकारने आपले काम मर्यादित ठेवले पाहिजे आणि नागरिकांच्या हिताचे आणि जीवनमान उंचवण्याची जबाबदारी ही नागरिकांकडे सोपवली पाहिजे. आज संकटात लोकांना रोजगार नाही परंतु असे देखील दिसते ज्यावेळी संकट नव्हते तेव्हा काम असतांना देखील लोकांना श्रमाचे काम करणे आवडत नाही असे का? प्रत्येकाला ए. सी. मध्ये बसून काम मिळणार आहे का? म्हणजे एकूण काय तर लोकांची काम करण्याची ताकद संपवून टाकली गरीब आहे म्हणून सरकार मदत करेल. देशात ७० वर्षात झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचवू शकत नाही यांचा अर्थ ज्या योजना राबविल्या त्या फेल गेल्या कि त्या राबविल्या जात आहे म्हणून तेथून बाहेर पडायचे नाही अशी मानसिकत असेल.

            कोरोना संकटात मदत कार्य करणारे देवदुत मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. गरजू आणि संकटात सापडलेला नागरिकाला मदत पोहचणे हा मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा असतो. मला प्रश्न पडतो आपण ज्यावेळी मदत करतो त्यावेळी तेथील एकूण परिस्थिती बघितल्या नंतर आपल्याला वाईट वाटते अश्या परिस्थिती लोकांना कसे आवडत असेल. आज वर झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी काहीच काम झाली नसतील का? झोपडपट्टी पुर्नवसन योजने अंतर्गत घर दिल्या नंतर देखील लोक झोपडपट्टी राहाणे का पसंद करत नसतील. मला नायक हा चित्रपट आठवतो एकूण सरकारी कामाची पद्धत आणि जनतेची मानसिकता कशी असते. सरकार मायबाप असते हे मानून काम करत गेल्यामुळे सर्व अतिरेक होत गेला आणि त्यामुळे परिस्थिती आज देखील तशीच बघण्यासा मिळते. देशाच्या इतिहासात चार पिढी सत्तेत राहून देखील मतदार संघातील झोपडी मध्ये जाऊन लोकांची दशा माध्यमा समोर दिसत असेल तर हे अपयश ह्या देशातील नेमक्या कुठल्या व्यवस्थेचे आहे हे देशातील सर्व नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे.      

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९
ई - मेल – bagul.mayur@gmail.com

3 comments:

  1. आपण मांडलेले विचार योग्यच आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी विचार हवा.

    ReplyDelete
  2. मयूर तुझ्या विचारांची मांडणी भेदक आणि विचार करायला लावणारी आहे. फिल्ड मधील तूझे अनुभव जिवंत आहेत.लिहीत राहा

    ReplyDelete