Tuesday, February 12, 2019

देशातील सामाजिक विषमतेने देश उद्ध्वस्त होईल..!

भारतातील सामाजिक परिस्थितीत दोन्ही तत्त्वांचा अभाव आहे, हे मान्य करूनच आपण सामाजिक लोकशाही निर्माण करण्यास सुरुवात केली होती. या दोन्ही गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे समता. सामाजिक बाबतीत पाहावयाचे तर आपल्या भारतातील समाजरचना चढती भाजणी व उतरती भाजणीच्या तत्त्वावर उभारलेली असल्यामुळे काही जातींना उच्च दर्जा देण्यात आला आहे. आर्थिक बाबतीत पाहावयाचे तर भारतातील समाजात काही लोकांच्या घरी गजांत लक्ष्मी वावरत आहे, तर बहुसंख्य लोकांच्या घरात अठरा विश्वे दारिद्रय़ नांदत आहे. अशा परस्पर विरुद्ध स्वरूपाच्या घटनांनी भरगच्च भरलेल्या आपल्या नव्या राष्ट्रीय जीवनास आपण २६ जानेवारी १९५०ला सुरुवात केली. या दिवसापासून राजकीय बाबतीत आपणाला समता मिळणार आहे. पण सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपणामध्ये असमता राहणार आहे. एका माणसाला एका मताचा अधिकार आणि एका मताची किंमत या तत्त्वाची जाणीव आपणाला राजकीय बाबतीत होणार हे सांगण्यात येत होते.  सामाजिक व आर्थिक बाबतीत समता प्रस्थापित करण्याची टाळाटाळ आपण आणखी किती काळ करणार आहोत? ही टाळाटाळ आपण जर पुष्कळ काळ चालू ठेवली तर आपल्या राजकीय लोकशाहीचे जीवित धोक्यात ठेवूनच ही टाळाटाळ आपणाला टिकविता येईल. ही परस्पर भिन्नतादर्शक परिस्थिती शक्य तो लवकर आपण नष्ट केली पाहिजे. नाही तर या परिस्थितीबद्दल मनात धुसफुसत असलेले लोक या घटनासमितीने प्रचंड परिश्रम घेऊन जी ही राजकीय लोकशाही निर्माण केलेली आहे, तिचे तळपट आकाशात भिरकावून टाकली.
आपणा भारतीय लोकांपुढे जे मोठे कार्य पडलेले आहे, त्याबद्दल आज विचारसरणी वेगवेगळी आहे. प्रत्येकाला आपले विचार हे महत्वाचे वाटत आहे. देशातील सत्ता बदलून देश प्रगती करणारा की देशातील व्यवस्था बदलून हे ठरवले पाहिजे. व्यवस्था बदलण्यासाठी सत्ता गरजेची असली तरी ते बदलणारे आज व्यवस्थित नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आज विचारसरणी एवढी फोफावली आहे काही जणांना पसंत पडणार नाही. भारतातील काही थोडक्या लोकांनी राजकीय सत्ता गाजविण्याची मिरासदारी पुष्कळ काळ उपभोगलेली आहे.  समाजाला आपली सर्वागीण उन्नती करून घेण्याची संधी कधीच मिळाली नाही. यामुळे मानवी जीवनाचे महत्त्व काय, याची जाणीव सुद्धा लोकांमध्ये उरलेली नाही. सत्ताधीशाच्या टाचेखाली चेंगरलेले हे लोक आता दुस-याच्या वर्चस्वाला कंटाळून गेलेले आहेत. स्वत:चे व्यवहार स्वत:च चालवावेत असे त्यांना वाटते व त्यासाठी तसा त्यांना अधिकार पाहिजे आहे.  लोकांच्यासाठी चालविलेले राज्य स्वीकारण्यास आपण तयार आहेत ते राज्य लोकांचे आहे की लोकांनी चालविलेले आहे ते पाहण्यास ते लोक फारसे उत्सुक नाहीत. लोकांनी चालविलेले आणि लोकांसाठी चालविलेले राज्य या तत्त्वांची मूर्ती आपण ज्या घटनामंदिरात प्रस्थापित केलेली आहे, ते घटनामंदिर आपणाला जर पवित्र वातावरणात सुरक्षित ठेवावयाचे असेल, तर आपल्या पुढील मार्गात कोणत्या अनिष्ट गोष्टींची धोंड पडून राहिलेली आहे हे समजावून घेण्यास आपण वेळ घालविता कामा नये. लोकांनी चालविलेल्या राज्यांपेक्षा लोकांसाठी चालविलेले राज्य चांगले, अशी जनतेत जागृती व्हावयास हवी. ही धोंड आपल्या मार्गातून दूर करण्यात आपण काडीचीही कसूर करता कामा नये.  व्यक्तिपूजेपासून अलिप्त राहिले पाहिजे लोकशाही मध्ये देशाच्या व राज्याच्या विकासाच्या दृष्टीने भूमिका मांडणार आणि तसे कार्य करणारा व्यक्ती मात्र व्यक्तीपूजक नसेल.
लोकशाहीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपणाला दुसरी जी गोष्ट करावयाची आहे, ती ही की लोकशाहीचा झेंडा सतत उंच ठेवण्यास जे उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी जॉन स्टुअर्ट याने जो भयसूचक संदेश दिला आहे. तो पाळणे, ही होय.
तो संदेश असा : ‘‘आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याची सुमने वाहू नयेत.’’ ज्यांनी आयुष्यभर आपल्या मायभूमीची सेवा केलेली आहे, अशा थोर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही; परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याला सुद्धा मर्यादा आहेत. याबाबतीत आर्यलडचा देशभक्त डॅनियल ओ कोनेल याने मर्मिकपणे म्हटलेले आहे की, ‘‘स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही, शीलाला बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही, आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही.’’
या भयसूचक संदेशाची इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे. याचे कारण असे की, भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्मपूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालत नाही. परंतु एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्मपूजा दाखवली तर ती त्या राजकीय पंथात हुकूमशाहीची सत्ता प्रस्थापित होते जे आज आपण सर्व अनुभव घेत आणि बघत आहोत.
लोकशाहीचे अस्तित्व अभंग राखण्यासाठी आपण राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे. राजकीय लोकशाहीमुळे सामाजिक लोकशाहीचे अस्तित्व चिरंजीवी होऊ शकेल, एरव्ही नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची जीवनतत्त्वे होत, हे मान्य करणारी पद्धती. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही तत्त्वे म्हणजे त्रिवेणी संगमातील निरनिराळे भाग होत, असे मानता येत नाही. ही तत्त्वे त्रिवेणी संगमात ऐक्य साधून आणतात. ती एकमेकांपासून अलग केली तर लोकशाहीचे जीवनसत्त्व नष्ट केल्यासारखे होते. समतेपासून स्वतंत्रतेला अलग करता येत नाही व स्वतंत्रतेपासून समतेला अलग करता येत नाही. त्याचप्रमाणे स्वतंत्रता आणि समता यांना बंधुत्वापासून अलग करता येत नाही. स्वातंत्र्याच्या जोडीला समता नसेल तर नुसते स्वातंत्र्य मूठभर लोकांची सत्ता सर्वावर प्रस्थापित करू शकेल. समतेच्या जोडीला स्वातंत्र्य नसेल तर नुसती समता वैयक्तिक कर्तृत्वशक्तीची ज्योत मालवून टाकील. स्वातंत्र्य व समता ही दोन्ही सामाजिक व्यवहाराला गती देऊ शकणा-या नाहीत. त्या यंत्राला गती देणारा कोणी तरी पुढे आला पाहिजे. परंतु राजकीय लोकशाही प्रत्यक्षात अस्तित्वात आहे काय? निवडणुकीला उभी राहणारी व्यक्ती लखपती सुद्धा चालत नाही, ती करोडपतीच असायला हवी. इतकी निवडणूक महागडी झालीय. पाण्यासारखा पैसा ओतल्याशिवाय निवडून येताच येत नाही. त्यामुळे निवडणुका लढणे हा श्रीमंतांचाच खेळ झालाय. या निवडणुकीकरिता हुशारी, सज्जनपणा यांची फारशी आवश्यकताच भासत नाही. आज बुद्धिमान माणसे, सज्जन माणसे राजकारणापासून दूर राहतात. भारतीय राजकारणाची स्थिती पाहता जॉन स्ट्रॅचीच्या विचारांची आठवण होते. त्यांनी म्हटले होते की, ‘राजकीय पक्ष ही काय चीज आहे?’ अगदी रांगडय़ा भाषेत सांगायचे तर राजकीय पक्ष हे राजकीय लोकांचे कंपू आहेत.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

भ्रमणध्वनी – ९०९६२१०६६९ 

No comments:

Post a Comment